शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

७५.६८ कोटी प्राप्त तरीही कृषीपंपाची प्रतीक्षा

By admin | Updated: May 27, 2017 00:28 IST

सिंचनाकरिता शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता शासनाकडून कृषी पंप देण्याची योजना आहे.

 कार्यालयात चकरा : अनुदानानंतरही शेतकरी वंचित रुपेश खैरी । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सिंचनाकरिता शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता शासनाकडून कृषी पंप देण्याची योजना आहे. वर्धा जिल्ह्यात ही योजना पूर्णत्त्वास नेण्याकरिता तब्बल ७५ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. असे असताना जिल्ह्यात कृषी पंपाची प्रतीक्षा यादी मात्र कायमच असल्याचे दिसते. जिल्ह्यात आजच्या घडीला तब्बल ३ हजार २४९ शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या जोडणीची प्रतीक्षा आहे. सिंचनाची सुविधा वाढावी याकरिता शेतकऱ्यांना कृषी पंप देण्याची योजना अंमलात आणण्यात आली. शिवाय शेतकऱ्यांवर येत असलेला वीज देयकाचा भार कमी करण्याकरिता सौर कृषी पंपाचीही योजना अंमलात आणली. मात्र जिल्ह्यात पाहीजे त्या तुलनेत या योजनेला प्रतिसाद मिळला नाही. याच्या कारणाची मिमांसा केली असता सदर पंप सर्वसाधारण शेतकऱ्यांना परवडणारे नसून ते आर्थिक दृष्ट्या महाग ठरत असल्याच्या प्रतिक्रीया काही शेतकऱ्यांकडून मिळाल्या आहेत. यामुळे त्यांच्याकडून विजेवर चालणाऱ्या कृषी पंपाकडेच शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानासह पाणी अडविण्याकरिता अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. येत्या दिवसात याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. जिल्ह्यातील शेतशिवारात उपलब्ध पाण्यामुळे आपणही सिंचन करून आर्थिक समृद्धी साधावी याकरिता शेतकऱ्यांनी महावितरणकडे कृषी पंप मिळण्याकरिता अर्ज सादर केला आहे. त्यांना कृषी पंपाच्या जोडणीची अपेक्षा असताना त्यांना प्रतीक्षा यादीतच राहावे लागत आहे. जिल्ह्याला मिळणाऱ्या अनुदानातून शेतकऱ्यांच्य शेतात वीज नेण्याकरिता आवश्यक असलेले साहित्य खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. त्यांच्याकडून पंपाच्या जोडणीकरिता महावितरण कार्यालयात चकरा मारणे सुरू असून पंपाच्या जोडणीची प्रतीक्षा आहे. प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना पंप जोडणीची आवश्यकता निर्माण झाली आहे. वर्षभरात ४ हजार ८६९ शेतकऱ्यांना जोडण्या जिल्ह्यात ३१ मार्च २०१६ मध्ये ३ हजार ६७२ शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित होते. तर एप्रिल २०१७ पर्यंत ४ हजार ४४६ शेतकऱ्यांनी अर्ज भरले. या वर्षभरात ४ हजार ८६९ शेतकऱ्यांना महावितरणकडून जोडण्या देण्यात आल्या आहेत. या सर्व घडामोडीअंती जिल्ह्यात आजच्या घडीला ३ हजार २४९ शेतकऱ्यांना कृषी पंपाची प्रतीक्षा आहे.