शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२१,५८२ शेतकऱ्यांना बोंडअळीच्या मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 23:36 IST

गत खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले होते. यामुळे सर्वच स्तरावर मदत देण्याची ओरड झाली होती. परिणामी, शासनाने शेतकºयांना हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली.

ठळक मुद्देअहवाल कधीचाच सादर : शासनाकडून निकष जाहीर; पण अनुदान नसल्याने मदत नाही

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : गत खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले होते. यामुळे सर्वच स्तरावर मदत देण्याची ओरड झाली होती. परिणामी, शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली. यात सर्वच शेतकऱ्यांना मदत देण्याचे निकष ठेवण्यात आले होते; पण नवा खरीप तोंडावर आला असताना एकाही शेतकऱ्याला जुन्या हंगामातील नुकसानीची मदत मिळाली नाही.शेतकऱ्यांचे मुख्य पीक असणाऱ्या कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने त्यांची आर्थिक घडी विस्कटली. यात ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झालेल्या कपाशी पिकांना मदत देण्याचे शासनाने जाहीर केले. या निकषात तालुक्यातील २१ हजार ५८२ शेतकरी येत असून त्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. या निकषाचा सरसकट सर्वच शेतकऱ्यांचा लाभ व्हावा यासाठी महसूल व कृषी विभागाच्यावतीने संयुक्त सर्व्हे करण्यात आला. यात शासनाने २३ फेब्रुवारी व त्यानंतर १७ मार्च २०१८ रोजी काढलेल्या अध्यादेशात नव्याने पैसेवारीची अट रद्द केली. यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे.नव्या अध्यादेशात शासनाने दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. यात आता कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रतीहेक्टर ६ हजार ८०० रुपये तर ओलीतासाठी १३ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे. शासनाने बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली; पण या मदतीची अंमलबजावणी पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांना आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांना मदतीची घोषणा ही शासनस्तरावरील आहे. याबाबत नव्याने अध्यादेश काढून सर्वच शेतकºयांना याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नरत आहे. शेतकऱ्यांना अद्याप मदतीबाबतची सूचना व निर्णय प्राप्त झाला नाही.- सतीश सांगळे, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी.

टॅग्स :cottonकापूस