शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
3
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
4
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
5
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
6
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
7
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
8
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
9
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
10
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
11
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
12
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
13
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
15
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
16
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
17
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
18
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
19
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
20
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

पिण्याच्या पाण्याकरिता ग्रामस्थांचा मोर्चा

By admin | Updated: January 7, 2017 00:55 IST

येथील नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प करण्यात आला आहे. नळयोजनेचे देयक न भरल्यामुळे वीजपुरवठा बंद केला

पिंपळखुटा येथील पाणीपुरवठा ठप्प : कृत्रिम पाणीटंचाईचा करावा लागतो सामना पिंपळखुटा : येथील नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प करण्यात आला आहे. नळयोजनेचे देयक न भरल्यामुळे वीजपुरवठा बंद केला असून नळयोजना ठप्प झाली आहे. याचा फटका येथील ग्रामस्थांना बसत आहे. हिवाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा विरोध करण्याकरिता येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चात गावातील ३०० स्त्रीया व पुरुषांचा सहभाग होता. येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी, हातपंप याचा आसरा घ्यावा लागतो. पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ग्रामवासियांवर हे संकट निर्माण झाले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेऊन गावातील समस्यांचे निवेदन देण्यात आले. कार्यालयात मोर्चा पोहचला तरी तिथे सरपंच, उपसरपंच, सचिव तसेच कर्मचारी पोहचले नाही. सकाळी १० वाजतापासून दुपारी ३ वाजेपर्यंत ग्ग्रामस्थांनी प्रतीक्षा केली. अखेर ग्रामपंचायत कार्यालयासमोरच गावातील समस्या व गावकऱ्यांच्या मागण्या मोर्चासमोरच कथन करुन या समस्यांचे निवेदन पालकमंत्री, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, माजी आमदार यांना स्वाक्षरीसह देण्यात आले. गावातील नळयोजना वीज देयक न भरल्यामुळे बंद आहे. यातच मोटरपंप जळाल्यामुळे जलकुंभ पूर्णपणे भरत नाही. परिणामी येथील महिलांना सकाळपासून हातपंपावरुन पाणी भरावे लागते. घरगुती नळजोडणीवर बसविलेल्या मिटरमध्ये २ लाख ७० हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. संबंधितावर कारवाई करुन रकमेची वसुली करुन ती ग्रामपंचायत खात्यात जमा करावी. तसेच देयकाचा भरणा करावा, अशी मागणी निवेदनातून केली. दोन वर्षापासून रोजगार हमीची कामे पूर्णपणे बंद आहे. ही कामे त्वरीत सुरू करण्यात यावी. गावातील पथदिवे दोन महिन्यांपासून बंद आहे. ते सुरू करण्यात यावे. ग्रामसेवकाने कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे. गावातील तुंबलेल्या नाल्या वेळोवेळी साफ करण्यात याव्या. ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ वाढलेले गवत साफ करावे. पाण्याच्या टाकीची साफसफाई करावी यासह विविध मागण्यांकरिता पिंपळखुटा वासियांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व शंकर राठी, सुधाकर एडाखे, सतीश चवरे, अरविंद एडाखे, हरीदास काळपांडे, राजेश्वर देवगडे, दिपक पांडे, मारोती इंगळे आदींनी केले.(वार्ताहर) पिंपळखुटा : येथील नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प करण्यात आला आहे. नळयोजनेचे देयक न भरल्यामुळे वीजपुरवठा बंद केला असून नळयोजना ठप्प झाली आहे. याचा फटका येथील ग्रामस्थांना बसत आहे. हिवाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा विरोध करण्याकरिता येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चात गावातील ३०० स्त्रीया व पुरुषांचा सहभाग होता. येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी, हातपंप याचा आसरा घ्यावा लागतो. पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ग्रामवासियांवर हे संकट निर्माण झाले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेऊन गावातील समस्यांचे निवेदन देण्यात आले. कार्यालयात मोर्चा पोहचला तरी तिथे सरपंच, उपसरपंच, सचिव तसेच कर्मचारी पोहचले नाही. सकाळी १० वाजतापासून दुपारी ३ वाजेपर्यंत ग्ग्रामस्थांनी प्रतीक्षा केली. अखेर ग्रामपंचायत कार्यालयासमोरच गावातील समस्या व गावकऱ्यांच्या मागण्या मोर्चासमोरच कथन करुन या समस्यांचे निवेदन पालकमंत्री, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, माजी आमदार यांना स्वाक्षरीसह देण्यात आले. गावातील नळयोजना वीज देयक न भरल्यामुळे बंद आहे. यातच मोटरपंप जळाल्यामुळे जलकुंभ पूर्णपणे भरत नाही. परिणामी येथील महिलांना सकाळपासून हातपंपावरुन पाणी भरावे लागते. घरगुती नळजोडणीवर बसविलेल्या मिटरमध्ये २ लाख ७० हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. संबंधितावर कारवाई करुन रकमेची वसुली करुन ती ग्रामपंचायत खात्यात जमा करावी. तसेच देयकाचा भरणा करावा, अशी मागणी निवेदनातून केली. दोन वर्षापासून रोजगार हमीची कामे पूर्णपणे बंद आहे. ही कामे त्वरीत सुरू करण्यात यावी. गावातील पथदिवे दोन महिन्यांपासून बंद आहे. ते सुरू करण्यात यावे. ग्रामसेवकाने कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे. गावातील तुंबलेल्या नाल्या वेळोवेळी साफ करण्यात याव्या. ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ वाढलेले गवत साफ करावे. पाण्याच्या टाकीची साफसफाई करावी यासह विविध मागण्यांकरिता पिंपळखुटा वासियांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व शंकर राठी, सुधाकर एडाखे, सतीश चवरे, अरविंद एडाखे, हरीदास काळपांडे, राजेश्वर देवगडे, दिपक पांडे, मारोती इंगळे आदींनी केले.(वार्ताहर)