शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

मतदान आटोपले, आज लागणार निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2022 22:06 IST

मतदानापूर्वीच अहिरवाडा येथील सात, तर पिंपरी येथील एका सदस्याची बिनविरोध निवड झाली आहे. रविवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून, सकाळी मतदानाची टक्केवारी फारच कमी होती. दुपारनंतर मतदानाची गती वाढली व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७८.२७ टक्के मतदान पूर्ण झाले. आता निकालाकडे लक्ष लागले असून, कोणाचे भाग्य उजळणार हे लवकरच कळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील आर्वी आणि वर्धा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी सकाळपासून मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासून सायंकाळपर्यंत शांततेत मतदान झाले असून, ७८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ग्रामपंचायतीतील सरपंच व सदस्यांचे भाग्य ईव्हीएम बंद झाले असून, सोमवारी मत मोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.वर्धा तालुक्यातील सालोड (हिरपूर), बोरगाव (ना.), आर्वी तालुक्यातील मांडला, जाम, सर्कसपूर, अहिरवाडा, हैबतपूर (पु.), मिर्झापूर (नेरी) व पिपरी भुतडा पुनर्वसन या ९ ग्रामपंचायतीकरिता निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. या सर्व ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाकरिता २७ उमेदवार रिंगणात आहे. सालोड येथे सरपंच पदाकरिता ५, तर सदस्य पदांकरिता ५०, नांदोरा येथे सरपंच पदाकरिता २, तर सदस्य पदांकरिता १४,  सर्कसपूर येथे सरपंच पदाकरिता ३, तर सदस्य पदांकरिता १४, मांडला येथे सरपंच पदाकरिता ५, तर सदस्य पदाकरिता १७, अहिरवाडा येथे सरपंच पदाकरिता २, हैबतपूर (पु.) येथे सरपंच पदाकरिता ३, सदस्य पदांकरिता १४, जाम (पु.) सरपंच पदाकरिता ३, सदस्य पदांकरिता १४, पिपरी (पु.) सरपंच पदाकरिता २, तर १३ सदस्य पदांकरिता, मिर्झापूर (ने.) येथे सरपंच पदाकरिता २ उमदेवार, तर सदस्यांकरिता १४ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानापूर्वीच अहिरवाडा येथील सात, तर पिंपरी येथील एका सदस्याची बिनविरोध निवड झाली आहे. रविवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून, सकाळी मतदानाची टक्केवारी फारच कमी होती. दुपारनंतर मतदानाची गती वाढली व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७८.२७ टक्के मतदान पूर्ण झाले. आता निकालाकडे लक्ष लागले असून, कोणाचे भाग्य उजळणार हे लवकरच कळणार आहे.मतदान केद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त- ३३ मतदान केंद्रांवरून मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. या ग्रामपंचायतींमध्ये १० हजार ८१९ मतदार संख्या होती. त्यातील ८ हजार ४६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या सर्व केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी याकरिता पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.  याकरिता अधिकाऱ्यांचेही भरारी पथक तयार करण्यात आले होते. या पथकानेही सतत मतदान केंद्राला भेटी देऊन आढावा घेतला. त्यामुळे ३३ मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले.

तहसील कार्यालयात होणार आज मतमोजनी- जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील दोन तर आर्वी तालुक्यातील सात ग्रामपंचायतीकरिता रविवारी मतमोजणी आटोपली असून आता सोमवारी सकाळी दोन्ही तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सोमवारी तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहावयास मिळणार आहे.

 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक