शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयपी रस्त्यालाही जाताहेत तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:26 IST

सेवाग्राम विकास आरखड्यातून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. परंतु, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता आणि दुर्लक्षित धोरणामुळे अल्पावधीतच नागरिकांकडून सदोषतेचा ठपका ठेवला जात आहे. यातून व्हीआयपी रस्त्याही सुटला नाही. मागील पाच ते सहा दिवसांपासून या सिमेंट रस्त्यावर पाणी टाकले नसल्याने काम पूर्ण होण्यापूर्वीच काही ठिकाणी तडे गेल्याची ओरड होत आहे.

ठळक मुद्देपाण्याचा अभाव : सदोष बांधकामाची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम विकास आरखड्यातून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. परंतु, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता आणि दुर्लक्षित धोरणामुळे अल्पावधीतच नागरिकांकडून सदोषतेचा ठपका ठेवला जात आहे. यातून व्हीआयपी रस्त्याही सुटला नाही. मागील पाच ते सहा दिवसांपासून या सिमेंट रस्त्यावर पाणी टाकले नसल्याने काम पूर्ण होण्यापूर्वीच काही ठिकाणी तडे गेल्याची ओरड होत आहे.स्थानिक शासकीय विश्रामगृहालगतच्या व्हीआयपी रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत सुरू आहे. दोन कोटी रुपयांच्या निधीतून नालवाडी चौकापर्यंत या रस्त्याचे सिमेंंटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा कंत्राट जे. पी. कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतला असून प्रत्यक्ष काम मात्र स्थानिक कंत्राटदाराकडून केले जात आहे. या रस्त्याच्या काही भागाचे सिमेंटीकरण झाले असून त्यावर पाणी मुरविण्याकरिता पोते झाकण्यात आले आहे. मात्र, मागील पाच ते सहा दिवसांपासून यावर पाणी टाकण्यात आले नसल्यामुळे अल्पावधीतच या रस्त्याला जागोजागी तडे गेल्याने बांधकाम सदोष झाल्याची ओरड स्थानिकांकडून केली जात आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात येणाºया या व्हीआयपी मार्गाच्या बांधकामावर वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.दुष्काळातही सिमेंटीकरणाचा सपाटासर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्ध्यासह लगतच्या सर्व गावात पाणीबाणी निर्माण झाली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून दहा गावांचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. शहरासाठीही दहा दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असल्याने मोठी पंचाईत होणार आहे. असे असतानाही सिमेंटीकरणाच्या कामाचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याची पाण्याची आवश्यकता कशी पूर्ण केली जाईल? पाण्याअभावी कोट्यवधीच्या खर्चातून बांधलेल्या रस्त्यांची अल्पावधीच वाट लागणार आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत या सिमेंटीकरणावर निधीची उधळपट्टी कशासाठी? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून विचारला जात आहे.