शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
2
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
3
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
4
अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
5
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
6
Travel : स्वप्नातलं शहर की वास्तवातली जादू? पाण्यावर तरंगणाऱ्या वेनिस शहरात 'असा' करा स्वस्तात प्रवास!
7
Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
8
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
9
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
10
आता १२५ दिवस रोजगाराची गॅरेंटी! पाहा G RAM G विधेयकामुळे ग्रामीण भागात कसा होणार फायदा?
11
मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाने पलटवार! ठाकरे बंधूंच्या रणनीतीला शह देणार, भाजपानं आखला प्लॅन
12
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
13
Nagpur Municipal Election: महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा?
14
टीम इंडियाविरुद्ध चुलत भाऊ कॅप्टन झाला; दुसरीकडे संधी मिळेना म्हणून स्टार ऑलराउंडरनं क्रिकेट सोडलं
15
Health Tips: गुडघेदुखीने त्रस्त आहात? मग 'रिव्हर्स वॉकिंग' करून पहा; २ मिनिटांत मिळेल आराम!
16
भाजपविरोधात शिंदेसेना-अजित पवार गटाची युती, महापालिकेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता
17
FD-RD काहीच नाही! एलआयसीच्या 'या' योजनेत २४३ रुपयांची गुंतवणूक करा, मिळेल ५४ लाखांचा फंड
18
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
19
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
20
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांतर करणाऱ्यांना मतदारांनी लाथाडले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 16:00 IST

सत्तेच्या लालसेपोटी पक्ष बदलविणाऱ्यांना मतदारांनी लाथाडले पाहिजे, अशी बोचरी टीका आमदार बच्चू कडू यांनी वर्धा येथे केली.

ठळक मुद्देराधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर डागली तोफ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निवडणुका तोंडावर येताच अनेक नेते पक्ष बदलवितात. इतकेच नव्हे, तर ते सत्ता भोगण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. हे लोक संधिसाधू असून त्यांना मतदारांनीच धडा शिकवायला हवा. सत्तेच्या लालसेपोटी पक्ष बदलविणाऱ्यांना मतदारांनी लाथाडले पाहिजे, अशी बोचरी टीका आमदार बच्चू कडू यांनी वर्धा येथे केली.प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात आले. वर्ध्यात आंदोलनाचे नेतृत्व आ. बच्चू कडू, प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांनी केले. यावेळी त्यांनी सत्तेसाठी पक्ष बदलविणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर ही बोचरी टीका केली.प्रहार मागील १५ वर्षांपासून विविध प्रश्न घेऊन संघर्ष करीत आहे. आम्ही ज्या उद्देशासाठी एकत्रित आलो, त्या उद्देशाला कधीही विकेंद्रित होऊ दिले नाही. सत्तेच्या हव्यासापोटी ज्या कुठल्या पक्षाचे राजकीय पुढारी पक्ष बदलवितात, अशा दलबदलूंना निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांनी लाथाडले पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील हे पाच वर्षे विरोधी पक्ष नेते राहिले; पण काँग्रेसचा विरोधी पक्ष नेताच भाजपात जात आहे. त्यामुळे काँग्रेस मोडून टाकायला हवी आणि राहुल गांधी यांच्यासह सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपात सामावून घ्यायला पाहिजे, म्हणजे दुसरा राजकीय पक्षच शिल्लक राहणार नाही. आता आम्ही ठरवतोय की पक्षाचे झेंडेच शेतात पेरावे लागेल. कारण शेतात पीक पिकविल्याने शेतकऱ्यांना काही मिळत नाही. एकूणच शेतात पक्षाचे झेंडे पेरून त्यातच समाधानी राहावे लागेल, अशी आजची अवस्था असल्याचेही यावेळी आ. बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

जनादेश यात्रेमुळे पैशाची उधळवपट्टी होईलजनादेश आहे की ईव्हीएम, हे पहिले तपासले पाहिजे. यात्रेपेक्षा लोकांचे शेतकऱ्यांचे काही समाधान होईल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टीच होणार आहे. आचार संहितेमध्ये ज्या अडचणी येतात, त्या आताच पूर्ण केल्या जाऊन नागरिकांचे लक्ष वेधण्याचे काम या निमित्ताने केले जाणार आहे. सध्या शेतकरी आत्महत्या करीत आहे. इकडे आमदारांची मेगा भरती सुरू आहे. परंतु, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांवर तलवार चालविली जात आहे, असल्याचे यावेळी आ. बच्चू कडू यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी भाजप सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचा खरपूस समाचार घेतला.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू