शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रायपूरच्या ग्रामस्थांना करावा लागतो जीवघेणा प्रवास

By admin | Updated: May 9, 2016 02:11 IST

सेलू तालुक्यात जंगलाने वेढलेले रायपूर हे ३०० लोकवस्तीचे गाव आहे. या गावाचा संबंध वर्धा शहराशी येतो.

गावाला रस्ताच नाही : दररोज करावा लागतो ६०० मीटर पायी प्रवासआकोली : सेलू तालुक्यात जंगलाने वेढलेले रायपूर हे ३०० लोकवस्तीचे गाव आहे. या गावाचा संबंध वर्धा शहराशी येतो. गावापासून माळेगाव (ठेका) पर्यंत रस्ता नसल्याने शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थांना जंगलातून ६०० मीटर अंतर पायी यावे लागते. यानंतर माळेगाव येथून ते वर्धेला मार्गस्थ होतात. येथेही प्रवासी निवारा व पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. परिणामी, रायपूर येथील ग्रामस्थांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचेच दिसते.रायपूर या आदिवासीबहुल गावाचा तालुका सेलू असला तरी सेलूशी कार्यालयीन कामावयतिरिक्त संबंध येत नाही. येथील विद्यार्थी दिनकर विद्यालय, श्रीकृष्ण हायस्कूल व वर्धा येथील महाविद्यालयात शिक्षण घेतात. अंतर व वाहतुकीच्या दृष्टीने ते सोईस्कर आहे. वर्धा शहरात सेलू वा अन्य मार्गाने जायचे झाल्यास तिप्पट अंतर व पैसे खर्च करावे लागतात; पण ६०० मिटर अंतर पायी चालत गेले तर पैसा आणि वेळेची बचत होते. वर्धा ते माळेगाव (ठेका) मार्गावरील चिंध्या देवापासून रायपूर गावात जाणारा रस्ता आहे. घनदाट वृक्षराजीतून ६०० मिटर आत गाव आहे. सदर जंगलात वाघ, बिबट, अस्वल या हिंस्त्र श्वापदांचा वावर असतो; पण नाईलाजाने विद्यार्थी व ग्रामस्थांना जंगलालाच पसंती द्यावी लागते. ६०० मीटर अंतर चालून आल्यानंतर माळेगाव येथे निवारा नाही. परिणामी, झाडांचाच आधार घ्यावा लागतो. निर्मनुष्य असलेल्या या विनंती थांब्यावर पिण्यासाठी पाणीही नाही. उन्हाळा असो वा पावसाळा कोणत्याही ऋतूत झाडे हाच एकमेव आधार आहे. स्वातंत्र्याची ६६ वर्षे लोटूनही पक्का रस्ता मिळाला नाही. नागमोडी वळणाचा, काट्या-गोट्यातून गेलेल्या रस्त्याने पावसाळ्यात ग्रामस्थांना मार्गक्रमण करावे लागते. हा जीवघेणा प्रवास ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरत असला तरी शासनस्तरावर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचा तिढा सुटत नाही. शासन, प्रशासनाने याकडे लक्ष देत रायपूरच्या ग्रामस्थांना दिलासा देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतरही काट्यांची वहिवाटसेलू तालुक्यातील रायपूर हे गाव घनदाट जंगलाने वेढलेले आहे. गावातून कुठे जायचे म्हटले तर प्रथम ६०० मिटरचे अंतर पायीच पार करावे लागते. स्वातंत्र्यानंतर ६६ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला; पण रायपूरच्या नागरिकांना आजही काट्यांतूनच प्रवास करावा लागतो. गावाला अद्याप पक्का रस्ताही मिळाला नाही आणि गावापर्यंत वाहनेही जात नाही. यामुळे मरणयातना सहन करावा लागत असल्याचे दिसते.