शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

पिण्याच्या पाण्याकरिता ग्रामस्थांचा मोर्चा

By admin | Updated: January 7, 2017 00:55 IST

येथील नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प करण्यात आला आहे. नळयोजनेचे देयक न भरल्यामुळे वीजपुरवठा बंद केला

पिंपळखुटा येथील पाणीपुरवठा ठप्प : कृत्रिम पाणीटंचाईचा करावा लागतो सामना पिंपळखुटा : येथील नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प करण्यात आला आहे. नळयोजनेचे देयक न भरल्यामुळे वीजपुरवठा बंद केला असून नळयोजना ठप्प झाली आहे. याचा फटका येथील ग्रामस्थांना बसत आहे. हिवाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा विरोध करण्याकरिता येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चात गावातील ३०० स्त्रीया व पुरुषांचा सहभाग होता. येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी, हातपंप याचा आसरा घ्यावा लागतो. पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ग्रामवासियांवर हे संकट निर्माण झाले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेऊन गावातील समस्यांचे निवेदन देण्यात आले. कार्यालयात मोर्चा पोहचला तरी तिथे सरपंच, उपसरपंच, सचिव तसेच कर्मचारी पोहचले नाही. सकाळी १० वाजतापासून दुपारी ३ वाजेपर्यंत ग्ग्रामस्थांनी प्रतीक्षा केली. अखेर ग्रामपंचायत कार्यालयासमोरच गावातील समस्या व गावकऱ्यांच्या मागण्या मोर्चासमोरच कथन करुन या समस्यांचे निवेदन पालकमंत्री, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, माजी आमदार यांना स्वाक्षरीसह देण्यात आले. गावातील नळयोजना वीज देयक न भरल्यामुळे बंद आहे. यातच मोटरपंप जळाल्यामुळे जलकुंभ पूर्णपणे भरत नाही. परिणामी येथील महिलांना सकाळपासून हातपंपावरुन पाणी भरावे लागते. घरगुती नळजोडणीवर बसविलेल्या मिटरमध्ये २ लाख ७० हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. संबंधितावर कारवाई करुन रकमेची वसुली करुन ती ग्रामपंचायत खात्यात जमा करावी. तसेच देयकाचा भरणा करावा, अशी मागणी निवेदनातून केली. दोन वर्षापासून रोजगार हमीची कामे पूर्णपणे बंद आहे. ही कामे त्वरीत सुरू करण्यात यावी. गावातील पथदिवे दोन महिन्यांपासून बंद आहे. ते सुरू करण्यात यावे. ग्रामसेवकाने कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे. गावातील तुंबलेल्या नाल्या वेळोवेळी साफ करण्यात याव्या. ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ वाढलेले गवत साफ करावे. पाण्याच्या टाकीची साफसफाई करावी यासह विविध मागण्यांकरिता पिंपळखुटा वासियांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व शंकर राठी, सुधाकर एडाखे, सतीश चवरे, अरविंद एडाखे, हरीदास काळपांडे, राजेश्वर देवगडे, दिपक पांडे, मारोती इंगळे आदींनी केले.(वार्ताहर) पिंपळखुटा : येथील नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प करण्यात आला आहे. नळयोजनेचे देयक न भरल्यामुळे वीजपुरवठा बंद केला असून नळयोजना ठप्प झाली आहे. याचा फटका येथील ग्रामस्थांना बसत आहे. हिवाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा विरोध करण्याकरिता येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चात गावातील ३०० स्त्रीया व पुरुषांचा सहभाग होता. येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी, हातपंप याचा आसरा घ्यावा लागतो. पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ग्रामवासियांवर हे संकट निर्माण झाले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेऊन गावातील समस्यांचे निवेदन देण्यात आले. कार्यालयात मोर्चा पोहचला तरी तिथे सरपंच, उपसरपंच, सचिव तसेच कर्मचारी पोहचले नाही. सकाळी १० वाजतापासून दुपारी ३ वाजेपर्यंत ग्ग्रामस्थांनी प्रतीक्षा केली. अखेर ग्रामपंचायत कार्यालयासमोरच गावातील समस्या व गावकऱ्यांच्या मागण्या मोर्चासमोरच कथन करुन या समस्यांचे निवेदन पालकमंत्री, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, माजी आमदार यांना स्वाक्षरीसह देण्यात आले. गावातील नळयोजना वीज देयक न भरल्यामुळे बंद आहे. यातच मोटरपंप जळाल्यामुळे जलकुंभ पूर्णपणे भरत नाही. परिणामी येथील महिलांना सकाळपासून हातपंपावरुन पाणी भरावे लागते. घरगुती नळजोडणीवर बसविलेल्या मिटरमध्ये २ लाख ७० हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. संबंधितावर कारवाई करुन रकमेची वसुली करुन ती ग्रामपंचायत खात्यात जमा करावी. तसेच देयकाचा भरणा करावा, अशी मागणी निवेदनातून केली. दोन वर्षापासून रोजगार हमीची कामे पूर्णपणे बंद आहे. ही कामे त्वरीत सुरू करण्यात यावी. गावातील पथदिवे दोन महिन्यांपासून बंद आहे. ते सुरू करण्यात यावे. ग्रामसेवकाने कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे. गावातील तुंबलेल्या नाल्या वेळोवेळी साफ करण्यात याव्या. ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ वाढलेले गवत साफ करावे. पाण्याच्या टाकीची साफसफाई करावी यासह विविध मागण्यांकरिता पिंपळखुटा वासियांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व शंकर राठी, सुधाकर एडाखे, सतीश चवरे, अरविंद एडाखे, हरीदास काळपांडे, राजेश्वर देवगडे, दिपक पांडे, मारोती इंगळे आदींनी केले.(वार्ताहर)