शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

नळावरील मोटरपंप काढण्यासाठी कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:02 IST

शहरातील पाणी टंचाई तीव्र होत असल्याने प्रत्येक जण नळाच्या पाण्यावर लक्ष ठेवून आहे. अशातही आपल्या जास्त पाणी मिळावे या उद्देशाने अनेकांनी थेट नळालाच मोटरपंप लावल्यामुळे इतरांना पाणी मिळणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईत भर : गोंडप्लॉट भागात मोठ्या प्रमाणावर मोटारपंप बसविल्याचे निदर्शनास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील पाणी टंचाई तीव्र होत असल्याने प्रत्येक जण नळाच्या पाण्यावर लक्ष ठेवून आहे. अशातही आपल्या जास्त पाणी मिळावे या उद्देशाने अनेकांनी थेट नळालाच मोटरपंप लावल्यामुळे इतरांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. या आपलपोटेपणामुळे पाणी समस्या आणखीच गडद होत असल्याने पालिकेने मोटरपंप काढण्यासाठी कंबर कसली आहे.जलाशयातील पाण्याने तळ गाठल्यामुळे शहराला आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. पालिकेने नियोजन करुन पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करायला सुरुवात केली होती. मात्र जलाशयातच पाणी नसल्याने पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनीही आपल्याच जास्त पाणी मिळावे या उद्देशाने थेट नळालाच मोटर लावून पाणी घ्यायला सुरुवात केली. परिणामी पुढच्या घराला पाणी मिळत नसल्याने त्यांनीही नळावर मोटर लावली. असाच हा प्रकार वाढत गेल्याने बहुतांश घरी नळाला मीटर लावण्यात आले. यामुळे काहींच्या घरी पाण्याचा सुकाळ तर काहींच्या घरी दुष्काळ, अशीच परिस्थिती निर्माण झाली. याची माहिती घेण्याच्या उद्देशाने नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नंदनवार व कर्मचाऱ्यांसह शहरातील गोंडप्लॉट परिसरात शनिवारी नळ आल्यानंतर पाहणी केली. तर त्यांना नळावरील मोटारीची भीषणता लक्षात आली. दहापैकी चार घरी मोटर लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना सूचना देत मोटरपंप काढायला लावली. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी कारवाई टाळून स्वत: हून नळाला जोडलेली मोटर काढण्याची गरज आहे, असे मत नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी व्यक्त केले आहे.पालिकेच्या पुढाकाराला नगरसेवकांची बाधा?शहरातील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी नळावरील विद्युत मीटर काढणे गरजेचे आहे. यासाठी नगराध्यक्षांनी पुढाकार घेतल्याने याला आजी-माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. परंतु आपली व्होट बँक कायम ठेवण्यासाठी या कारवाईत बाधा येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पण, नागरिकांचा सर्वसमावेशक प्रश्न लक्षात घेता नळावरील मोटरपंप काढण्यासाठी व्यापक मोहिम राबविण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.सर्वांना पाणी मिळण्यासाठी पालिका प्रयत्न करित आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत: हून नळाला लावलेले मोटरपंप काढून घ्यावे. नळाचे पाणी टाक्यात घेऊन तेथून मोटरव्दारे पाण्याची उचल करावी. अन्यथा तपासणी मोहीम राबवून नळाला मोटर असलेल्यावर कडक कारवाई केली जाईल.-अतुल तराळे, नगराध्यक्ष.