शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

वाघाडी नाल्याला पुराचा धोका

By admin | Updated: June 29, 2015 02:37 IST

तालुक्यातील लहान आर्वी गावाला लागून असलेल्या वाघाडी नालात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.

आष्टी (शहीद) : तालुक्यातील लहान आर्वी गावाला लागून असलेल्या वाघाडी नालात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे पाणी वाहून जाताना अडथळा निर्माण होऊन पुराचा धोका वाढला आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे. लहान आर्वी गावाला लागून वाघाडी नाला आहे. सदर नाला गेल्या अनेक वर्षापासून बुजलेला आहे. त्यामुळे या पुलाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. तसेच या नाल्यात झाडे-झुडपे व गवतही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पाणी वाहून जाताना अडथळा निर्माण होतो. परिणामी गावांना धोका निर्माण झाला आहे. तसेच या नाल्यावरील पुलाची उंचीही कमी असल्याने पाऊस येताच पुलावरून पाणी वाहिऊ लागते. त्यामुळे या नाल्याचे खोलीकरण व रूंदीकरण करणे अत्यावश्यक झाले आहे. खोलीकरणासाठी लहान आर्वीचे सरपंच सुनील साबळे यांनी जिल्हाधिकारी वर्धा आणि तहसीलदार आष्टी यांना निवेदन दिले. परंतु प्रशासनाने साधी मौका पाहणीसद्धा केली नसल्याचे ग्रामस्थ व सरपंच सांगत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या नाल्याला दोन वेळा पूर आला. नाल्यामध्ये वाहून आलेला कचरा हा पुलाला अटकून पडला आहे. जेसीबी यंत्राच्या साहाय्याने सदर गाळ काढणे आवश्यक आहे. या संदर्भात तहसीलदारांसोबत चर्चाही करण्यात आली. यावेळी तुमचे काम होऊन जाईल, असे सांगण्यात आले. परंतु अद्याप काम झालेले नाही. तसेच उपविभागीय अभियंता (सा.बा.वि) यांच्याशी संपर्क केला असता, तुम्ही अंतोरा येथून जेसीबी घेवून या आणि काम करून घ्या, असा मोफतचा सल्ला देण्यात आला. नाल्यावरील पुलाला गाळ अडकल्याने पावसाचे पाणी अडून गावात शिरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच यामुळे मोठे नुकसान होण्याचाही धोका आहे. त्यामुळे यापुढे नाल्याच्या पुराने गावातील नागरिकांचे नुकसान झाल्यास तहसील प्रशासनास जबाबदार धरून ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरपंच सुनिल साबळे व ग्रामस्थांनी दिला आहे.(प्रतिनिधी)