शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

विनोबा भावे उड्डाणपूल धोकादायक वळणावर

By admin | Updated: May 22, 2014 01:25 IST

स्थानिक बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

वर्धा : स्थानिक बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. उड्डाणपुलाची दुरवस्था पाहता त्वरित दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

अतिमहत्त्वाच्या या उड्डाणपुलावर सध्या हजारावर खड्डे पडले आहेत. यवतमाळ तसेच हिंगणघाटकडे दिवसाला हजारो वाहने याच पुलावरून धावत असतात. नागरिकांचीही मोठी वर्दळ असते. पुलावर असंख्य खड्डे पडलेले असल्याने नागरिकांना येथून मार्गक्रमण करताना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागतो. पूल नुतनीकरण प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे मागील अनेक वर्षांपासून पडलेला आहे. त्यामुळे पुलाची तात्पुरती दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पुलाची दुरवस्था झाल्याने वाहतुकीचा खोळंबा होणे नित्याची बाब झाली आहे.

बहुतांश वेळा शहरातील बजाज चौकात वाहतूक विस्कळीत झाल्यास दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना तासन्तास पुलावरच अडकून पडावे लागते. पुलावरील खड्डय़ांमुळे अपघाताच्या किरकोळ घटनाही दररोज घडत असल्याचे दिसून येते. कृषी उत्पन्न बाजार समितीही पुलाखालीच असल्याने शेतकर्‍यांना आपल्या मालाची ने-आण येथूनच करावी लागते. या पुलाची जीर्ण अवस्था झालेली असल्याने पूल कधी कोसळेल याचा नेम राहिलेला नाही. यात मोठी जीवितहानी होण्याचा धोका आहे. या पुलाचे विस्तारीकरण मंजूर झाल्याची माहिती होती; पण ते कामही मोजणीनंतर रखडल्याचेच दिसून येत आहे. प्रचंड वाहतुकीमुळे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. नुकताच बजाज चौकातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले; पण पुलावर अस्तरीकरण करण्याचे सौजन्य कुणी दाखविले नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(स्थानिक प्रतिनिधी)