शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
2
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
3
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
4
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
5
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
6
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
7
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
8
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
9
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
10
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
11
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
12
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
13
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
14
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
15
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
16
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
17
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
18
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
19
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
20
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने

रायपूरच्या ग्रामस्थांना करावा लागतो जीवघेणा प्रवास

By admin | Updated: May 9, 2016 02:11 IST

सेलू तालुक्यात जंगलाने वेढलेले रायपूर हे ३०० लोकवस्तीचे गाव आहे. या गावाचा संबंध वर्धा शहराशी येतो.

गावाला रस्ताच नाही : दररोज करावा लागतो ६०० मीटर पायी प्रवासआकोली : सेलू तालुक्यात जंगलाने वेढलेले रायपूर हे ३०० लोकवस्तीचे गाव आहे. या गावाचा संबंध वर्धा शहराशी येतो. गावापासून माळेगाव (ठेका) पर्यंत रस्ता नसल्याने शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थांना जंगलातून ६०० मीटर अंतर पायी यावे लागते. यानंतर माळेगाव येथून ते वर्धेला मार्गस्थ होतात. येथेही प्रवासी निवारा व पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. परिणामी, रायपूर येथील ग्रामस्थांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचेच दिसते.रायपूर या आदिवासीबहुल गावाचा तालुका सेलू असला तरी सेलूशी कार्यालयीन कामावयतिरिक्त संबंध येत नाही. येथील विद्यार्थी दिनकर विद्यालय, श्रीकृष्ण हायस्कूल व वर्धा येथील महाविद्यालयात शिक्षण घेतात. अंतर व वाहतुकीच्या दृष्टीने ते सोईस्कर आहे. वर्धा शहरात सेलू वा अन्य मार्गाने जायचे झाल्यास तिप्पट अंतर व पैसे खर्च करावे लागतात; पण ६०० मिटर अंतर पायी चालत गेले तर पैसा आणि वेळेची बचत होते. वर्धा ते माळेगाव (ठेका) मार्गावरील चिंध्या देवापासून रायपूर गावात जाणारा रस्ता आहे. घनदाट वृक्षराजीतून ६०० मिटर आत गाव आहे. सदर जंगलात वाघ, बिबट, अस्वल या हिंस्त्र श्वापदांचा वावर असतो; पण नाईलाजाने विद्यार्थी व ग्रामस्थांना जंगलालाच पसंती द्यावी लागते. ६०० मीटर अंतर चालून आल्यानंतर माळेगाव येथे निवारा नाही. परिणामी, झाडांचाच आधार घ्यावा लागतो. निर्मनुष्य असलेल्या या विनंती थांब्यावर पिण्यासाठी पाणीही नाही. उन्हाळा असो वा पावसाळा कोणत्याही ऋतूत झाडे हाच एकमेव आधार आहे. स्वातंत्र्याची ६६ वर्षे लोटूनही पक्का रस्ता मिळाला नाही. नागमोडी वळणाचा, काट्या-गोट्यातून गेलेल्या रस्त्याने पावसाळ्यात ग्रामस्थांना मार्गक्रमण करावे लागते. हा जीवघेणा प्रवास ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरत असला तरी शासनस्तरावर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचा तिढा सुटत नाही. शासन, प्रशासनाने याकडे लक्ष देत रायपूरच्या ग्रामस्थांना दिलासा देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतरही काट्यांची वहिवाटसेलू तालुक्यातील रायपूर हे गाव घनदाट जंगलाने वेढलेले आहे. गावातून कुठे जायचे म्हटले तर प्रथम ६०० मिटरचे अंतर पायीच पार करावे लागते. स्वातंत्र्यानंतर ६६ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला; पण रायपूरच्या नागरिकांना आजही काट्यांतूनच प्रवास करावा लागतो. गावाला अद्याप पक्का रस्ताही मिळाला नाही आणि गावापर्यंत वाहनेही जात नाही. यामुळे मरणयातना सहन करावा लागत असल्याचे दिसते.