शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

वाळलेल्या झाडांच्या नावावर होते मजुरीची उचल

By admin | Updated: January 2, 2017 00:06 IST

येथील पंचायत समिती स्तरावर राबविण्यात येत असलेल्या फळबाग योजनेत चांगलाच गौडबंगाल असल्याचे दिसून आले आहे.

फळबाग योजना : कारंजा तालुक्यात रोजगार हमी योजनेत ‘अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’ नाही तर ’पूर्णच आम्ही’ कारंजा (घा.) : येथील पंचायत समिती स्तरावर राबविण्यात येत असलेल्या फळबाग योजनेत चांगलाच गौडबंगाल असल्याचे दिसून आले आहे. लाभार्थ्यांना तुमच्या शेतातील झाडं वाळली असे सांगून त्यांच्या नावे रोजगार सेवककांकडून रकमेची उचल होत असल्याचा प्रकार येथे सुरू असल्याची ओरड शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या तक्रारीचा विचार केल्यास ही अफरातफर लाखो रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. या संदर्भात सावल येथील शेतकऱ्यांनी पंचायत समिती स्तरावर तक्रारी केल्या, तरी त्याचा कुठलाही उपयोग झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही या प्रकारापेक्षाही रोजगार हमीत पूर्णच आम्ही असा प्रकार येथे घडत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढेच नाही तर होत असलेल्या प्रकारात काम झालेल्या गावात नसलेला व्यक्त येथे मजूर म्हणून कामाला असल्याचे रोजगार सेवकांच्या कामांवरून दिसत आहे. यामुळे तालुक्यात झालेल्या प्रकारावर आळा घालण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. कारंजा तालुक्यात २०१२-१३ पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समिती स्तरावर फळबाग लागवड कार्यक्र म राबविण्यात येत आहे. प्रारंभी या योजनेत तालुक्यातील फक्त सात लाभार्थी व ४.९० ऐवढेच संत्रा फळपिकाचे लक्ष येथील पंचायत समितीने साध्य केले होते. हळुहळु या योजनेची व्याप्ती वाढत जावून २०१६-१७ पर्यंत या योजनेत १३ हजार ६५ लाभार्थी व त्यांचे एकूण क्षेत्र ११८१.१० हेक्टर झाले. या क्षेत्रात संत्रा, मोसंबी, कागदी लिंबु, डाळींब, सिताफळ व आंबा फळपिकांचा सहभाग आहे. या योजनेत एका शेतकऱ्यांला अंदाजे जवळपास १ लाख रुपयापर्यंतचे अनुदान तीन वर्षांच्या काळात मिळते. अफरातफरीत रोजगार सेवक महत्त्वाचा या योजनेत रोजगार सेवक हा मस्टर काढण्यापासून ते हजेरीची सर्वच कामे पाहतो. शेतकऱ्याला या योजनेचा लाभ तीन वर्षात द्यावयाचा असल्याने पहिल्या वर्षात जी रक्कम आहे. यात शेतकऱ्यांना केवळ पहिल्या वर्षाची रक्कम कशीबशी मिळते. येथूनच योजनेतील भ्रष्टाचार सुरू होतो. यात शेतकऱ्याला तुझ्या शेतातील फळझाडे वाळलेली आहे व आता तुला पुढील अनुदान मिळणार नाही, असे सांगण्यात येते; परंतु रोजगार सेवक व ईतर या योजनेत शक्कल लढवुन या शेतकऱ्यांच्या नावे मस्टर काढुन मजुरांना हाताशी धरुन रकमेची अफरातफर करीत आहेत. शेतकऱ्यांच्या या तक्रारीबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. डब्ल्यु. यावले यांना विचारणा केली असता त्यांनी आपण दिल्लीला असल्याचे सांगितले. या संदर्भात पंचायत समितीशी तसेच सावल येथील रोजगार सेवकाशी संपर्क साधा असे सांगितले. यावरून सावल येथील रोजगार सेवकाशी संपर्क साधला असता त्याचा भ्रमणध्वनी उत्तर देत नव्हता. ग्रामसभेतून यादी जाते पंचायत समितीत या योजनेत लाभ घेण्याकरिता सर्वप्रथम ग्रामपंचायतकडे अर्ज करून ग्रामसभेतून लाभार्थ्यांची निवड करून ती यादी पंचायत समितीला पुरविल्या जाते. येथूनच या योजनेचा प्रवास सुरू होतो. अलीकडे रोजगार सेवक, येथील आॅपरेटर, ते गटविकास अधिकारी सर्वच या योजनेत आर्थिक लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे. तांत्रिक दृष्ट्या कमजोर असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेची नेमकी माहिती नसल्याने गावातील हुशार रोजगार सेवकांना हाताशी धरुन या योजनेत वरिष्ठांकडून भ्रष्टाचार सुरु असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.