शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

७५.६८ कोटी प्राप्त तरीही कृषीपंपाची प्रतीक्षा

By admin | Updated: May 27, 2017 00:28 IST

सिंचनाकरिता शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता शासनाकडून कृषी पंप देण्याची योजना आहे.

 कार्यालयात चकरा : अनुदानानंतरही शेतकरी वंचित रुपेश खैरी । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सिंचनाकरिता शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता शासनाकडून कृषी पंप देण्याची योजना आहे. वर्धा जिल्ह्यात ही योजना पूर्णत्त्वास नेण्याकरिता तब्बल ७५ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. असे असताना जिल्ह्यात कृषी पंपाची प्रतीक्षा यादी मात्र कायमच असल्याचे दिसते. जिल्ह्यात आजच्या घडीला तब्बल ३ हजार २४९ शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या जोडणीची प्रतीक्षा आहे. सिंचनाची सुविधा वाढावी याकरिता शेतकऱ्यांना कृषी पंप देण्याची योजना अंमलात आणण्यात आली. शिवाय शेतकऱ्यांवर येत असलेला वीज देयकाचा भार कमी करण्याकरिता सौर कृषी पंपाचीही योजना अंमलात आणली. मात्र जिल्ह्यात पाहीजे त्या तुलनेत या योजनेला प्रतिसाद मिळला नाही. याच्या कारणाची मिमांसा केली असता सदर पंप सर्वसाधारण शेतकऱ्यांना परवडणारे नसून ते आर्थिक दृष्ट्या महाग ठरत असल्याच्या प्रतिक्रीया काही शेतकऱ्यांकडून मिळाल्या आहेत. यामुळे त्यांच्याकडून विजेवर चालणाऱ्या कृषी पंपाकडेच शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानासह पाणी अडविण्याकरिता अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. येत्या दिवसात याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. जिल्ह्यातील शेतशिवारात उपलब्ध पाण्यामुळे आपणही सिंचन करून आर्थिक समृद्धी साधावी याकरिता शेतकऱ्यांनी महावितरणकडे कृषी पंप मिळण्याकरिता अर्ज सादर केला आहे. त्यांना कृषी पंपाच्या जोडणीची अपेक्षा असताना त्यांना प्रतीक्षा यादीतच राहावे लागत आहे. जिल्ह्याला मिळणाऱ्या अनुदानातून शेतकऱ्यांच्य शेतात वीज नेण्याकरिता आवश्यक असलेले साहित्य खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. त्यांच्याकडून पंपाच्या जोडणीकरिता महावितरण कार्यालयात चकरा मारणे सुरू असून पंपाच्या जोडणीची प्रतीक्षा आहे. प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना पंप जोडणीची आवश्यकता निर्माण झाली आहे. वर्षभरात ४ हजार ८६९ शेतकऱ्यांना जोडण्या जिल्ह्यात ३१ मार्च २०१६ मध्ये ३ हजार ६७२ शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित होते. तर एप्रिल २०१७ पर्यंत ४ हजार ४४६ शेतकऱ्यांनी अर्ज भरले. या वर्षभरात ४ हजार ८६९ शेतकऱ्यांना महावितरणकडून जोडण्या देण्यात आल्या आहेत. या सर्व घडामोडीअंती जिल्ह्यात आजच्या घडीला ३ हजार २४९ शेतकऱ्यांना कृषी पंपाची प्रतीक्षा आहे.