शहरं
Join us  
Trending Stories
1
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
3
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
4
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
5
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
6
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
7
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
8
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
10
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
11
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
12
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
13
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
14
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
15
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
16
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
17
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
18
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
19
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
20
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया

३,७१५ शेतकऱ्यांना कृषीपंप जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: August 24, 2016 00:29 IST

गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. अशात अनेकांच्या

अनामत रक्कमही भरली : शेतकऱ्यांना ओलिताची अडचण; डिसेंबरपर्यंत पंप मिळण्याची शक्यतारुपेश खैरी वर्धा गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. अशात अनेकांच्या शेतात पाणी असताना कृषी पंपाला वीज जोडणी नसल्याने ओलीत करणे अवघड जात आहे. असे एकूण ३ हजार ७१५ शेतकरी महावितरणकडे अर्ज करून कृषी पंपाकरिता वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. कोरडवाहू आणि आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून वर्धेची ओळख आहे. यामुळे जिल्ह्यात सिंचनाची सुविधा व्हावी याकरिता शासनाच्यावतीने धडक सिंचन कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना कृषी पंपाचकरिता वीज जोडणी देण्याची योजनाही राबविण्यात आली. या योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहितही करण्यात आले; मात्र त्यांच्या मागणीनंतरही त्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आली नसल्याचे जिल्ह्यात दिसत आहे. शेतकऱ्यांची कृषी पंपाची मागणी पाहता जुलै अखेरपर्यंत ४ हजार ५८० कृषी पंपांना जोडणी देण्यात आल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. असे असतानाही अजून ३ हजार ७१५ शेतकऱ्यांचे अर्ज जोडणीकरिता प्रतीक्षेत असल्याचेच दिसून आले आहे. या शेतकऱ्यांनी आवश्यक अश्वशक्तीच्या नियमानुसार महावितरणकडे अनामत रक्कमही भरली आहे; मात्र त्यांना अद्याप पंप मिळाले नाही. यामागची कारणे विचारली असता शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याकरिता आवश्यक असलेला रस्ता नाही, विद्यूत खांब नाही, यामुळे जोडणी देणे कठीण जात असल्याचे महावितरणच्यावतीने सांगण्यात येत आहे.