शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

जिल्ह्यात सर्वत्र विठूनामाचा गजर...

By admin | Updated: July 16, 2016 02:19 IST

जनी म्हणे नामदेवासी, चला जाऊ पंढरीसी... हा अभंग जनाबाईची पांढरपूरला जाण्याची तळमळ अत्यंत कमी शब्दात व्यक्त करतो.

वर्धा विठ्ठलमय : पीक पाणी व समृद्धीसाठी विठूरायाला भक्तांचे साकडे वर्धा : जनी म्हणे नामदेवासी, चला जाऊ पंढरीसी... हा अभंग जनाबाईची पांढरपूरला जाण्याची तळमळ अत्यंत कमी शब्दात व्यक्त करतो. अवघा महाराष्ट्र आषाढी एकादशीला शुक्रवारी पंढरीच्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी चंद्रभागेच्या तिरी एकवटो. पण प्रत्येकालाच पंढरपूरला जाणे शक्य होतेच असे नाही. विठ्ठलाच्या दर्शनाची आस तर सर्वांनाच आहे. जिल्ह्यातील सर्वच विठ्ठल मंदिरे विठूनामाच्या गजरात न्हाऊन निघाली होती. अवघी वर्धानगरीच विठ्ठलमय झाल्याचे चित्र आज होते. पीक पाणी चांगले होऊ दे हेच साकडे अंतरमनातून प्रत्येकजण घालत होता. विठ्ठल हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी पायी दिंडीने पंढरपूरला दर्शनाला जातात. आषाढी एकादशीच्या आसपासच खरीपाची पेरणी होत असते. गत काही वर्षांत आषाढी एकादशी येऊनही पावसाचा पत्ता नव्हता. अवघ्या महाराष्ट्रावर दुष्काळी परिस्थितीची दाट सावली पसरली होती. चंद्रभागेचे पात्रही कोरडेठाक होते. भक्त विठ्ठलाला साकडे घालून थकल्यावर कुठे पावसाला सुरुवात झाली होती. पण निसर्गाने साथ न दिल्याने गेली दोन ते तीन वर्ष शेतकरी वर्गाला अत्यल्प उत्पादनातच समाधान मानावे लागले. यंदा मात्र आषाढी एकादशीच्या काही दिवसांअगोदरच राज्यभर पेरणीयोग्य पाऊस झाला. नदी नाले भरून वाहू लागले. विहिरींची पाणीपातळीही वाढली. त्यामुळे यंदा विठ्ठल पावला असे वारकरी बोलतात. या वर्षी पुढेही पावसाने साथ द्यावी, पिकांची वाढ चांगली व्हावी, त्यावर रोगराई पसरू नये, पाणीटंचाई भासू नये, शेतकऱ्यांची कोठारं धान्याने भरावी, अवघ्या देशात सुबत्ता यावी, कसल्याही गोष्टीची मानवाला कमतरता भासू नये असे साकडे भक्त विठूरायाला घालत असल्याचे दिसून आले. गावागावांतील विठ्ठल मंदिरात भक्तांची सकाळपासूनच गर्दी झालेली दिसत होती. गावागावांमध्ये विठ्ठलनामाच्या गजरात हाती भगवी पताका घेऊन नामधून निघाली होती. वर्धा शहरातील बडे चौकातील विठ्ठल मंदिरात तर सकाळपासून भक्तांची रीघ लागली होती. वारकरी महिला मंडळातील महिलाही सकाळपासूनच हरिनामाच्या गजरात रंगून गेल्या होत्या. प्रती पंढरीत उसळली भाविकांची गर्दी घोराड - बोरतिरावर वसलेल्या व संताच्या वास्तव्याने तिर्थक्षेत्रच नव्हे तर प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोराड येथे आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी उसळली होती. घोराड येथून पंढरपूरला दोन मार्गाने दोन दिंड्या पोहचल्या आहे. यात अनेक वारकरी सहभागी आहे. संत केजाजी महाराज यांनी १५० वर्षांअगोदर सुरू केलेल्या धार्मिक प्रथा व परंपरा घोराडचे नागरिक व त्यांच्या प्रती श्रद्धा असणारे असंख्य भाविक भक्तगण आजही चालवत आहेत. ४त्यामुळेच आज आषाढी एकादशीला पहाटेच्या वेळेस विठ्ठल रूख्माईची महापूजा सकाळी आरती व त्यानंतर दर पंधरवाडी एकादशीला निघणारी दिंडी नगर प्रदक्षिणा पूर्ण केली दुपारी मंदिरातून निघालेल्या टाळ मृदुंगाचा निनाद, भगव्या पताका घेवून परंपरेनुसार पंचक्रोशी प्रदक्षिणा पूर्ण करून सायंकाळच्या सुमारास मंदिर परिसरात पोहचली. या दिंडीत गावातील नागरिक, युवक, महिला व भाविक भक्तगणांनी सहभाग घेतला. सकाळपासून तर रात्रीपर्यंत भाविकांनी विठ्ठल रूख्मीणीचे दर्शन घेतले. यामुळे भाविकांची येथे गर्दी जमली होती.