शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

एकाच वाणाच्या वापरामुळे विषाणू

By admin | Updated: September 12, 2015 02:01 IST

निसर्गाच्या चक्रातून वाचत सोयाबीनला आता शेंगा धरून त्या भरायला प्रारंभ झाला. अशात अचानक सोयाबीनची उभी झाडे वाळू लागल्यामुळे शेतकरी पुरता हादरला आहे.

पवनार : निसर्गाच्या चक्रातून वाचत सोयाबीनला आता शेंगा धरून त्या भरायला प्रारंभ झाला. अशात अचानक सोयाबीनची उभी झाडे वाळू लागल्यामुळे शेतकरी पुरता हादरला आहे. सोयाबीनचे पीक हातचे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पवनार येथील सोयाबीनवर आलेल्या विषाणूची पाहणी केली असता शेतकरी एकाच वाणाचा वापर करीत असल्याने विषाणूचा हल्ला होत असल्याचे पीकेव्हीचे डॉ. नेमाडे यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे.सोयाबीनवर व्हायरस, जिवाणू, बुरशीजन्य रोगाचे एकदम आक्रमण झाले असून वातावरणातील बदल व जमिनीतील बुरशी याला कारणीभूत असल्याचे कृषीतज्ज्ञांचे मत आहे.जिल्ह्यात कृषी विभागामार्फत ‘क्रॉप सॅक’ची चमू किडीवरील नियंत्रणासाठी आहे; परंतु या चमूचे काम पिकांवर असलेल्या किडींची तपासणी व त्यावरील उपाययोजना सूचविणे आहे. सध्या सोयाबीनवर किडींचे आक्रमण जरी अल्प असले तरी विषाणूजन्य रोगाचे आक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. हा रोग हवेद्वारे पावसाद्वारे झपाट्याने पसरतो. या रोगामुळे सोयाबीनची पाने वाळायला प्रारंभ होतो. एक-दोन दिवसात अख्खे झाड वाळते, त्यामुळे त्या झाडाला असलेल्या शेंगा भरत नाही. ज्या झाडावर या व्हायरसने आक्रमण केले असेल त्यावर फवारणी करूनही उपयोग होताना दिसत नाही; परंतु तो पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येत असल्याचे पीकेव्हीचे डॉ. नेमाडे यांनी सांगितले.पवनार शिवारात अशोक मरगडे यांच्या शेतात, प्रारंभी या रोगाची लक्षणे आढळल्यामुळे कृषी तज्ज्ञ डॉ. तोटे यांनी पिकेव्ही व कृषी विभागाला सूचना दिली. कृषी सहाय्यक भोयर यांनी सुद्धा क्रॉपसॅकच्या चमूला पाचारण केले. तालुका कृषी अधिकारी राठोडसह आत्मा प्रकल्प संचालक दीपक पटेल, सेलसुरा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ज्ञ डॉ. दवने यांनी प्रत्यक्ष जाऊन शेतात पाहणी केली व शेतकऱ्यांना हा व्हायरस पसरू नये म्हणून उपाययोजना सुचविल्या. सोयाबीनची ३३५ नावाची एकच जात वर्षानुवर्षे शेतकरी वापरत आहे. यामुळे ही बियाने बियाणे अनेक विषाणूंना सोबतच घेवून येत असल्याचे डॉ. नेमाडे व डॉ. देवने यांनी सांगितले. बियाण्यांवर पेरणीपूर्वी वीज प्रक्रिया केली तर अनेक विषाणूपासून पिकांना वाचविता येते असे मत तालुका कृषी अधिकारी विपीनकुमार राठोड यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)