शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

नागरी सुविधांअभावी ग्रामस्थ त्रस्त

By admin | Updated: February 22, 2016 02:24 IST

स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षाने गावात विविध समस्यांनी डोके वर काढले आहे.

रोहणा : स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षाने गावात विविध समस्यांनी डोके वर काढले आहे. येथे नागरी सुविधांचा अभाव असल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. सुविधा प्रदान करण्याबाबत ग्रामस्थांनी वारंवार मागणी करुनही याकड दुर्लक्ष होत आहे. गावातील बसस्टॅँड परिसर व अंतर्गत रस्त्यांवर केलेल्या अतिक्रमणामुळे रहदारी प्रभावीत झाली आहे. बसस्टॅँड परिसरात तर मोठ्या प्रमाणात अपघाताची शक्यता बळावली आहे. हे अतिक्रमण हटविण्याची गरज व्यक्त होत आहे. आठवडी बाजारातील अस्वच्छतेने कळस गाठला आहे. यामुळे परिसरातील रहिवाश्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्युत वितरण कंपनीद्वारे विद्युतीकरण करताना गाडलेले खांब वाहतुकीला अडसर ठरत आहे. खांबावरून टाकलेल्या विद्युत तार अनेक ठिकाणी लोंबकळत आहे. या तारेचा स्पर्श झाल्यास जीवितहानी होऊ शकते. दुर्घटना होण्यापूर्वी खबरदारी घेण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे. गावात एकही सार्वजनिक वाचनालय नाही. त्यामुळे युवकांमधील वाचन संस्कृती संपुष्टात येत आहे. जिल्ह्यात दारूबंदी असली तरी गावात खुलेआम दारूची विक्री होत आहे. पोलीस विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे गावातील सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. स्मशानभूमिकडे जाणाऱ्या रस्त्याची समस्या अनेक वर्षांपासून खितपत पडली आहे. गावकऱ्यांना त्यामुळे समस्येला तोंड द्यावे लागते. शेतात जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पांदण रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. पांदणी हरविल्याने शेतमाल रहदार प्रभावीत झाली आहे. गावातील पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाली आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत मंजूर झालेली १ कोटी ४४ लाखांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. मात्र ही योजनाही रद्द झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागू शकते. आर्वी तालुक्यातील एक राजकीय संवेदनशील व लोकसंख्येने मोठे गाव असलेल्या येथील समस्यांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. एकेकाळी तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्याचे राजकारण रोहणा येथून चालायचे. काळाच्या ओघात राजकीय वैभव संपुष्टात आल्याने गावकऱ्यांना अनेक नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. आरोग्य केंद्रातही रिक्त पद असल्याने आरोग्य सुविधा कोलमडली आहे.(वार्ताहर)