शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जिल्ह्यात सर्वत्र विठूनामाचा गजर...

By admin | Updated: July 16, 2016 02:19 IST

जनी म्हणे नामदेवासी, चला जाऊ पंढरीसी... हा अभंग जनाबाईची पांढरपूरला जाण्याची तळमळ अत्यंत कमी शब्दात व्यक्त करतो.

वर्धा विठ्ठलमय : पीक पाणी व समृद्धीसाठी विठूरायाला भक्तांचे साकडे वर्धा : जनी म्हणे नामदेवासी, चला जाऊ पंढरीसी... हा अभंग जनाबाईची पांढरपूरला जाण्याची तळमळ अत्यंत कमी शब्दात व्यक्त करतो. अवघा महाराष्ट्र आषाढी एकादशीला शुक्रवारी पंढरीच्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी चंद्रभागेच्या तिरी एकवटो. पण प्रत्येकालाच पंढरपूरला जाणे शक्य होतेच असे नाही. विठ्ठलाच्या दर्शनाची आस तर सर्वांनाच आहे. जिल्ह्यातील सर्वच विठ्ठल मंदिरे विठूनामाच्या गजरात न्हाऊन निघाली होती. अवघी वर्धानगरीच विठ्ठलमय झाल्याचे चित्र आज होते. पीक पाणी चांगले होऊ दे हेच साकडे अंतरमनातून प्रत्येकजण घालत होता. विठ्ठल हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी पायी दिंडीने पंढरपूरला दर्शनाला जातात. आषाढी एकादशीच्या आसपासच खरीपाची पेरणी होत असते. गत काही वर्षांत आषाढी एकादशी येऊनही पावसाचा पत्ता नव्हता. अवघ्या महाराष्ट्रावर दुष्काळी परिस्थितीची दाट सावली पसरली होती. चंद्रभागेचे पात्रही कोरडेठाक होते. भक्त विठ्ठलाला साकडे घालून थकल्यावर कुठे पावसाला सुरुवात झाली होती. पण निसर्गाने साथ न दिल्याने गेली दोन ते तीन वर्ष शेतकरी वर्गाला अत्यल्प उत्पादनातच समाधान मानावे लागले. यंदा मात्र आषाढी एकादशीच्या काही दिवसांअगोदरच राज्यभर पेरणीयोग्य पाऊस झाला. नदी नाले भरून वाहू लागले. विहिरींची पाणीपातळीही वाढली. त्यामुळे यंदा विठ्ठल पावला असे वारकरी बोलतात. या वर्षी पुढेही पावसाने साथ द्यावी, पिकांची वाढ चांगली व्हावी, त्यावर रोगराई पसरू नये, पाणीटंचाई भासू नये, शेतकऱ्यांची कोठारं धान्याने भरावी, अवघ्या देशात सुबत्ता यावी, कसल्याही गोष्टीची मानवाला कमतरता भासू नये असे साकडे भक्त विठूरायाला घालत असल्याचे दिसून आले. गावागावांतील विठ्ठल मंदिरात भक्तांची सकाळपासूनच गर्दी झालेली दिसत होती. गावागावांमध्ये विठ्ठलनामाच्या गजरात हाती भगवी पताका घेऊन नामधून निघाली होती. वर्धा शहरातील बडे चौकातील विठ्ठल मंदिरात तर सकाळपासून भक्तांची रीघ लागली होती. वारकरी महिला मंडळातील महिलाही सकाळपासूनच हरिनामाच्या गजरात रंगून गेल्या होत्या. प्रती पंढरीत उसळली भाविकांची गर्दी घोराड - बोरतिरावर वसलेल्या व संताच्या वास्तव्याने तिर्थक्षेत्रच नव्हे तर प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोराड येथे आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी उसळली होती. घोराड येथून पंढरपूरला दोन मार्गाने दोन दिंड्या पोहचल्या आहे. यात अनेक वारकरी सहभागी आहे. संत केजाजी महाराज यांनी १५० वर्षांअगोदर सुरू केलेल्या धार्मिक प्रथा व परंपरा घोराडचे नागरिक व त्यांच्या प्रती श्रद्धा असणारे असंख्य भाविक भक्तगण आजही चालवत आहेत. ४त्यामुळेच आज आषाढी एकादशीला पहाटेच्या वेळेस विठ्ठल रूख्माईची महापूजा सकाळी आरती व त्यानंतर दर पंधरवाडी एकादशीला निघणारी दिंडी नगर प्रदक्षिणा पूर्ण केली दुपारी मंदिरातून निघालेल्या टाळ मृदुंगाचा निनाद, भगव्या पताका घेवून परंपरेनुसार पंचक्रोशी प्रदक्षिणा पूर्ण करून सायंकाळच्या सुमारास मंदिर परिसरात पोहचली. या दिंडीत गावातील नागरिक, युवक, महिला व भाविक भक्तगणांनी सहभाग घेतला. सकाळपासून तर रात्रीपर्यंत भाविकांनी विठ्ठल रूख्मीणीचे दर्शन घेतले. यामुळे भाविकांची येथे गर्दी जमली होती.