शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

शहीद स्मृतिस्तंभाला सौंदर्यीकरणाची प्रतीक्षा

By admin | Updated: May 19, 2017 02:19 IST

सन १९४२ मधील सातंत्र्यलढ्यात सहा शूर शहीद झाले होते. त्यांना एकाच ठिकाणी भडाग्नी दिला होता.

शहिदांना दिला होता भडाग्नी : २५ लाखांचा निधी खितपत लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : सन १९४२ मधील सातंत्र्यलढ्यात सहा शूर शहीद झाले होते. त्यांना एकाच ठिकाणी भडाग्नी दिला होता. या बलीदानाचे सदैव स्मरण राहावे म्हणून बाकळी नदीच्या काठावर स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. त्याच्या विस्तार व सौंदर्यीकरणाचे काम मंजूर झाले; पण अनेक अडथळे येत आहेत. मागील वर्षी २५ लाख रुपयांची निविदा झाली; पण अद्याप बांधकामाचा पत्ता नाही. यामुळे शहिदांच्या स्मृतिस्तंभाला सौंदर्यीकरणाची किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आष्टी शहरात दाखल होताना सुरूवातीलाच बाकळी नदीच्या काठावर शहीद स्मृतिस्तंभ आहे. त्याच्या सभोवताल काही वर्षांपूर्वी संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. या ठिकाणी दरवर्षी नागपंचमी (शहीद स्मृती दिन सोहळा), गणतंत्र दिन, प्रजासत्ताक दिनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली जाते. या स्थळाची महती लक्षात घेता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शहीदभूमी विकासाकरिता दिलेल्या ५ कोटींतून २५ लाख बांधकाम तथा सौंदर्यीकरणावर खर्च करण्याचे ठरले होते. त्याचे नियोजन करून सार्वजनिक बांधकाम विभागाने सप्टेंबर २०१६ मध्ये ई -निविदा काढली. सदर काम आर्वी येथील एका एजन्सीला मिळाले; पण कामाचा कार्यारंभ आदेश मिळताच यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या ठिकाणी लागूनच बंधारा बांधकाम व नदीपात्राचे खोलीकरण करण्याचे काम सुरू आहे. खोलीकरणाचा गाळ अगदी स्मृतिस्तंभाला लागून टाकल्याने सौंदर्यीकरणाचे काम अडकले आहे. शिवाय बांधकामाची जागा भूमिअभिलेखाच्या नकाशात दिसत नसल्याने यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाला शहिदांच्या विकासासाठी जागेची ‘अ‍ॅलर्जी’ होणे यावर नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. सदर काम त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. सदर काम पूर्ण झाल्यावर स्मृतिस्तंभाचा कायापालट होणार आहे. सोबतच प्रवेशद्वारही होणार असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व महात्मा ज्योतीबा फुले पुतळा परिसराचे सौंदर्य खुलणार आहे. यामुळे शहीद स्मृतिस्तंभाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. जागेच्या वादामुळे काम प्रलंबित शहिदांना ज्या ठिकाणी भडाग्नी दिला होता, तेथे शहीद स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. त्यांचे सौंदर्यीकरण मंजूर असताना जागेचा वाद समोर आला आहे. प्रस्ताव सादर करूनही अद्याप मोजमाप प्रक्रिया न झाल्याने स्मृतिस्तंभ विकास, सौंदर्यीकरणाचे काम प्रलंबित आहे. बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. शहीद स्मृतिस्तंभाची निविदा झालेली आहे. जागेच्या मोजमापाकरिता प्रकरण सादर करण्यात आले होते; पण ते काम अद्याप झाले नाही. जागेच्या मोजमापानंतरच बांधकामाचा तिढा सुटणार आहे. यामुळे बांधकामाला वेळ लागण्याची शक्यता आहे. - अनंत भाष्करवार, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आर्वी.