शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी

By admin | Updated: July 5, 2017 00:20 IST

हाती वीणा, माथी टिळा.. डोक्यावर तुळशी वृदांवन आणि मुखी विठ्ठल... विठ्ठल... जय हरी.. चा जयघोष, असे चित्र येथील विठ्ठल मंदिरात असल्याचे दिसून आले आहे.

आषाढी एकादशी : उत्तम पीक आणि पावसाकरिता विठ्ठलाला साकडे लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हाती वीणा, माथी टिळा.. डोक्यावर तुळशी वृदांवन आणि मुखी विठ्ठल... विठ्ठल... जय हरी.. चा जयघोष, असे चित्र येथील विठ्ठल मंदिरात असल्याचे दिसून आले आहे. असेच दृष्य विदर्भाची प्रतीपंढरी म्हणून ओळख असलेल्या घोराड येथे होते. आषाढी एकादशीला जिल्ह्यात अनेकांनी विठुरायाला आलेली संकटं सोडविण्याकरिता साकडे घातले. गत काही वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला. सध्या अनियमित पावसामुळे काही अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. या स्थितीवर मात करण्याकरिता यंदा जिल्ह्यात मुबलक पाऊस आणि उत्तम पीक व्हावे असे म्हणत वर्धेकर मंगळवारी आषाढी एकादशीला विठ्ठलासमोर नतमस्तक झाले. महाराष्ट्राचे दैवत पंढरपूरचा विठुराया. आषाढी एकादशीला याच विठूरायाच्या दर्शनाकरिता वारकऱ्यांची गर्दी असते. वर्धेतील विठ्ठल मंदिरातही सकाळपासूनच तशी गर्दी दिसून आली. सेलू तालुक्यात घोराड नगरीला प्रती पंढरपूर म्हणून ओळखले जाते. येथील केजाजी महाराजांच्या मंदिरातही सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे दिसून आले आहे. या व्यतिरिक्त हिंगणघाट तालुक्यातील वणा नदीच्या तिरावर असलेल्या भव्य मुर्तीजवळ भाविकांची गर्दी होती. रोहिणी आणि मृग नक्षत्र गेले. यंदा रोहिणी आणि मृग कोरडे गेले. या दिवसात पावसाची आशा होती पण त्याने दगा दिला. गत आठवड्यात आलेल्या पेरण्या तरल्या; मात्र नव्या पेरण्या धोक्यात आल्याचे चित्र आहे. पांडुरंगा.. दुबार पेरणीचे संकट टाळजिल्ह्यात यंदा वेळेवर पाऊस येईल असे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते. नेहमी फोल ठरणारे आश्वासन यंदा खरे होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. यामुळे त्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत पेरण्या केल्या. मात्र ऐन वेळी पावसाने दडी मारली. अनेकांच्या पेरण्या मोडल्या. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले. यामुळे शेतकऱ्यांकडून पांडुरंगा.. दुबार पेरणीचे संकट टाळ असे साकडे घालण्यात येत आहे.