शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विदर्भात कडधान्याचे उत्पादन २५ टक्क्यांखालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 16:08 IST

पावसाची मोठी ओढ व नंतर सततचा पाऊस, ढगाळी वातावरण व मजुरांचा अभाव यामुळे विदर्भात मूग, मटकी (मोट) या पिकांचे २५ टक्केही उत्पादन झाले नाही तर आता तुरीच्या पिकातही मोठी घट होण्याची शक्यता दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा परिणाम उत्पादनात होणार घट ओल्या दुष्काळाची छाया

फनिंद्र रघाटाटे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरुवातीला पावसाची मोठी ओढ व नंतर सततचा पाऊस, ढगाळी वातावरण व मजुरांचा अभाव यामुळे विदर्भात मूग, मटकी (मोट) या पिकांचे २५ टक्केही उत्पादन झाले नाही तर आता तुरीच्या पिकातही मोठी घट होण्याची शक्यता दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे.मृग नक्षत्राच्या उत्तरार्धात थोडासा पाऊस आला. पुढे पाऊस येईल या अपेक्षेने विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी कापूस, तूर, सोयाबीनसह मूग व मटकीची पेरणी केली. मात्र, नंतर २५ जुलैपर्यंत पाऊस तर आलाच नाही; पण चक्क उन्हाळा तापला. परिणामी, अल्प ओलाव्याने अंकुरलेले रोपटे करपले. त्यातही काही रोपटी जगली. नंतर आलेल्या पावसाने पिके जोमात बहरली असली तरी मूग, मटकी व तुरीचे पीक खूप विरळ झाले. नंतरच्या काळात विदर्भात कधी मुसळधार तर कधी पावसाची रिपरिप व पाऊस नसेल तेव्हा ढगाळ वातावरण यामुळे मूग, मटकी व तुरीचे पीक बाळसे धरूच शकले नाही. अल्पावधीतील मूग, मटकी या पिकांना माफक शेंगा भराचा व पक्वही झाल्या; पण सततच्या पावसाने जमीन ओली राहिल्याने मटकीच्या पिकाची कापणी करणे शेतकऱ्यांना कठीण झाले. तर मुगाच्या शेंगा तोडणीसही मजुरांच्या अभावामुळे व वाढत्या मजुरीमुळे शेंगा झाडावरच फुटल्या. परिणामी, मूग, मटकी पिकाच्या उताऱ्यात घट आली तर दीर्घ पीक असलेल्या तुरीची अवस्था तशीच आहे. आधीच विरळ पडलेले तुरीचे पीक सततच्या पावसाने सखल भागात कारपले तर उंच भागातील झाडांची अपेक्षित वाढ झाली नाही तर झाडे खोडही बनले नाही. तसेच शाखाही केल्या नाही. आता ऑक्टोबर महिन्यात शेवऱ्यावर येणाऱ्या तुरीच्या झाडांना किती शेवरा येईल, हे संशयास्पद असल्याने तुरीच्या पिकात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली.पाऊस पुढेही येतच राहणार, असा हवामान खात्याचा अंदाज असल्याने निंदण व डवरणीची कामे, प्रभावित झाली असून सोयाबीन पिकाची कापणी कशी करावी, हा प्रश्नही शेतकऱ्यांना भेडसावण्याची शक्यता आहे. तर कपाशीची झाडे अजूनही रिकामी आहेत. ओल्या दुष्काळाची शक्यता आता पक्की होत आहे.

टॅग्स :agricultureशेती