शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

VIDEO : नोटबंदी विरोधात वर्ध्यात काँग्रेस रस्त्यावर

By admin | Updated: January 6, 2017 18:52 IST

ऑनलाइन लोकमत वर्धा, दि. 6 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असल्याचा आरोप ...

ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 6 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्यावतीने आज वर्ध्यात प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला. या मोर्चात नोटबंदी व त्यामुळे झालेल्या दुष्परिणामाचा मोठ्या प्रमाणात निषेध नोंदविण्यात आला. 
या मोर्चात मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. मोर्चात आ. रणजित कांबळे, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, शहराध्यक्ष राजेश शर्मा, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, प्रवीण हिवरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 
तत्पूर्वी प्रदीप मंगल कार्यालयात एक सभा पार पडली. या सभेला प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण, आ. विजय वडेट्टीवार यांच्यासह चारूलता टोकस यांनी मार्गदर्शन केले. यानंतर मोर्चा नियोजित मार्गे रवाना झाला. हा मोर्चा इतवारा चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पाहोचला. मोर्चात सहभागी नागरिकांच्या हाती असलेले फलक व त्यावरील घोषवाक्य आकर्षक ठरले. येथे चारूलता टोकस व आ. कांबळे यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळला. मोर्चा पंचायत समिती कार्यालयाजवळ पोहोचताच पोलिसांच्यावतीने मोर्चा येथे रोखण्यात आला. यानंतर मोर्चेकरांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरिता रवाना झाले.  
जिल्हाधिकारी शैलश नवाल यांना निवेदन देताना त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळाच्यावतीने नोटबंदीमुळे निर्माण झालेली स्थिती व सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेतमालाला मिळत असलेले दर, शेतकऱ्यांकडून कर्जाची अव्वाच्या सव्वा दराने होत होत असलेली वसुली, यामुळे होत असलेल्या आत्महत्यांवरही चर्चा करण्यात आली. भाजीपाला वर्गीय शेतमालाचे दर पडल्याने शेतकरी ते फुकटात वाटत आहेत. काही ठिकाणी ते रस्त्यावर टाकत असून याकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत आहे, ही बाब खा. चव्हाण यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवल यांच्या निदर्शनात आणून दिली. या सर्व प्रकाराची माहिती वरिष्ठांकडे पोहोचविण्याकरिता हे निवेदन देण्यात येत आहे. ते वरिष्ठांना पाठविण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
नरेंद्र अन् देवेंद्रच्या राज्यात जनता दारिद्री - अशोक चव्हाण
 केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आहे. या दोन्ही नेत्यांच्या सत्तेत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेच्या हाती मात्र दारिद्र्य आले आहे. वर्धा ही महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुणीत झालेली भूमी आहे. यामुळे या आंदोलनाचा येथून प्रारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला. नोंदीबंदीच्या निर्णयानंतर उद्भवलेल्या स्थितीवर पक्षाचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी निर्माण केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची ताकद पंतप्रधानांत नाही. त्यामुळे ते चुप्पी साधून आहेत. नोंटबंदीच्या निर्णयानंतर केवळ गरिबांनाच रांगेत उभे रहावे लागले, कोणाताही श्रीमंत रांगेत दिसला नाही. एटीएमसमोर रांगेत काहींचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराला शासनाच्यावतीने मदत देण्याची मागणीही खा. चव्हाण यांनी यावेळी केली.
नोटबंदीमुळे ७० टक्के छोटे उद्योग बंद - विजय वडेट्टीवार
 
 नोंटबंदीचा निर्णय जाहीर झाला त्या काळापासून देशात सुमारे ७० टक्के छोटे उद्योग बंद झाले आहेत. शासन कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन करीत आहे. मात्र अद्याप ४१ हजार गावात बँकांच्या शाखा नाहीत, मग हे कॅशलेस व्यवहार कसे होतील याचा विचार त्यांच्याकडून करण्यात येत नसल्याचे प्रतिपादन आ. वडेट्टीवार यांनी केले.

https://www.dailymotion.com/video/x844nhf