शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

७५.६८ कोटी प्राप्त तरीही कृषीपंपाची प्रतीक्षा

By admin | Updated: May 27, 2017 00:28 IST

सिंचनाकरिता शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता शासनाकडून कृषी पंप देण्याची योजना आहे.

 कार्यालयात चकरा : अनुदानानंतरही शेतकरी वंचित रुपेश खैरी । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सिंचनाकरिता शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता शासनाकडून कृषी पंप देण्याची योजना आहे. वर्धा जिल्ह्यात ही योजना पूर्णत्त्वास नेण्याकरिता तब्बल ७५ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. असे असताना जिल्ह्यात कृषी पंपाची प्रतीक्षा यादी मात्र कायमच असल्याचे दिसते. जिल्ह्यात आजच्या घडीला तब्बल ३ हजार २४९ शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या जोडणीची प्रतीक्षा आहे. सिंचनाची सुविधा वाढावी याकरिता शेतकऱ्यांना कृषी पंप देण्याची योजना अंमलात आणण्यात आली. शिवाय शेतकऱ्यांवर येत असलेला वीज देयकाचा भार कमी करण्याकरिता सौर कृषी पंपाचीही योजना अंमलात आणली. मात्र जिल्ह्यात पाहीजे त्या तुलनेत या योजनेला प्रतिसाद मिळला नाही. याच्या कारणाची मिमांसा केली असता सदर पंप सर्वसाधारण शेतकऱ्यांना परवडणारे नसून ते आर्थिक दृष्ट्या महाग ठरत असल्याच्या प्रतिक्रीया काही शेतकऱ्यांकडून मिळाल्या आहेत. यामुळे त्यांच्याकडून विजेवर चालणाऱ्या कृषी पंपाकडेच शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानासह पाणी अडविण्याकरिता अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. येत्या दिवसात याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. जिल्ह्यातील शेतशिवारात उपलब्ध पाण्यामुळे आपणही सिंचन करून आर्थिक समृद्धी साधावी याकरिता शेतकऱ्यांनी महावितरणकडे कृषी पंप मिळण्याकरिता अर्ज सादर केला आहे. त्यांना कृषी पंपाच्या जोडणीची अपेक्षा असताना त्यांना प्रतीक्षा यादीतच राहावे लागत आहे. जिल्ह्याला मिळणाऱ्या अनुदानातून शेतकऱ्यांच्य शेतात वीज नेण्याकरिता आवश्यक असलेले साहित्य खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. त्यांच्याकडून पंपाच्या जोडणीकरिता महावितरण कार्यालयात चकरा मारणे सुरू असून पंपाच्या जोडणीची प्रतीक्षा आहे. प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना पंप जोडणीची आवश्यकता निर्माण झाली आहे. वर्षभरात ४ हजार ८६९ शेतकऱ्यांना जोडण्या जिल्ह्यात ३१ मार्च २०१६ मध्ये ३ हजार ६७२ शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित होते. तर एप्रिल २०१७ पर्यंत ४ हजार ४४६ शेतकऱ्यांनी अर्ज भरले. या वर्षभरात ४ हजार ८६९ शेतकऱ्यांना महावितरणकडून जोडण्या देण्यात आल्या आहेत. या सर्व घडामोडीअंती जिल्ह्यात आजच्या घडीला ३ हजार २४९ शेतकऱ्यांना कृषी पंपाची प्रतीक्षा आहे.