शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
4
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
5
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
6
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
7
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
8
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
9
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
10
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
11
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
13
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
14
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
15
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
16
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
18
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
19
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
20
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा

ग्रामीण रुग्णालयाचे भिजत घोंगडे

By admin | Updated: July 4, 2015 00:20 IST

शासनाच्या नियोजन शून्यतेचा उत्कृष्ट नमुना म्हणून येथील नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयाकडे पाहिले जात आहे.

तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा अभाव : प्राथमिक आरोग्य केंद्रातून औषधोपचारहरिदास ढोक देवळीशासनाच्या नियोजन शून्यतेचा उत्कृष्ट नमुना म्हणून येथील नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयाकडे पाहिले जात आहे. रुग्णालयाचे लोकार्पण होवून तब्बल १० महिन्यांचा कालावधी होवून सुद्धा याठिकाणी तज्ज्ञ अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती न झाली नाही. जिल्हा चिकित्सक कार्यालयाकडून दोन परिचारिकांना काही तासांसाठी पाठवून यावर पांघरुन ओढले जात आहे. तात्पुरत्या स्वरुपात येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे माध्यमातून औषधोपचार होत असल्यामुळे नागरिकांत असंतोष व्यक्त होत आहे.तालुक्याचे ठिकाण म्हणून येथील वर्धा मार्गावर साडेचार एकर परिसरात साडेतीन कोटी रूपये खर्चातून ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज ईमारतीचे बांधकाम करण्यात आले. यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वसाहतीचे बांधकाम केले. या वास्तुचे लोकार्पण आॅगस्ट २०१४ ला करण्यात आले. मात्र येथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भरतीची तरतूद त्यावेळी आर्थिक बजेटमध्ये करण्यात आली नसल्याने येथील कारभार रामभरोसे आहे. रुग्णालयाचे उद्घाटनाआधी कर्मचारी भरती करणे आवश्यक होते. मात्र या नियमाला फाटा देण्यात आला. त्यानंतर मार्च २०१४ च्या बजेटमध्ये १४ कर्मचाऱ्यांच्या भरतीची तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये वैद्यकीय अधीक्षक, तीन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, सात अधिपरिचारीका, एक परिचारक व दोन सेवक असा समावेश असणार होता. ३० खाटांची व्यवस्था असलेच्या या रुग्णालयासाठी ३० कर्मचाऱ्यांची तरतूद आहे. पहिल्या टप्प्यात १४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती ग्रहीत धरली तरी शासकीय स्तरावर याबाबत हालचाल दिसत नाही. यामुळे या रुग्णालयाच्या निर्मितीची शासनदरबारी नोंद आहे अथवा नाही, अशी शंका येथील नागरिक व्यक्त करतात. आजच्या स्थितीला येथे कोणतीही सुविधा नसल्यामुळे हे रुग्णालय नावापुरतेच राहिले आहे. सत्तारुढ खासदार आणि आमदार यांच्या क्षेत्रातील हे रुग्णालय असताना, या रुग्णालयाची वाताहत होत असल्याने नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. याची तातडीने दखल घेत येथे रिक्त पदे भरण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाहीशहरापासून अर्धा कि़मी. अंतरावर असलेल्या या रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. यामुळे बाहेर गावावरुन आलेल्या रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी परिसरातील दुकानाचा आसरा घ्यावा लागत आहे. या परिसरात विहिर, मोटारपंप तसेच यंत्रसामग्री असताना केवळ जोडणी न केल्यामुळे मागील १० महिन्यांपासून ही गैरसोय निर्माण झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावतीने रुग्णालयाच्या वास्तूचे विद्युत बील व तीन रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पगार करण्यात येत आहे. त्यामुळे या रुग्णालयाला अनुदान मिळाले की काय असा तर्क व्यक्त करण्यात येत आहे. देवळी येथील ग्रामीण रुग्णालयासाठी अधीक्षक वर्ग-१, वैद्यकीय अधिकारी, परिचारीका व इतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचे प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आले आहे. ही पदे भरणे आमच्या हाती नसल्यामुळे याबाबतचा पाठपुरावा सुरू आहे. दोन ते तीन महिन्यांच्या आत या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची भरती अपेक्षीत आहे. - डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा