शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

३,७१५ शेतकऱ्यांना कृषीपंप जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: August 24, 2016 00:29 IST

गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. अशात अनेकांच्या

अनामत रक्कमही भरली : शेतकऱ्यांना ओलिताची अडचण; डिसेंबरपर्यंत पंप मिळण्याची शक्यतारुपेश खैरी वर्धा गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. अशात अनेकांच्या शेतात पाणी असताना कृषी पंपाला वीज जोडणी नसल्याने ओलीत करणे अवघड जात आहे. असे एकूण ३ हजार ७१५ शेतकरी महावितरणकडे अर्ज करून कृषी पंपाकरिता वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. कोरडवाहू आणि आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून वर्धेची ओळख आहे. यामुळे जिल्ह्यात सिंचनाची सुविधा व्हावी याकरिता शासनाच्यावतीने धडक सिंचन कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना कृषी पंपाचकरिता वीज जोडणी देण्याची योजनाही राबविण्यात आली. या योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहितही करण्यात आले; मात्र त्यांच्या मागणीनंतरही त्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आली नसल्याचे जिल्ह्यात दिसत आहे. शेतकऱ्यांची कृषी पंपाची मागणी पाहता जुलै अखेरपर्यंत ४ हजार ५८० कृषी पंपांना जोडणी देण्यात आल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. असे असतानाही अजून ३ हजार ७१५ शेतकऱ्यांचे अर्ज जोडणीकरिता प्रतीक्षेत असल्याचेच दिसून आले आहे. या शेतकऱ्यांनी आवश्यक अश्वशक्तीच्या नियमानुसार महावितरणकडे अनामत रक्कमही भरली आहे; मात्र त्यांना अद्याप पंप मिळाले नाही. यामागची कारणे विचारली असता शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याकरिता आवश्यक असलेला रस्ता नाही, विद्यूत खांब नाही, यामुळे जोडणी देणे कठीण जात असल्याचे महावितरणच्यावतीने सांगण्यात येत आहे.