शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

गतवेळीच्या तुलनेत यंदा घटला मतदानाचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST

प्रत्येक नागरिकाने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत प्रत्यक्ष मतदान करावे, असे आवाहन समाजातील सर्व स्तरातून केले जाते. परंतु, यंदा गत वर्षीच्या तुलनेत कमी मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात आर्वी, देवळी, हिंगणघाट व देवळी हे चार विधानसभा क्षेत्र आहेत.

ठळक मुद्देवर्धा विधानसभा क्षेत्राचा आलेख उतरताच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. परंतु, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रत्यक्ष मतदानाचा टक्काच घटल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे गत तीन वर्षांपासून वर्धा विधानसभा क्षेत्राचा प्रत्यक्ष मतदानाच्या टक्केवारीचा आलेख उतरता असून निवडणूक विभागानेही विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.प्रत्येक नागरिकाने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत प्रत्यक्ष मतदान करावे, असे आवाहन समाजातील सर्व स्तरातून केले जाते. परंतु, यंदा गत वर्षीच्या तुलनेत कमी मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात आर्वी, देवळी, हिंगणघाट व देवळी हे चार विधानसभा क्षेत्र आहेत. आर्वी विधानसभा क्षेत्रात २००९ मध्ये ६७.३५ टक्के, २०१४ मध्ये ६८.१३ टक्के नागरिकांनी मतदान केले होते. तर यंदा ६७.२५ टक्के नागरिकांनी मतदान केले. देवळी विधानसभा मतदार क्षेत्रात २००९ मध्ये ६६.१८ टक्के, २०१४ मध्ये ६७.९२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर यंदा ६३.४९ टक्के नागरिकांनी मतदान केले. हिंगणघाट विधानसभा मतदार क्षेत्रात २००९ मध्ये ६७.७६ टक्के, २०१४ मध्ये ७१.७५ टक्के प्रत्यक्ष मतदान केले होते. तर यंदा ६४.५१ टक्के नागरिकांनी मतदान केले. तसेच वर्धा विधानसभा मतदार क्षेत्रात २००९ मध्ये ६०.७६ टक्के, २०१४ मध्ये ५८.१८ टक्के मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान केले होते. तर यंदा ५३.१४ टक्के नागरिकांनी मतदान केले.

टॅग्स :wardha-acवर्धा