शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
3
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
4
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
5
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
6
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
7
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
8
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
9
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
10
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
11
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
12
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
13
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
14
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
15
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
16
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
17
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
18
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
19
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
20
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक

३,७१५ शेतकऱ्यांना कृषीपंप जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: August 24, 2016 00:29 IST

गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. अशात अनेकांच्या

अनामत रक्कमही भरली : शेतकऱ्यांना ओलिताची अडचण; डिसेंबरपर्यंत पंप मिळण्याची शक्यतारुपेश खैरी वर्धा गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. अशात अनेकांच्या शेतात पाणी असताना कृषी पंपाला वीज जोडणी नसल्याने ओलीत करणे अवघड जात आहे. असे एकूण ३ हजार ७१५ शेतकरी महावितरणकडे अर्ज करून कृषी पंपाकरिता वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. कोरडवाहू आणि आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून वर्धेची ओळख आहे. यामुळे जिल्ह्यात सिंचनाची सुविधा व्हावी याकरिता शासनाच्यावतीने धडक सिंचन कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना कृषी पंपाचकरिता वीज जोडणी देण्याची योजनाही राबविण्यात आली. या योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहितही करण्यात आले; मात्र त्यांच्या मागणीनंतरही त्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आली नसल्याचे जिल्ह्यात दिसत आहे. शेतकऱ्यांची कृषी पंपाची मागणी पाहता जुलै अखेरपर्यंत ४ हजार ५८० कृषी पंपांना जोडणी देण्यात आल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. असे असतानाही अजून ३ हजार ७१५ शेतकऱ्यांचे अर्ज जोडणीकरिता प्रतीक्षेत असल्याचेच दिसून आले आहे. या शेतकऱ्यांनी आवश्यक अश्वशक्तीच्या नियमानुसार महावितरणकडे अनामत रक्कमही भरली आहे; मात्र त्यांना अद्याप पंप मिळाले नाही. यामागची कारणे विचारली असता शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याकरिता आवश्यक असलेला रस्ता नाही, विद्यूत खांब नाही, यामुळे जोडणी देणे कठीण जात असल्याचे महावितरणच्यावतीने सांगण्यात येत आहे.