शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

पक्षांतर करणाऱ्यांना मतदारांनी लाथाडले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 16:00 IST

सत्तेच्या लालसेपोटी पक्ष बदलविणाऱ्यांना मतदारांनी लाथाडले पाहिजे, अशी बोचरी टीका आमदार बच्चू कडू यांनी वर्धा येथे केली.

ठळक मुद्देराधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर डागली तोफ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निवडणुका तोंडावर येताच अनेक नेते पक्ष बदलवितात. इतकेच नव्हे, तर ते सत्ता भोगण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. हे लोक संधिसाधू असून त्यांना मतदारांनीच धडा शिकवायला हवा. सत्तेच्या लालसेपोटी पक्ष बदलविणाऱ्यांना मतदारांनी लाथाडले पाहिजे, अशी बोचरी टीका आमदार बच्चू कडू यांनी वर्धा येथे केली.प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात आले. वर्ध्यात आंदोलनाचे नेतृत्व आ. बच्चू कडू, प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांनी केले. यावेळी त्यांनी सत्तेसाठी पक्ष बदलविणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर ही बोचरी टीका केली.प्रहार मागील १५ वर्षांपासून विविध प्रश्न घेऊन संघर्ष करीत आहे. आम्ही ज्या उद्देशासाठी एकत्रित आलो, त्या उद्देशाला कधीही विकेंद्रित होऊ दिले नाही. सत्तेच्या हव्यासापोटी ज्या कुठल्या पक्षाचे राजकीय पुढारी पक्ष बदलवितात, अशा दलबदलूंना निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांनी लाथाडले पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील हे पाच वर्षे विरोधी पक्ष नेते राहिले; पण काँग्रेसचा विरोधी पक्ष नेताच भाजपात जात आहे. त्यामुळे काँग्रेस मोडून टाकायला हवी आणि राहुल गांधी यांच्यासह सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपात सामावून घ्यायला पाहिजे, म्हणजे दुसरा राजकीय पक्षच शिल्लक राहणार नाही. आता आम्ही ठरवतोय की पक्षाचे झेंडेच शेतात पेरावे लागेल. कारण शेतात पीक पिकविल्याने शेतकऱ्यांना काही मिळत नाही. एकूणच शेतात पक्षाचे झेंडे पेरून त्यातच समाधानी राहावे लागेल, अशी आजची अवस्था असल्याचेही यावेळी आ. बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

जनादेश यात्रेमुळे पैशाची उधळवपट्टी होईलजनादेश आहे की ईव्हीएम, हे पहिले तपासले पाहिजे. यात्रेपेक्षा लोकांचे शेतकऱ्यांचे काही समाधान होईल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टीच होणार आहे. आचार संहितेमध्ये ज्या अडचणी येतात, त्या आताच पूर्ण केल्या जाऊन नागरिकांचे लक्ष वेधण्याचे काम या निमित्ताने केले जाणार आहे. सध्या शेतकरी आत्महत्या करीत आहे. इकडे आमदारांची मेगा भरती सुरू आहे. परंतु, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांवर तलवार चालविली जात आहे, असल्याचे यावेळी आ. बच्चू कडू यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी भाजप सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचा खरपूस समाचार घेतला.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू