शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

नागपूर विधान भवनावर लावणार विदर्भाचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:52 IST

वेगळ्या विदर्भाचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यामध्ये पोचले असून महाराष्ट्र दिनी नागपूर विधान भवनावर विदर्भाचा झेंडा लावण्याचे आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून करण्यात येत आहे. त्याची तयारी सुरू झाली असून या संदर्भात विदर्भभर जिल्हा बैठकांचा दौरा सुरू आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र दिनी कार्यक्रम : विदर्भ राज्य आंदोलन समितीची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा /हिंगणघाट : वेगळ्या विदर्भाचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यामध्ये पोचले असून महाराष्ट्र दिनी नागपूर विधान भवनावर विदर्भाचा झेंडा लावण्याचे आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून करण्यात येत आहे. त्याची तयारी सुरू झाली असून या संदर्भात विदर्भभर जिल्हा बैठकांचा दौरा सुरू आहे.२०१९ च्या निवडणुकीच्या अगोदर भाजपाने स्वतंत्र विदर्भ राज्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे, शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन संपूर्ण कर्ज मुक्ती व उत्पादन खर्च व ५० टक्के ऐवढा हमी भाव देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, आदी आश्वासन त्वरीत पूर्ण करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.वेगळ्या विदर्भाचे आश्वासन व शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच विदर्भातून भाजपाचे ४४ आमदार निवडून आले व त्यामुळेच महाराष्ट्रात भाजपाची सत्ता बसली. महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्यामध्ये विदर्भाच्या जनतेने भाजपाला प्रचंड साथ दिली; परंतु भाजपाच्या नेत्यांनी मात्र विदर्भाच्या जनतेला दिलेले विदर्भ राज्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे विदर्भातील जनता भाजपापासून नाराज झाली असून निवडणुकीत भाजपाच्या मतपेटीवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे.शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहे. भाजपा सरकार शेतकऱ्यांना मरण्यासाठी सरणावर सोडत आहे. भाजपाने निवडणुकीच्या काळात आश्वासन दिले होते. त्यापैकी एकही आश्वासन पाळले नाही. त्यामुळे विदर्भवादी, शेतकरी, बेरोजगार, व्यापारी सर्वच क्षेत्रातून नाराजीच्या सूर निघत आहे. भाजपाने निवडणुकी अगोदर स्वतंत्र विदर्भाची घोषणा करून विदर्भ राज्याची निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा विदर्भातील जनता भाजपाला फटका दिल्या शिवाय राहणार नाही.महाराष्ट्रदिनी यशवंत स्टेडीयम नागपूर येथून दुपारी विदर्भ मार्च निघेल व १ वाजेपर्यंत हा मार्च विधान भवनावर धडक देणार आहे. तेथे विदर्भाचा झेंडा लावण्याचे आंदोलन होईल. विदर्भातील जनतेने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे. २५ एप्रिलला विदर्भ राज्य आंदोलन समितीची हिंगणघाट तालुका कार्यकर्ता बैठक एपीएमसी हॉलमध्ये पार पडली. त्यांनतर वर्धेतही बैठक झाली. येथे महाराष्ट्र दिनी नागपूर विधान भवनावर झेंडा लावण्याचे ठरले. या बैठकीत मधु हरणे, रमेश पाटील, संजय चौधरी, पुंडलीक, अभिजीत लाखे, साहेबराव येडे, गणेशपुरे, कैलास घोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.रोजगाराचे आश्वासनही खोटेच२ कोटी लोकांना वर्षाला रोजगार देणार म्हणजे ४ वर्षात ८ कोटी लोकांना तर रोजगार मिळालाच नाही उलट नोटबंदी व जीएसटी नंतर उद्योग व व्यापारामध्ये अवकळा आली. ३ लाखांपेक्षा जास्त लहान उद्योग बंद झाले. शहरी तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे.