शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

गावाला वरदान ठरलेला तलाव प्रशासनाकडून दुर्लक्षित

By admin | Updated: May 26, 2017 00:54 IST

पाच एकर झुडपी जागेवर १९५५ ते १९६१ दरम्यान तत्कालीन सरपंच स्व. मारोतराव झाडे व स्व. रामचंद्र बारस्कर यांनी तलावाची निर्मिती केली होती.

बेशरमच्या झुडपांचे साम्राज्य : गाळाने बुजल्याने साठवण क्षमता घटलीलोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : पाच एकर झुडपी जागेवर १९५५ ते १९६१ दरम्यान तत्कालीन सरपंच स्व. मारोतराव झाडे व स्व. रामचंद्र बारस्कर यांनी तलावाची निर्मिती केली होती. या तलावाला गावाच्या बाहेरून येणारा लहान नाला जोडला असल्याने वाहून जाणारे पावसाचे पाणी तलावात साठत होते; पण काही वर्षांपासून या तलावाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. परिणामी, बेशरमच्या झुडपांचे साम्राज्य असून तलाव गाळाने बुजला आहे. याकडे लक्ष देत गाळ साफ करून तलावाचे खोलीकरण करणे गरजेचे आहे. सध्या सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या दोन स्वर्गीय नेत्यांनी जमिनीत पाणी मुरावे म्हणून या तलावाची निर्मिती केली होती. काही वर्षांपूर्वी बाहेर गावाहून बाजाराला येणारी मंडळी आपल्या बैल व गुरांना या तलावात पाणी पाजत होते. आज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तलाव कोरडा पडला आहे. १९८५ ते ९० या काळात असलेले सरपंच रमेश भोयर यांनी या तलावाचे गाळ काढून खोलीकरण केले होते. तलावाच्या मोकळ्या जागेवर झाडे लावण्यात आली होती; पण स्थानिक नागरिकांनी ती झाडे उपडून अतिक्रमण केले आणि जमीन वाहितीत आणली. या बाबीकडे ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी मतदानावर लक्ष ठेवून दुर्लक्ष केले. उलट अतिक्रमणकर्त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. १९५५ ते २००५ पर्यंत या तलावात मत्स्यबीज टाकून मासोळ्या निर्मिती करून याचे कंत्राट दिले जात होते. यातून ग्रामपंचायतीने ५० ते ५५ वर्षांपर्यंत महसुली उत्पन्न घेतले; पण तलावात कुठल्याही सुधारणा केल्या नाही. यामुळेच तलावाची दयनिय अवस्था झाली आहे. सध्या हा तलाव नगर पंचायतच्या अधिनस्त आहे. स्थानिक पदाधिकारी या तलावाच्या सौदर्यीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहे. २०१२-१३ मध्ये ग्रा.पं. अस्तित्वात असताना तलावाच्या सौदर्यीकरणाकरिता शासनाकडून निधी मिळाला होता; पण ग्रा.पं. प्रशासनाने या बाबींवर पैसा खर्च न केल्योन तो शासनाला परत करण्यात आला. सध्या नगर पंचायतीवर आ. कुणावार यांच्या गटाची सत्ता आहे. यामुळे आमदारांनी लक्ष देत या तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकण करीत पाणीटंचाईचा प्रश्न कायम मिटवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तलाव कोरडा पडल्याने पाणीटंचाईचा प्रश्नही बिकटशहरातील पाणीटंचाई दूर व्हावी, जमिनीत पाणी मुरावे, उन्हाळ्यातही गोपालकांना गुरांना पाणी पाजण्याकरिता भटकावे लागू नये म्हणून १९५५ मध्ये तलावाची निर्मिती करण्यात आली; पण सध्या दुर्लक्षामुळे तलाव कोरडा पडला आहे. तलावाच्या सभोवताल शहरातील नागरिक प्रात:विधी उरकतात. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य असून दुर्गंधी पसरली आहे. तलाव व जलपर्णी आणि बेशरम मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.