शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

गावाला वरदान ठरलेला तलाव प्रशासनाकडून दुर्लक्षित

By admin | Updated: May 26, 2017 00:54 IST

पाच एकर झुडपी जागेवर १९५५ ते १९६१ दरम्यान तत्कालीन सरपंच स्व. मारोतराव झाडे व स्व. रामचंद्र बारस्कर यांनी तलावाची निर्मिती केली होती.

बेशरमच्या झुडपांचे साम्राज्य : गाळाने बुजल्याने साठवण क्षमता घटलीलोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : पाच एकर झुडपी जागेवर १९५५ ते १९६१ दरम्यान तत्कालीन सरपंच स्व. मारोतराव झाडे व स्व. रामचंद्र बारस्कर यांनी तलावाची निर्मिती केली होती. या तलावाला गावाच्या बाहेरून येणारा लहान नाला जोडला असल्याने वाहून जाणारे पावसाचे पाणी तलावात साठत होते; पण काही वर्षांपासून या तलावाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. परिणामी, बेशरमच्या झुडपांचे साम्राज्य असून तलाव गाळाने बुजला आहे. याकडे लक्ष देत गाळ साफ करून तलावाचे खोलीकरण करणे गरजेचे आहे. सध्या सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या दोन स्वर्गीय नेत्यांनी जमिनीत पाणी मुरावे म्हणून या तलावाची निर्मिती केली होती. काही वर्षांपूर्वी बाहेर गावाहून बाजाराला येणारी मंडळी आपल्या बैल व गुरांना या तलावात पाणी पाजत होते. आज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तलाव कोरडा पडला आहे. १९८५ ते ९० या काळात असलेले सरपंच रमेश भोयर यांनी या तलावाचे गाळ काढून खोलीकरण केले होते. तलावाच्या मोकळ्या जागेवर झाडे लावण्यात आली होती; पण स्थानिक नागरिकांनी ती झाडे उपडून अतिक्रमण केले आणि जमीन वाहितीत आणली. या बाबीकडे ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी मतदानावर लक्ष ठेवून दुर्लक्ष केले. उलट अतिक्रमणकर्त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. १९५५ ते २००५ पर्यंत या तलावात मत्स्यबीज टाकून मासोळ्या निर्मिती करून याचे कंत्राट दिले जात होते. यातून ग्रामपंचायतीने ५० ते ५५ वर्षांपर्यंत महसुली उत्पन्न घेतले; पण तलावात कुठल्याही सुधारणा केल्या नाही. यामुळेच तलावाची दयनिय अवस्था झाली आहे. सध्या हा तलाव नगर पंचायतच्या अधिनस्त आहे. स्थानिक पदाधिकारी या तलावाच्या सौदर्यीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहे. २०१२-१३ मध्ये ग्रा.पं. अस्तित्वात असताना तलावाच्या सौदर्यीकरणाकरिता शासनाकडून निधी मिळाला होता; पण ग्रा.पं. प्रशासनाने या बाबींवर पैसा खर्च न केल्योन तो शासनाला परत करण्यात आला. सध्या नगर पंचायतीवर आ. कुणावार यांच्या गटाची सत्ता आहे. यामुळे आमदारांनी लक्ष देत या तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकण करीत पाणीटंचाईचा प्रश्न कायम मिटवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तलाव कोरडा पडल्याने पाणीटंचाईचा प्रश्नही बिकटशहरातील पाणीटंचाई दूर व्हावी, जमिनीत पाणी मुरावे, उन्हाळ्यातही गोपालकांना गुरांना पाणी पाजण्याकरिता भटकावे लागू नये म्हणून १९५५ मध्ये तलावाची निर्मिती करण्यात आली; पण सध्या दुर्लक्षामुळे तलाव कोरडा पडला आहे. तलावाच्या सभोवताल शहरातील नागरिक प्रात:विधी उरकतात. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य असून दुर्गंधी पसरली आहे. तलाव व जलपर्णी आणि बेशरम मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.