शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयाचे भिजत घोंगडे

By admin | Updated: July 4, 2015 00:20 IST

शासनाच्या नियोजन शून्यतेचा उत्कृष्ट नमुना म्हणून येथील नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयाकडे पाहिले जात आहे.

तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा अभाव : प्राथमिक आरोग्य केंद्रातून औषधोपचारहरिदास ढोक देवळीशासनाच्या नियोजन शून्यतेचा उत्कृष्ट नमुना म्हणून येथील नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयाकडे पाहिले जात आहे. रुग्णालयाचे लोकार्पण होवून तब्बल १० महिन्यांचा कालावधी होवून सुद्धा याठिकाणी तज्ज्ञ अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती न झाली नाही. जिल्हा चिकित्सक कार्यालयाकडून दोन परिचारिकांना काही तासांसाठी पाठवून यावर पांघरुन ओढले जात आहे. तात्पुरत्या स्वरुपात येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे माध्यमातून औषधोपचार होत असल्यामुळे नागरिकांत असंतोष व्यक्त होत आहे.तालुक्याचे ठिकाण म्हणून येथील वर्धा मार्गावर साडेचार एकर परिसरात साडेतीन कोटी रूपये खर्चातून ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज ईमारतीचे बांधकाम करण्यात आले. यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वसाहतीचे बांधकाम केले. या वास्तुचे लोकार्पण आॅगस्ट २०१४ ला करण्यात आले. मात्र येथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भरतीची तरतूद त्यावेळी आर्थिक बजेटमध्ये करण्यात आली नसल्याने येथील कारभार रामभरोसे आहे. रुग्णालयाचे उद्घाटनाआधी कर्मचारी भरती करणे आवश्यक होते. मात्र या नियमाला फाटा देण्यात आला. त्यानंतर मार्च २०१४ च्या बजेटमध्ये १४ कर्मचाऱ्यांच्या भरतीची तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये वैद्यकीय अधीक्षक, तीन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, सात अधिपरिचारीका, एक परिचारक व दोन सेवक असा समावेश असणार होता. ३० खाटांची व्यवस्था असलेच्या या रुग्णालयासाठी ३० कर्मचाऱ्यांची तरतूद आहे. पहिल्या टप्प्यात १४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती ग्रहीत धरली तरी शासकीय स्तरावर याबाबत हालचाल दिसत नाही. यामुळे या रुग्णालयाच्या निर्मितीची शासनदरबारी नोंद आहे अथवा नाही, अशी शंका येथील नागरिक व्यक्त करतात. आजच्या स्थितीला येथे कोणतीही सुविधा नसल्यामुळे हे रुग्णालय नावापुरतेच राहिले आहे. सत्तारुढ खासदार आणि आमदार यांच्या क्षेत्रातील हे रुग्णालय असताना, या रुग्णालयाची वाताहत होत असल्याने नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. याची तातडीने दखल घेत येथे रिक्त पदे भरण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाहीशहरापासून अर्धा कि़मी. अंतरावर असलेल्या या रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. यामुळे बाहेर गावावरुन आलेल्या रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी परिसरातील दुकानाचा आसरा घ्यावा लागत आहे. या परिसरात विहिर, मोटारपंप तसेच यंत्रसामग्री असताना केवळ जोडणी न केल्यामुळे मागील १० महिन्यांपासून ही गैरसोय निर्माण झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावतीने रुग्णालयाच्या वास्तूचे विद्युत बील व तीन रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पगार करण्यात येत आहे. त्यामुळे या रुग्णालयाला अनुदान मिळाले की काय असा तर्क व्यक्त करण्यात येत आहे. देवळी येथील ग्रामीण रुग्णालयासाठी अधीक्षक वर्ग-१, वैद्यकीय अधिकारी, परिचारीका व इतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचे प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आले आहे. ही पदे भरणे आमच्या हाती नसल्यामुळे याबाबतचा पाठपुरावा सुरू आहे. दोन ते तीन महिन्यांच्या आत या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची भरती अपेक्षीत आहे. - डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा