शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्याकरिता ग्रामस्थांचा मोर्चा

By admin | Updated: January 7, 2017 00:55 IST

येथील नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प करण्यात आला आहे. नळयोजनेचे देयक न भरल्यामुळे वीजपुरवठा बंद केला

पिंपळखुटा येथील पाणीपुरवठा ठप्प : कृत्रिम पाणीटंचाईचा करावा लागतो सामना पिंपळखुटा : येथील नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प करण्यात आला आहे. नळयोजनेचे देयक न भरल्यामुळे वीजपुरवठा बंद केला असून नळयोजना ठप्प झाली आहे. याचा फटका येथील ग्रामस्थांना बसत आहे. हिवाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा विरोध करण्याकरिता येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चात गावातील ३०० स्त्रीया व पुरुषांचा सहभाग होता. येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी, हातपंप याचा आसरा घ्यावा लागतो. पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ग्रामवासियांवर हे संकट निर्माण झाले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेऊन गावातील समस्यांचे निवेदन देण्यात आले. कार्यालयात मोर्चा पोहचला तरी तिथे सरपंच, उपसरपंच, सचिव तसेच कर्मचारी पोहचले नाही. सकाळी १० वाजतापासून दुपारी ३ वाजेपर्यंत ग्ग्रामस्थांनी प्रतीक्षा केली. अखेर ग्रामपंचायत कार्यालयासमोरच गावातील समस्या व गावकऱ्यांच्या मागण्या मोर्चासमोरच कथन करुन या समस्यांचे निवेदन पालकमंत्री, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, माजी आमदार यांना स्वाक्षरीसह देण्यात आले. गावातील नळयोजना वीज देयक न भरल्यामुळे बंद आहे. यातच मोटरपंप जळाल्यामुळे जलकुंभ पूर्णपणे भरत नाही. परिणामी येथील महिलांना सकाळपासून हातपंपावरुन पाणी भरावे लागते. घरगुती नळजोडणीवर बसविलेल्या मिटरमध्ये २ लाख ७० हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. संबंधितावर कारवाई करुन रकमेची वसुली करुन ती ग्रामपंचायत खात्यात जमा करावी. तसेच देयकाचा भरणा करावा, अशी मागणी निवेदनातून केली. दोन वर्षापासून रोजगार हमीची कामे पूर्णपणे बंद आहे. ही कामे त्वरीत सुरू करण्यात यावी. गावातील पथदिवे दोन महिन्यांपासून बंद आहे. ते सुरू करण्यात यावे. ग्रामसेवकाने कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे. गावातील तुंबलेल्या नाल्या वेळोवेळी साफ करण्यात याव्या. ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ वाढलेले गवत साफ करावे. पाण्याच्या टाकीची साफसफाई करावी यासह विविध मागण्यांकरिता पिंपळखुटा वासियांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व शंकर राठी, सुधाकर एडाखे, सतीश चवरे, अरविंद एडाखे, हरीदास काळपांडे, राजेश्वर देवगडे, दिपक पांडे, मारोती इंगळे आदींनी केले.(वार्ताहर) पिंपळखुटा : येथील नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प करण्यात आला आहे. नळयोजनेचे देयक न भरल्यामुळे वीजपुरवठा बंद केला असून नळयोजना ठप्प झाली आहे. याचा फटका येथील ग्रामस्थांना बसत आहे. हिवाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा विरोध करण्याकरिता येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चात गावातील ३०० स्त्रीया व पुरुषांचा सहभाग होता. येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी, हातपंप याचा आसरा घ्यावा लागतो. पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ग्रामवासियांवर हे संकट निर्माण झाले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेऊन गावातील समस्यांचे निवेदन देण्यात आले. कार्यालयात मोर्चा पोहचला तरी तिथे सरपंच, उपसरपंच, सचिव तसेच कर्मचारी पोहचले नाही. सकाळी १० वाजतापासून दुपारी ३ वाजेपर्यंत ग्ग्रामस्थांनी प्रतीक्षा केली. अखेर ग्रामपंचायत कार्यालयासमोरच गावातील समस्या व गावकऱ्यांच्या मागण्या मोर्चासमोरच कथन करुन या समस्यांचे निवेदन पालकमंत्री, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, माजी आमदार यांना स्वाक्षरीसह देण्यात आले. गावातील नळयोजना वीज देयक न भरल्यामुळे बंद आहे. यातच मोटरपंप जळाल्यामुळे जलकुंभ पूर्णपणे भरत नाही. परिणामी येथील महिलांना सकाळपासून हातपंपावरुन पाणी भरावे लागते. घरगुती नळजोडणीवर बसविलेल्या मिटरमध्ये २ लाख ७० हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. संबंधितावर कारवाई करुन रकमेची वसुली करुन ती ग्रामपंचायत खात्यात जमा करावी. तसेच देयकाचा भरणा करावा, अशी मागणी निवेदनातून केली. दोन वर्षापासून रोजगार हमीची कामे पूर्णपणे बंद आहे. ही कामे त्वरीत सुरू करण्यात यावी. गावातील पथदिवे दोन महिन्यांपासून बंद आहे. ते सुरू करण्यात यावे. ग्रामसेवकाने कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे. गावातील तुंबलेल्या नाल्या वेळोवेळी साफ करण्यात याव्या. ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ वाढलेले गवत साफ करावे. पाण्याच्या टाकीची साफसफाई करावी यासह विविध मागण्यांकरिता पिंपळखुटा वासियांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व शंकर राठी, सुधाकर एडाखे, सतीश चवरे, अरविंद एडाखे, हरीदास काळपांडे, राजेश्वर देवगडे, दिपक पांडे, मारोती इंगळे आदींनी केले.(वार्ताहर)