स्वच्छतेवर जनजागृती : गाडगेबाबांचा वसा पुढे नेण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्पवर्धा : जनमानसात स्वच्छतेचा संदेश रुजविणारे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त देवळीच्या एस.एस.एन.जे महाविद्यालयातील नेताजी सुभाषचंद्र बोस रोव्हर स्काऊट पथक, राणी लक्ष्मीबाई रेंजर युनिट व राष्ट्रीय छात्र सेना पथकातर्फे पडेगाव येथे ‘ग्राम स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. एन.सी.सी.कॅडेटस, रोव्हर्स व रेंजर्सच्या नेतृत्वात गावातील मुख्य रस्ते स्वच्छ करून स्वच्छ ठेवा, स्वच्छ ठेवा आपले गाव स्वच्छ ठेवा ’ या जयघोषात प्रभातफेरी काढण्यात आली. स्थानिक उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच त्रिशुला फुलझले, उपसरपंच नरेंद पहाडे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक संजय माटे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, स्काऊटचे सहसचिव राम बाचले, मुख्यालय आयुक्त रामदास वडयाळकर, जिल्हा स्काऊट संघटक प्रकाश डाखोळे, जिल्हा गाईड संघटक मंजुषा जाधव, युवा केंद्र समन्वयक आकांशा उगेमुगे, प्रा. रवींद्र गुजरकर, संतोष तुरक व एन.सी.सी. आफिसर प्रा. मोहन गुजरकर उपस्थित होते. संजय माटे मार्गदर्शनात म्हणाले, युवक एक अमोघ शक्ती आहे. त्या शक्तीचा योग्य उपयोग झाल्यास कोणतेही अशक्य काम शक्य होवू शकते. गावाच्या विकासाकरिता युवावर्गास मार्गदर्शन करुन योग्य काम करण्याची दिशा रोव्हर-रेंजर पथक व एन.सी.सी.छात्र सैनिक करीत असल्याचे ते म्हणाले. वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांचा वसा सर्वांनीच पुढे नेण्याची गरज यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. समारोपीय कार्यक्रमात स्वयंसेवकांनी गाडगेबाबांच्या जीवनातील प्रसंग ‘मुलगी झाली हो!’ या पथनाट्यातून सादर केला. यात संत गाडगेबाबांची भूमिका आशिष परचाके, आईची भूमिका करिश्मा वाघमारे हिने तर इतर कलाकार म्हणून सपना बनसोड, दीक्षा खैरकार, स्मिता सुरजुसे, राहुल वैद्य यांना भूमिका पार पाडल्या. प्रास्ताविक प्रा. मोहन गुजरकर यांनी केले. संचालन सहाय्यक रेंजर लिडर आश्विनी घोडखांदे हिने तर आभार सपना बनसोड हिने मानले. यशस्वीतेकरिता रवी बकाले, सुमित तेलरांधे, धीरज कामडी, रोहित नरांजे, उमा मसराम व रोव्हर्सनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)सम्यक बुद्धविहारात गाडगेबाबा स्मृती दिन वर्धा - सम्यक बुद्ध विहार सांस्कृतिक भवन, प्रबुद्ध नगर मसाळा येथे संत गाडगे बाबा यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील ढाले तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रकाश कांबळे, हरिका ढाले, छाया कांबळे, उपस्थित होते. दगडात देव नसून माणसात देव आहे असे विचार जनमानसात रुजविणारे एकही संत गाडगेबाबा एकही वर्ग शिकलेले नव्हते. त्यामुळे आजच्या काळातील ते खरे वैज्ञानिक संत आहेत. त्यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा, अंधविश्वास, वाईट चाळी रिती विरोधात संघर्ष केला. ते चालते-बोलते विद्यापीठ होते असे विचार सुनील ढाले यांनी व्यक्त केले. इतरही मान्यवरांनी विचार व्यक्त केले. संचालन मृणाल कांबळे यांनी केले. तर आभार सुहानी ढाले यांनी मानले.
संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त ग्रामस्वच्छता अभियान
By admin | Updated: December 21, 2015 02:19 IST