शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

मतदान आटोपले, आज लागणार निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2022 22:06 IST

मतदानापूर्वीच अहिरवाडा येथील सात, तर पिंपरी येथील एका सदस्याची बिनविरोध निवड झाली आहे. रविवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून, सकाळी मतदानाची टक्केवारी फारच कमी होती. दुपारनंतर मतदानाची गती वाढली व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७८.२७ टक्के मतदान पूर्ण झाले. आता निकालाकडे लक्ष लागले असून, कोणाचे भाग्य उजळणार हे लवकरच कळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील आर्वी आणि वर्धा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी सकाळपासून मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासून सायंकाळपर्यंत शांततेत मतदान झाले असून, ७८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ग्रामपंचायतीतील सरपंच व सदस्यांचे भाग्य ईव्हीएम बंद झाले असून, सोमवारी मत मोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.वर्धा तालुक्यातील सालोड (हिरपूर), बोरगाव (ना.), आर्वी तालुक्यातील मांडला, जाम, सर्कसपूर, अहिरवाडा, हैबतपूर (पु.), मिर्झापूर (नेरी) व पिपरी भुतडा पुनर्वसन या ९ ग्रामपंचायतीकरिता निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. या सर्व ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाकरिता २७ उमेदवार रिंगणात आहे. सालोड येथे सरपंच पदाकरिता ५, तर सदस्य पदांकरिता ५०, नांदोरा येथे सरपंच पदाकरिता २, तर सदस्य पदांकरिता १४,  सर्कसपूर येथे सरपंच पदाकरिता ३, तर सदस्य पदांकरिता १४, मांडला येथे सरपंच पदाकरिता ५, तर सदस्य पदाकरिता १७, अहिरवाडा येथे सरपंच पदाकरिता २, हैबतपूर (पु.) येथे सरपंच पदाकरिता ३, सदस्य पदांकरिता १४, जाम (पु.) सरपंच पदाकरिता ३, सदस्य पदांकरिता १४, पिपरी (पु.) सरपंच पदाकरिता २, तर १३ सदस्य पदांकरिता, मिर्झापूर (ने.) येथे सरपंच पदाकरिता २ उमदेवार, तर सदस्यांकरिता १४ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानापूर्वीच अहिरवाडा येथील सात, तर पिंपरी येथील एका सदस्याची बिनविरोध निवड झाली आहे. रविवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून, सकाळी मतदानाची टक्केवारी फारच कमी होती. दुपारनंतर मतदानाची गती वाढली व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७८.२७ टक्के मतदान पूर्ण झाले. आता निकालाकडे लक्ष लागले असून, कोणाचे भाग्य उजळणार हे लवकरच कळणार आहे.मतदान केद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त- ३३ मतदान केंद्रांवरून मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. या ग्रामपंचायतींमध्ये १० हजार ८१९ मतदार संख्या होती. त्यातील ८ हजार ४६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या सर्व केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी याकरिता पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.  याकरिता अधिकाऱ्यांचेही भरारी पथक तयार करण्यात आले होते. या पथकानेही सतत मतदान केंद्राला भेटी देऊन आढावा घेतला. त्यामुळे ३३ मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले.

तहसील कार्यालयात होणार आज मतमोजनी- जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील दोन तर आर्वी तालुक्यातील सात ग्रामपंचायतीकरिता रविवारी मतमोजणी आटोपली असून आता सोमवारी सकाळी दोन्ही तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सोमवारी तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहावयास मिळणार आहे.

 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक