शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
3
"पाती माझ्यासोत जबरदस्ती..."; इंग्लंडचे माजी खासदार अँड्रयू ग्रिफिथ्स यांच्यावर, माजी खासदार पत्नीचा गंभीर आरोप
4
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
5
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
6
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
7
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
8
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
9
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
10
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
11
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
12
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
13
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
14
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
15
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
16
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
17
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
18
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
19
७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
20
"स्मिता तळवलकर नाराज झाल्या आणि मी...", 'लक्ष्मी निवास' फेम तुषार दळवींनी सांगितला 'तो' किस्सा

वणा नदी पात्राला स्वच्छतेची प्रतीक्षा

By admin | Updated: July 17, 2015 02:10 IST

भारतीय जनता पार्टीने सत्तेवर येण्यापूर्वी नदी जोड प्रकल्प व नदी स्वच्छता अभियान राबविण्याबाबत वाच्यता केली होती. गंगा सफाई अभियानाच्या रूपाने त्याला सुरूवातही झाली;

वनस्पतीसह गाळाचाही प्रकोप : नदी स्वच्छता अभियान कागदावरचवर्धा : भारतीय जनता पार्टीने सत्तेवर येण्यापूर्वी नदी जोड प्रकल्प व नदी स्वच्छता अभियान राबविण्याबाबत वाच्यता केली होती. गंगा सफाई अभियानाच्या रूपाने त्याला सुरूवातही झाली; पण या अभियानाची हवाही विदर्भाला शिवली नाही. वर्धा जिल्ह्यातील सर्वच नद्या स्वच्छतेकरिता आसुसलेल्या आहेत. हिंगणघाट तालुक्याची जीवनदायिनी वणा नदी सध्या घाणीच्या विळख्यात अडकली आहे. या नदीचे पात्र कधी स्वच्छ होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केले. यावरून वर्धा जिल्ह्यातही अभियान राबविल्याचा फार्स निर्माण करण्यात आला. यामुळेच जिल्ह्यात स्वच्छता अभियान प्रत्यक्षात साकारले नाही. पवनार येथील धाम नदीपासून नदी पात्राच्या स्वच्छतेच्या मोहिमेचाही शुभारंभ करण्यात आला होता. पवनार ग्रा.पं. ने जरी हा उपक्रम राबविला तरी तो प्रशासनाने पूढे नेणे गरजेचे होते. या अभियानाचा प्रारंभ पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झाला; पण तोही केवळ फार्सच ठरला. धाम नदीची कुठलीही स्वच्छता झाली नाही. ग्रामपंचायतीने विशेष सफाई केली नाही आणि जिल्हा प्रशासनानेही ती मोहीम पूढे नेली नाही. यामुळे वर्धा जिल्ह्यातील अन्य नद्यांना केवळ प्रतीक्षाच करावी लागत असल्याचे दिसते. जिल्ह्यात वर्धा, बोर, धाम, वणा, यशोदा, बाकळी, भदाडी या नद्या आहेत. या नद्यांचे पात्र सध्या गाळाने बुजलेले आहेत. वर्धा नदीमध्ये अनेक ठिकाणी गाळ साचला असून रेतीच्या उपस्यामुळे खड्डे पडले आहेत. शिवाय अनेक ठिकाणी जलपर्णीत वाढ झाली असून बेशरमही वाढले आहे. बोर, धाम नदीमध्येही अनेक ठिकाणी गाळ साचला आहे. वणा नदीचे पात्रही घाणीने माखले आहे. हिंगणघाट शहरात असलेल्या वणा नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी जलपर्णींची वाढ झाली आहे. काही ठिकाणी बेशरमची झाडे वाढली असून गाळही साचला आहे. यामुळे नदी पात्राचा जलस्तर अत्यंत कमी होत असल्याचेही दिसून येत आहे. बाकळी, यशोदा आणि भदाडी नदीही घाणीच्या विळख्यात सापडली आहे. कित्येक वर्षांपासून नद्यांचे पात्रच साफ करण्यात आले नाही. यामुळे प्रत्येक पावसाळ्यात केवळ वर-वर पाणी वाहून जात असल्याचे दिसते. काही नद्यांना तर अनेक ठिकाणी डबक्यांचे स्वरूप आल्याचेच दिसून येते. बहुतांश नद्यांवर ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. नदी पात्रामध्ये गाळ साचला की पाणी पुरवठा योजनेवरही विपरित परिणाम होतो. नागरिकांना पिण्याकरिता तसेच उद्योगांना पाणी पुरविणाऱ्या नद्यांच्या स्वच्छतेकडेच प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. नदीपात्र उथळ होत असल्यानेच पुराचा धोकाही वाढला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत नदी स्वच्छता मोहीम हाती घेणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)जिल्ह्यातील प्रकल्प, नद्या, नाले ही संपूर्ण संपत्ती पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येत असली तरी त्यावर काही करार करण्यात आलेले आहेत. यात वर्धा नदीचे पाणी ज्या-ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वापरले जाते, त्यांनी नद्यांची स्वच्छता राखण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे; पण तसे होताना दिसत नाही. जिल्ह्यात कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेकडून नदी स्वच्छता अभियान राबविण्याकरिता पुढाकार घेतला जात नसल्याचेच दिसते. यामुळेच जिल्ह्यातील नद्यांचे पात्र उथळ झाले असून गाळाने बुजले आहे. वणा नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी गाळ साचला असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नदी पात्रांच्या स्वच्छतेकडे जिल्हा प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. परिमामी, जलसंकट अधिक गंभीर होत असल्याचे दिसून येते. किमान जलयुक्त शिवार अभियानात नद्यांचा समावेश करणे गरजेचे आहे.