शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नोटबंदी विरोधात वर्ध्यात काँग्रेस रस्त्यावर

By admin | Updated: January 6, 2017 18:52 IST

ऑनलाइन लोकमत वर्धा, दि. 6 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असल्याचा आरोप ...

ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 6 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्यावतीने आज वर्ध्यात प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला. या मोर्चात नोटबंदी व त्यामुळे झालेल्या दुष्परिणामाचा मोठ्या प्रमाणात निषेध नोंदविण्यात आला. 
या मोर्चात मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. मोर्चात आ. रणजित कांबळे, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, शहराध्यक्ष राजेश शर्मा, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, प्रवीण हिवरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 
तत्पूर्वी प्रदीप मंगल कार्यालयात एक सभा पार पडली. या सभेला प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण, आ. विजय वडेट्टीवार यांच्यासह चारूलता टोकस यांनी मार्गदर्शन केले. यानंतर मोर्चा नियोजित मार्गे रवाना झाला. हा मोर्चा इतवारा चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पाहोचला. मोर्चात सहभागी नागरिकांच्या हाती असलेले फलक व त्यावरील घोषवाक्य आकर्षक ठरले. येथे चारूलता टोकस व आ. कांबळे यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळला. मोर्चा पंचायत समिती कार्यालयाजवळ पोहोचताच पोलिसांच्यावतीने मोर्चा येथे रोखण्यात आला. यानंतर मोर्चेकरांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरिता रवाना झाले.  
जिल्हाधिकारी शैलश नवाल यांना निवेदन देताना त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळाच्यावतीने नोटबंदीमुळे निर्माण झालेली स्थिती व सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेतमालाला मिळत असलेले दर, शेतकऱ्यांकडून कर्जाची अव्वाच्या सव्वा दराने होत होत असलेली वसुली, यामुळे होत असलेल्या आत्महत्यांवरही चर्चा करण्यात आली. भाजीपाला वर्गीय शेतमालाचे दर पडल्याने शेतकरी ते फुकटात वाटत आहेत. काही ठिकाणी ते रस्त्यावर टाकत असून याकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत आहे, ही बाब खा. चव्हाण यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवल यांच्या निदर्शनात आणून दिली. या सर्व प्रकाराची माहिती वरिष्ठांकडे पोहोचविण्याकरिता हे निवेदन देण्यात येत आहे. ते वरिष्ठांना पाठविण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
नरेंद्र अन् देवेंद्रच्या राज्यात जनता दारिद्री - अशोक चव्हाण
 केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आहे. या दोन्ही नेत्यांच्या सत्तेत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेच्या हाती मात्र दारिद्र्य आले आहे. वर्धा ही महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुणीत झालेली भूमी आहे. यामुळे या आंदोलनाचा येथून प्रारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला. नोंदीबंदीच्या निर्णयानंतर उद्भवलेल्या स्थितीवर पक्षाचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी निर्माण केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची ताकद पंतप्रधानांत नाही. त्यामुळे ते चुप्पी साधून आहेत. नोंटबंदीच्या निर्णयानंतर केवळ गरिबांनाच रांगेत उभे रहावे लागले, कोणाताही श्रीमंत रांगेत दिसला नाही. एटीएमसमोर रांगेत काहींचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराला शासनाच्यावतीने मदत देण्याची मागणीही खा. चव्हाण यांनी यावेळी केली.
नोटबंदीमुळे ७० टक्के छोटे उद्योग बंद - विजय वडेट्टीवार
 
 नोंटबंदीचा निर्णय जाहीर झाला त्या काळापासून देशात सुमारे ७० टक्के छोटे उद्योग बंद झाले आहेत. शासन कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन करीत आहे. मात्र अद्याप ४१ हजार गावात बँकांच्या शाखा नाहीत, मग हे कॅशलेस व्यवहार कसे होतील याचा विचार त्यांच्याकडून करण्यात येत नसल्याचे प्रतिपादन आ. वडेट्टीवार यांनी केले.

https://www.dailymotion.com/video/x844nhf