शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

नळावरील मोटरपंप काढण्यासाठी कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:02 IST

शहरातील पाणी टंचाई तीव्र होत असल्याने प्रत्येक जण नळाच्या पाण्यावर लक्ष ठेवून आहे. अशातही आपल्या जास्त पाणी मिळावे या उद्देशाने अनेकांनी थेट नळालाच मोटरपंप लावल्यामुळे इतरांना पाणी मिळणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईत भर : गोंडप्लॉट भागात मोठ्या प्रमाणावर मोटारपंप बसविल्याचे निदर्शनास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील पाणी टंचाई तीव्र होत असल्याने प्रत्येक जण नळाच्या पाण्यावर लक्ष ठेवून आहे. अशातही आपल्या जास्त पाणी मिळावे या उद्देशाने अनेकांनी थेट नळालाच मोटरपंप लावल्यामुळे इतरांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. या आपलपोटेपणामुळे पाणी समस्या आणखीच गडद होत असल्याने पालिकेने मोटरपंप काढण्यासाठी कंबर कसली आहे.जलाशयातील पाण्याने तळ गाठल्यामुळे शहराला आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. पालिकेने नियोजन करुन पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करायला सुरुवात केली होती. मात्र जलाशयातच पाणी नसल्याने पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनीही आपल्याच जास्त पाणी मिळावे या उद्देशाने थेट नळालाच मोटर लावून पाणी घ्यायला सुरुवात केली. परिणामी पुढच्या घराला पाणी मिळत नसल्याने त्यांनीही नळावर मोटर लावली. असाच हा प्रकार वाढत गेल्याने बहुतांश घरी नळाला मीटर लावण्यात आले. यामुळे काहींच्या घरी पाण्याचा सुकाळ तर काहींच्या घरी दुष्काळ, अशीच परिस्थिती निर्माण झाली. याची माहिती घेण्याच्या उद्देशाने नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नंदनवार व कर्मचाऱ्यांसह शहरातील गोंडप्लॉट परिसरात शनिवारी नळ आल्यानंतर पाहणी केली. तर त्यांना नळावरील मोटारीची भीषणता लक्षात आली. दहापैकी चार घरी मोटर लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना सूचना देत मोटरपंप काढायला लावली. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी कारवाई टाळून स्वत: हून नळाला जोडलेली मोटर काढण्याची गरज आहे, असे मत नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी व्यक्त केले आहे.पालिकेच्या पुढाकाराला नगरसेवकांची बाधा?शहरातील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी नळावरील विद्युत मीटर काढणे गरजेचे आहे. यासाठी नगराध्यक्षांनी पुढाकार घेतल्याने याला आजी-माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. परंतु आपली व्होट बँक कायम ठेवण्यासाठी या कारवाईत बाधा येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पण, नागरिकांचा सर्वसमावेशक प्रश्न लक्षात घेता नळावरील मोटरपंप काढण्यासाठी व्यापक मोहिम राबविण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.सर्वांना पाणी मिळण्यासाठी पालिका प्रयत्न करित आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत: हून नळाला लावलेले मोटरपंप काढून घ्यावे. नळाचे पाणी टाक्यात घेऊन तेथून मोटरव्दारे पाण्याची उचल करावी. अन्यथा तपासणी मोहीम राबवून नळाला मोटर असलेल्यावर कडक कारवाई केली जाईल.-अतुल तराळे, नगराध्यक्ष.