शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

पक्षांतर करणाऱ्यांना मतदारांनी लाथाडले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 16:00 IST

सत्तेच्या लालसेपोटी पक्ष बदलविणाऱ्यांना मतदारांनी लाथाडले पाहिजे, अशी बोचरी टीका आमदार बच्चू कडू यांनी वर्धा येथे केली.

ठळक मुद्देराधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर डागली तोफ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निवडणुका तोंडावर येताच अनेक नेते पक्ष बदलवितात. इतकेच नव्हे, तर ते सत्ता भोगण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. हे लोक संधिसाधू असून त्यांना मतदारांनीच धडा शिकवायला हवा. सत्तेच्या लालसेपोटी पक्ष बदलविणाऱ्यांना मतदारांनी लाथाडले पाहिजे, अशी बोचरी टीका आमदार बच्चू कडू यांनी वर्धा येथे केली.प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात आले. वर्ध्यात आंदोलनाचे नेतृत्व आ. बच्चू कडू, प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांनी केले. यावेळी त्यांनी सत्तेसाठी पक्ष बदलविणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर ही बोचरी टीका केली.प्रहार मागील १५ वर्षांपासून विविध प्रश्न घेऊन संघर्ष करीत आहे. आम्ही ज्या उद्देशासाठी एकत्रित आलो, त्या उद्देशाला कधीही विकेंद्रित होऊ दिले नाही. सत्तेच्या हव्यासापोटी ज्या कुठल्या पक्षाचे राजकीय पुढारी पक्ष बदलवितात, अशा दलबदलूंना निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांनी लाथाडले पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील हे पाच वर्षे विरोधी पक्ष नेते राहिले; पण काँग्रेसचा विरोधी पक्ष नेताच भाजपात जात आहे. त्यामुळे काँग्रेस मोडून टाकायला हवी आणि राहुल गांधी यांच्यासह सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपात सामावून घ्यायला पाहिजे, म्हणजे दुसरा राजकीय पक्षच शिल्लक राहणार नाही. आता आम्ही ठरवतोय की पक्षाचे झेंडेच शेतात पेरावे लागेल. कारण शेतात पीक पिकविल्याने शेतकऱ्यांना काही मिळत नाही. एकूणच शेतात पक्षाचे झेंडे पेरून त्यातच समाधानी राहावे लागेल, अशी आजची अवस्था असल्याचेही यावेळी आ. बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

जनादेश यात्रेमुळे पैशाची उधळवपट्टी होईलजनादेश आहे की ईव्हीएम, हे पहिले तपासले पाहिजे. यात्रेपेक्षा लोकांचे शेतकऱ्यांचे काही समाधान होईल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टीच होणार आहे. आचार संहितेमध्ये ज्या अडचणी येतात, त्या आताच पूर्ण केल्या जाऊन नागरिकांचे लक्ष वेधण्याचे काम या निमित्ताने केले जाणार आहे. सध्या शेतकरी आत्महत्या करीत आहे. इकडे आमदारांची मेगा भरती सुरू आहे. परंतु, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांवर तलवार चालविली जात आहे, असल्याचे यावेळी आ. बच्चू कडू यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी भाजप सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचा खरपूस समाचार घेतला.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू