शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

गावाला वरदान ठरलेला तलाव प्रशासनाकडून दुर्लक्षित

By admin | Updated: May 26, 2017 00:54 IST

पाच एकर झुडपी जागेवर १९५५ ते १९६१ दरम्यान तत्कालीन सरपंच स्व. मारोतराव झाडे व स्व. रामचंद्र बारस्कर यांनी तलावाची निर्मिती केली होती.

बेशरमच्या झुडपांचे साम्राज्य : गाळाने बुजल्याने साठवण क्षमता घटलीलोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : पाच एकर झुडपी जागेवर १९५५ ते १९६१ दरम्यान तत्कालीन सरपंच स्व. मारोतराव झाडे व स्व. रामचंद्र बारस्कर यांनी तलावाची निर्मिती केली होती. या तलावाला गावाच्या बाहेरून येणारा लहान नाला जोडला असल्याने वाहून जाणारे पावसाचे पाणी तलावात साठत होते; पण काही वर्षांपासून या तलावाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. परिणामी, बेशरमच्या झुडपांचे साम्राज्य असून तलाव गाळाने बुजला आहे. याकडे लक्ष देत गाळ साफ करून तलावाचे खोलीकरण करणे गरजेचे आहे. सध्या सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या दोन स्वर्गीय नेत्यांनी जमिनीत पाणी मुरावे म्हणून या तलावाची निर्मिती केली होती. काही वर्षांपूर्वी बाहेर गावाहून बाजाराला येणारी मंडळी आपल्या बैल व गुरांना या तलावात पाणी पाजत होते. आज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तलाव कोरडा पडला आहे. १९८५ ते ९० या काळात असलेले सरपंच रमेश भोयर यांनी या तलावाचे गाळ काढून खोलीकरण केले होते. तलावाच्या मोकळ्या जागेवर झाडे लावण्यात आली होती; पण स्थानिक नागरिकांनी ती झाडे उपडून अतिक्रमण केले आणि जमीन वाहितीत आणली. या बाबीकडे ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी मतदानावर लक्ष ठेवून दुर्लक्ष केले. उलट अतिक्रमणकर्त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. १९५५ ते २००५ पर्यंत या तलावात मत्स्यबीज टाकून मासोळ्या निर्मिती करून याचे कंत्राट दिले जात होते. यातून ग्रामपंचायतीने ५० ते ५५ वर्षांपर्यंत महसुली उत्पन्न घेतले; पण तलावात कुठल्याही सुधारणा केल्या नाही. यामुळेच तलावाची दयनिय अवस्था झाली आहे. सध्या हा तलाव नगर पंचायतच्या अधिनस्त आहे. स्थानिक पदाधिकारी या तलावाच्या सौदर्यीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहे. २०१२-१३ मध्ये ग्रा.पं. अस्तित्वात असताना तलावाच्या सौदर्यीकरणाकरिता शासनाकडून निधी मिळाला होता; पण ग्रा.पं. प्रशासनाने या बाबींवर पैसा खर्च न केल्योन तो शासनाला परत करण्यात आला. सध्या नगर पंचायतीवर आ. कुणावार यांच्या गटाची सत्ता आहे. यामुळे आमदारांनी लक्ष देत या तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकण करीत पाणीटंचाईचा प्रश्न कायम मिटवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तलाव कोरडा पडल्याने पाणीटंचाईचा प्रश्नही बिकटशहरातील पाणीटंचाई दूर व्हावी, जमिनीत पाणी मुरावे, उन्हाळ्यातही गोपालकांना गुरांना पाणी पाजण्याकरिता भटकावे लागू नये म्हणून १९५५ मध्ये तलावाची निर्मिती करण्यात आली; पण सध्या दुर्लक्षामुळे तलाव कोरडा पडला आहे. तलावाच्या सभोवताल शहरातील नागरिक प्रात:विधी उरकतात. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य असून दुर्गंधी पसरली आहे. तलाव व जलपर्णी आणि बेशरम मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.