शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

२१,५८२ शेतकऱ्यांना बोंडअळीच्या मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 23:36 IST

गत खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले होते. यामुळे सर्वच स्तरावर मदत देण्याची ओरड झाली होती. परिणामी, शासनाने शेतकºयांना हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली.

ठळक मुद्देअहवाल कधीचाच सादर : शासनाकडून निकष जाहीर; पण अनुदान नसल्याने मदत नाही

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : गत खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले होते. यामुळे सर्वच स्तरावर मदत देण्याची ओरड झाली होती. परिणामी, शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली. यात सर्वच शेतकऱ्यांना मदत देण्याचे निकष ठेवण्यात आले होते; पण नवा खरीप तोंडावर आला असताना एकाही शेतकऱ्याला जुन्या हंगामातील नुकसानीची मदत मिळाली नाही.शेतकऱ्यांचे मुख्य पीक असणाऱ्या कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने त्यांची आर्थिक घडी विस्कटली. यात ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झालेल्या कपाशी पिकांना मदत देण्याचे शासनाने जाहीर केले. या निकषात तालुक्यातील २१ हजार ५८२ शेतकरी येत असून त्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. या निकषाचा सरसकट सर्वच शेतकऱ्यांचा लाभ व्हावा यासाठी महसूल व कृषी विभागाच्यावतीने संयुक्त सर्व्हे करण्यात आला. यात शासनाने २३ फेब्रुवारी व त्यानंतर १७ मार्च २०१८ रोजी काढलेल्या अध्यादेशात नव्याने पैसेवारीची अट रद्द केली. यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे.नव्या अध्यादेशात शासनाने दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. यात आता कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रतीहेक्टर ६ हजार ८०० रुपये तर ओलीतासाठी १३ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे. शासनाने बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली; पण या मदतीची अंमलबजावणी पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांना आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांना मदतीची घोषणा ही शासनस्तरावरील आहे. याबाबत नव्याने अध्यादेश काढून सर्वच शेतकºयांना याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नरत आहे. शेतकऱ्यांना अद्याप मदतीबाबतची सूचना व निर्णय प्राप्त झाला नाही.- सतीश सांगळे, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी.

टॅग्स :cottonकापूस