शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
3
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
4
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
5
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
6
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
7
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
8
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
9
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
10
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
11
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
12
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
13
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
14
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
15
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
16
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
17
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
18
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
19
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
20
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 

विदर्भ राज्यासाठी ‘विदर्भमुक्ती मार्च’

By admin | Updated: April 27, 2016 02:17 IST

महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या बऱ्याच काळात विदर्भावर अन्याय, अत्याचार झाले. शेतकरी आत्महत्याचे वाढते प्रमाण विकासाचा अनुशेष, ...

जोगेंद्र कवाडे : वैदर्भीयांचा अपमान खपवून घेणार नाही पुलगाव : महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या बऱ्याच काळात विदर्भावर अन्याय, अत्याचार झाले. शेतकरी आत्महत्याचे वाढते प्रमाण विकासाचा अनुशेष, पाण्याची टंचाई, रोजगाराचा अभाव असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याने वेगळे विदर्भ राज्य होणे गरजेचे आहे. वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीसाठी तेलंगणाच्या धर्तीवर आंदोलन होणे आवश्यक असून आपण विदर्भवादी मंडळींना सोबत घेवून, आमगाव ते खामगाव असा विदर्भ मुक्ती मार्च काढणार असल्याचा निर्धार पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी चर्चा करताना व्यक्त केला.‘विकासाच्या संदर्भात आवश्यक त्याबाबींनी परिपूर्ण असा हा विदर्भ असून एकेकाळी प्रांत वऱ्हाड अन् आहे सोन्याची कुऱ्हाड’ असे या विदर्भाला म्हटल्या जात होते; परंतु काही मंडळींनी विदर्भाकडे पाठ फिरविली. त्यामुळे विकासाचा अनुशेष राहिला. विदर्भातला माणूस आळशी आहे, असे म्हणून काहींनी आमची चेष्टा केली. हा वैदर्भियांचा अपमान आपण कदापी खपवून घेणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले. पुलगाव भूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झाली असून विदर्भराज्य निर्मिती चळवळीत या शहराचे महत्त्वाचे योगदान आहे. म्हणून विदर्भमुक्ती आंदोलनाचे रणशिंग पुलगावातून फुंकले जाईल, असे आ. कवाडे यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ वा आगमनदिन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते पुलगावात आले. त्यावेळी ते बोलत होते. स्थानिक बुद्ध विद्या विहारात सोमवरी संपन्न झालेल्या आगमनदिन कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रेम भिमटे होते. याप्रसंगी प्रबोधनकार प्रवीण कांबळे व संच यांनी भीम गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमापूर्वी आ. कवाडे यांनी नगर परिषद प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले तर येथून प्रमुख अतिथीसह कार्यकर्त्यांनी अभिवादन रॅली काढली. या कार्यक्रमास विहार समिती पदाधिकाऱ्यासह मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)