शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

व्हीआयपी रस्त्यालाही जाताहेत तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:26 IST

सेवाग्राम विकास आरखड्यातून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. परंतु, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता आणि दुर्लक्षित धोरणामुळे अल्पावधीतच नागरिकांकडून सदोषतेचा ठपका ठेवला जात आहे. यातून व्हीआयपी रस्त्याही सुटला नाही. मागील पाच ते सहा दिवसांपासून या सिमेंट रस्त्यावर पाणी टाकले नसल्याने काम पूर्ण होण्यापूर्वीच काही ठिकाणी तडे गेल्याची ओरड होत आहे.

ठळक मुद्देपाण्याचा अभाव : सदोष बांधकामाची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम विकास आरखड्यातून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. परंतु, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता आणि दुर्लक्षित धोरणामुळे अल्पावधीतच नागरिकांकडून सदोषतेचा ठपका ठेवला जात आहे. यातून व्हीआयपी रस्त्याही सुटला नाही. मागील पाच ते सहा दिवसांपासून या सिमेंट रस्त्यावर पाणी टाकले नसल्याने काम पूर्ण होण्यापूर्वीच काही ठिकाणी तडे गेल्याची ओरड होत आहे.स्थानिक शासकीय विश्रामगृहालगतच्या व्हीआयपी रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत सुरू आहे. दोन कोटी रुपयांच्या निधीतून नालवाडी चौकापर्यंत या रस्त्याचे सिमेंंटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा कंत्राट जे. पी. कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतला असून प्रत्यक्ष काम मात्र स्थानिक कंत्राटदाराकडून केले जात आहे. या रस्त्याच्या काही भागाचे सिमेंटीकरण झाले असून त्यावर पाणी मुरविण्याकरिता पोते झाकण्यात आले आहे. मात्र, मागील पाच ते सहा दिवसांपासून यावर पाणी टाकण्यात आले नसल्यामुळे अल्पावधीतच या रस्त्याला जागोजागी तडे गेल्याने बांधकाम सदोष झाल्याची ओरड स्थानिकांकडून केली जात आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात येणाºया या व्हीआयपी मार्गाच्या बांधकामावर वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.दुष्काळातही सिमेंटीकरणाचा सपाटासर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्ध्यासह लगतच्या सर्व गावात पाणीबाणी निर्माण झाली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून दहा गावांचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. शहरासाठीही दहा दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असल्याने मोठी पंचाईत होणार आहे. असे असतानाही सिमेंटीकरणाच्या कामाचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याची पाण्याची आवश्यकता कशी पूर्ण केली जाईल? पाण्याअभावी कोट्यवधीच्या खर्चातून बांधलेल्या रस्त्यांची अल्पावधीच वाट लागणार आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत या सिमेंटीकरणावर निधीची उधळपट्टी कशासाठी? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून विचारला जात आहे.