शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वत्र विठूनामाचा गजर...

By admin | Updated: July 16, 2016 02:19 IST

जनी म्हणे नामदेवासी, चला जाऊ पंढरीसी... हा अभंग जनाबाईची पांढरपूरला जाण्याची तळमळ अत्यंत कमी शब्दात व्यक्त करतो.

वर्धा विठ्ठलमय : पीक पाणी व समृद्धीसाठी विठूरायाला भक्तांचे साकडे वर्धा : जनी म्हणे नामदेवासी, चला जाऊ पंढरीसी... हा अभंग जनाबाईची पांढरपूरला जाण्याची तळमळ अत्यंत कमी शब्दात व्यक्त करतो. अवघा महाराष्ट्र आषाढी एकादशीला शुक्रवारी पंढरीच्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी चंद्रभागेच्या तिरी एकवटो. पण प्रत्येकालाच पंढरपूरला जाणे शक्य होतेच असे नाही. विठ्ठलाच्या दर्शनाची आस तर सर्वांनाच आहे. जिल्ह्यातील सर्वच विठ्ठल मंदिरे विठूनामाच्या गजरात न्हाऊन निघाली होती. अवघी वर्धानगरीच विठ्ठलमय झाल्याचे चित्र आज होते. पीक पाणी चांगले होऊ दे हेच साकडे अंतरमनातून प्रत्येकजण घालत होता. विठ्ठल हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी पायी दिंडीने पंढरपूरला दर्शनाला जातात. आषाढी एकादशीच्या आसपासच खरीपाची पेरणी होत असते. गत काही वर्षांत आषाढी एकादशी येऊनही पावसाचा पत्ता नव्हता. अवघ्या महाराष्ट्रावर दुष्काळी परिस्थितीची दाट सावली पसरली होती. चंद्रभागेचे पात्रही कोरडेठाक होते. भक्त विठ्ठलाला साकडे घालून थकल्यावर कुठे पावसाला सुरुवात झाली होती. पण निसर्गाने साथ न दिल्याने गेली दोन ते तीन वर्ष शेतकरी वर्गाला अत्यल्प उत्पादनातच समाधान मानावे लागले. यंदा मात्र आषाढी एकादशीच्या काही दिवसांअगोदरच राज्यभर पेरणीयोग्य पाऊस झाला. नदी नाले भरून वाहू लागले. विहिरींची पाणीपातळीही वाढली. त्यामुळे यंदा विठ्ठल पावला असे वारकरी बोलतात. या वर्षी पुढेही पावसाने साथ द्यावी, पिकांची वाढ चांगली व्हावी, त्यावर रोगराई पसरू नये, पाणीटंचाई भासू नये, शेतकऱ्यांची कोठारं धान्याने भरावी, अवघ्या देशात सुबत्ता यावी, कसल्याही गोष्टीची मानवाला कमतरता भासू नये असे साकडे भक्त विठूरायाला घालत असल्याचे दिसून आले. गावागावांतील विठ्ठल मंदिरात भक्तांची सकाळपासूनच गर्दी झालेली दिसत होती. गावागावांमध्ये विठ्ठलनामाच्या गजरात हाती भगवी पताका घेऊन नामधून निघाली होती. वर्धा शहरातील बडे चौकातील विठ्ठल मंदिरात तर सकाळपासून भक्तांची रीघ लागली होती. वारकरी महिला मंडळातील महिलाही सकाळपासूनच हरिनामाच्या गजरात रंगून गेल्या होत्या. प्रती पंढरीत उसळली भाविकांची गर्दी घोराड - बोरतिरावर वसलेल्या व संताच्या वास्तव्याने तिर्थक्षेत्रच नव्हे तर प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोराड येथे आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी उसळली होती. घोराड येथून पंढरपूरला दोन मार्गाने दोन दिंड्या पोहचल्या आहे. यात अनेक वारकरी सहभागी आहे. संत केजाजी महाराज यांनी १५० वर्षांअगोदर सुरू केलेल्या धार्मिक प्रथा व परंपरा घोराडचे नागरिक व त्यांच्या प्रती श्रद्धा असणारे असंख्य भाविक भक्तगण आजही चालवत आहेत. ४त्यामुळेच आज आषाढी एकादशीला पहाटेच्या वेळेस विठ्ठल रूख्माईची महापूजा सकाळी आरती व त्यानंतर दर पंधरवाडी एकादशीला निघणारी दिंडी नगर प्रदक्षिणा पूर्ण केली दुपारी मंदिरातून निघालेल्या टाळ मृदुंगाचा निनाद, भगव्या पताका घेवून परंपरेनुसार पंचक्रोशी प्रदक्षिणा पूर्ण करून सायंकाळच्या सुमारास मंदिर परिसरात पोहचली. या दिंडीत गावातील नागरिक, युवक, महिला व भाविक भक्तगणांनी सहभाग घेतला. सकाळपासून तर रात्रीपर्यंत भाविकांनी विठ्ठल रूख्मीणीचे दर्शन घेतले. यामुळे भाविकांची येथे गर्दी जमली होती.