शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत कंपनीच्या कृषिपंप थकबाकीसाठी उलट्या बोंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 05:00 IST

प्रत्यक्ष रीडिंग घेऊन देयक आकारण्याची अनेक दिवसांपासून मागणी असतानाही कंपनी आपल्या धोरणात बदल न करता शेतकऱ्यांनी देयक थकविल्याचा उलट्या बोंबा मारतात. कोणतेही रीडिंग न घेताच शेतकऱ्यांना कृषिपंपाचे भरमसाठ देयक  आकारुन शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. थकबाकी असल्याचे कारण पुढे करुन शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे.

फनिंद्र रघाटाटेलोकमत न्यूज नेटवर्करोहणा : विद्युत वितरण कंपनीने भरपावसाळ्यात एकही दिवस कृषिपंप लावला नसतानाही शेकडो युनिट वापरल्याचा कांगावा करीत हजारोंचे देयक आकारले. पावसाळ्यात सतत पाऊस पडल्याने एकही दिवस पिकाला पाणी देण्याची गरज पडली नाही. केवळ फवारणीकरिता पाणी काढण्यासाठीच कृषिपंप लावावा लागला. असे असतानाही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टेबलवर बसून उन्हाळ्यात जेवढा वापर होतो तेवढे देयक थोपवून शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. प्रत्यक्ष रीडिंग घेऊन देयक आकारण्याची अनेक दिवसांपासून मागणी असतानाही कंपनी आपल्या धोरणात बदल न करता शेतकऱ्यांनी देयक थकविल्याचा उलट्या बोंबा मारतात. कोणतेही रीडिंग न घेताच शेतकऱ्यांना कृषिपंपाचे भरमसाठ देयक  आकारुन शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. थकबाकी असल्याचे कारण पुढे करुन शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. विद्युत कंपनीने वापरलेल्या युनिटचे देयक आकारले तर शेतकरीही नियमितपणे देयकाचा भरणा करतो. परंतु कंपनीकडून धोरणात सुधारणा न करता शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार चालविल्याची ओरड शेतकरी करीत आहे. असंख्य शेतकऱ्यांना दंड, व्याज व इतर आकार धरून ५० हजार रुपयांच्यावर देयक आल्याचे सांगितले जात आहे. अतिपावसाने सर्वच पिकांचे नुकसान झाले असून लावलेला खर्चही भरून निघण्याची शक्यता नाही. अशातच देयकाच्या वसुलीची सक्ती केली जात आहे. यातून विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांच्यात संघर्ष निर्माण होत आहे. विद्युत देयकाच्या थकबाकीसाठी  शेतकरी जबाबदार नसून कंपनीचे ‘हम करे सो कायदा’ हे धोरण जबाबदार असल्याचे शेतकरी ठामपणे सांगत आहेत.

नागरिकांची मोठी संख्या असताना घरगुती देयक रीडिंगप्रमाणे दिल्या जातात. तर तुलनेने कृषिपंपधारकांची संख्या कमी असतानाही प्रत्यक्ष रीडिंग न घेता कार्यालयात बसूनच देयक आकारले जाते. ही बाब शेतकऱ्यांकरिता आर्थिक कोंडी करणारी आणि देशोधडीला लावणारी आहे. यात विद्युत वितरण कंपनीने सुधारणा करण्याची गरज आहे. दिलीप पांडे, शेतकरी,दिघी 

टॅग्स :electricityवीजagricultureशेती