शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
4
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
5
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
9
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
12
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
13
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
14
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
15
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
16
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
17
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
18
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
20
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

अपक्षांना प्रचारासाठी पाच दिवसांची प्रतीक्षा

By admin | Updated: February 3, 2017 01:56 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता नामांकन अर्ज दाखल होताच रिंगणात असलेल्या विविध पक्षाच्या

पक्षीय उमेदवारांचा प्रचार सुरू : ७ फेब्रुवारीला होणार अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटपरूपेश खैरी   वर्धाजिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता नामांकन अर्ज दाखल होताच रिंगणात असलेल्या विविध पक्षाच्या उमेदवारांनी त्यांच्या प्रचाराचा नारळही फोडला. त्यांची प्रचार कार्यालयेही गजबजू लागली आहेत. तेथे येणाऱ्या जाणाऱ्यांची आवभगत करणेही सुरू झाले आहे. मात्र अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्यांना प्रचाराकरिता आणखी पाच दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. चिन्ह वाटप ७ फेब्रुवारीला होणार आहे. चिन्ह मिळणार नाही तोपर्यंत अपक्षांना प्रचार करणे शक्य होणार आहे. निवडणुकीची घोषणा झाली त्या काळापासूनच इच्छुकांनी आपण गट किंवा गणाच्या मैदानात उतरणार असल्याचे बिगुल फुंकले होते. त्यांच्याकडून पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळावी याकरिता दावेदारी सिद्ध केली होती. अशांनी उमेदवारी आपलीच म्हणून नामांकनाच्या पूर्वीच प्रचार सुरू केला होता. परिसरात गावसभा घेणे सुरू केले होते. ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांनी त्या भागात उघडलेले प्रचार कार्यालय आता नियमित केले.ज्यांना उमेदवारी नाकारली अशातील काहींनी पक्षनिष्ठा धाब्यावर बसवून दुसऱ्या पक्षात जात उमेदवारी मिळवून आपला प्रचार कायम ठेवला. तर काहींनी बंडखोरी करीत अपक्ष दावेदारी दाखल केली. त्यांनी पक्षाच्या नावावर गावात गाठीभेटी घेतल्या असताना अचानक अपक्ष दावेदारी दाखल केली, ती कशामुळे याचा खुलासा करण्याकरिता त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिवशी एकूण ९९६ जणांनी नामांकन दाखल केले. यात जिल्हा परिषदेच्या ५० जागांकरिता तब्बल ३६६ तर पंचायत समितीकरिता ६३० जणांनी नामांकन दाखल केले. यात अपक्षांचा भरणाही अधिक आहे. एक वर्धा तालुक्यात नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता तब्बल ६० अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यात जिल्हा परिषदेकरिता २५ तर पंचायत समितीकरिता ३५ जणांचा समावेश आहे. यातील काहींची उमेदवारी पक्षाने नाकारलेल्या तिकिटामुळे झालेल्या नाराजीतून तर काहींची केवळ हौशेपाटी असल्याचे दिसून आले आहे. रिंगणात असलेल्या अपक्षांपैकी किती जण कायम राहतात हे नामांकन अर्ज परत घेण्याच्या दिवशीच कळणार आहे. चिन्ह वाटपानंतर अपक्ष उमेदवारांना प्रचाराकरिता केवळ आठ दिवस मिळणार आहेत. या आठ दिवसात चिन्ह परिसरातील मतदारांपर्यंत पोहोचविण्याकरिता चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या तुलनेत राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे. त्यांचा छापिल जाहीरनामा तयार झाला असून तो मतदारांपर्यंत पोहोचविण्याकरिता यंत्रणा तयार झाली आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी वॉर्ड सभा घेण्याचे नियोजन तयार केले आहे. या उलट अपक्ष उमेदवारांची प्रचाराकरिता गोची होत असल्याचे पाहायला मिळते.