शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अपक्षांना प्रचारासाठी पाच दिवसांची प्रतीक्षा

By admin | Updated: February 3, 2017 01:56 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता नामांकन अर्ज दाखल होताच रिंगणात असलेल्या विविध पक्षाच्या

पक्षीय उमेदवारांचा प्रचार सुरू : ७ फेब्रुवारीला होणार अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटपरूपेश खैरी   वर्धाजिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता नामांकन अर्ज दाखल होताच रिंगणात असलेल्या विविध पक्षाच्या उमेदवारांनी त्यांच्या प्रचाराचा नारळही फोडला. त्यांची प्रचार कार्यालयेही गजबजू लागली आहेत. तेथे येणाऱ्या जाणाऱ्यांची आवभगत करणेही सुरू झाले आहे. मात्र अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्यांना प्रचाराकरिता आणखी पाच दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. चिन्ह वाटप ७ फेब्रुवारीला होणार आहे. चिन्ह मिळणार नाही तोपर्यंत अपक्षांना प्रचार करणे शक्य होणार आहे. निवडणुकीची घोषणा झाली त्या काळापासूनच इच्छुकांनी आपण गट किंवा गणाच्या मैदानात उतरणार असल्याचे बिगुल फुंकले होते. त्यांच्याकडून पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळावी याकरिता दावेदारी सिद्ध केली होती. अशांनी उमेदवारी आपलीच म्हणून नामांकनाच्या पूर्वीच प्रचार सुरू केला होता. परिसरात गावसभा घेणे सुरू केले होते. ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांनी त्या भागात उघडलेले प्रचार कार्यालय आता नियमित केले.ज्यांना उमेदवारी नाकारली अशातील काहींनी पक्षनिष्ठा धाब्यावर बसवून दुसऱ्या पक्षात जात उमेदवारी मिळवून आपला प्रचार कायम ठेवला. तर काहींनी बंडखोरी करीत अपक्ष दावेदारी दाखल केली. त्यांनी पक्षाच्या नावावर गावात गाठीभेटी घेतल्या असताना अचानक अपक्ष दावेदारी दाखल केली, ती कशामुळे याचा खुलासा करण्याकरिता त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिवशी एकूण ९९६ जणांनी नामांकन दाखल केले. यात जिल्हा परिषदेच्या ५० जागांकरिता तब्बल ३६६ तर पंचायत समितीकरिता ६३० जणांनी नामांकन दाखल केले. यात अपक्षांचा भरणाही अधिक आहे. एक वर्धा तालुक्यात नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता तब्बल ६० अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यात जिल्हा परिषदेकरिता २५ तर पंचायत समितीकरिता ३५ जणांचा समावेश आहे. यातील काहींची उमेदवारी पक्षाने नाकारलेल्या तिकिटामुळे झालेल्या नाराजीतून तर काहींची केवळ हौशेपाटी असल्याचे दिसून आले आहे. रिंगणात असलेल्या अपक्षांपैकी किती जण कायम राहतात हे नामांकन अर्ज परत घेण्याच्या दिवशीच कळणार आहे. चिन्ह वाटपानंतर अपक्ष उमेदवारांना प्रचाराकरिता केवळ आठ दिवस मिळणार आहेत. या आठ दिवसात चिन्ह परिसरातील मतदारांपर्यंत पोहोचविण्याकरिता चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या तुलनेत राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे. त्यांचा छापिल जाहीरनामा तयार झाला असून तो मतदारांपर्यंत पोहोचविण्याकरिता यंत्रणा तयार झाली आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी वॉर्ड सभा घेण्याचे नियोजन तयार केले आहे. या उलट अपक्ष उमेदवारांची प्रचाराकरिता गोची होत असल्याचे पाहायला मिळते.