शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

पावसाच्या दडीने बळीराजा चिंतेत

By admin | Updated: August 9, 2014 01:42 IST

पावसाच्या आगमनानंतर सुखावलेल्या शेतकऱ्याने पेरण्या आटोपल्या. यात काही ठिकाणी दुबार, तिबार पेरण्या झाल्या. आलेला पाऊस पुन्हा दडी मारणार नाही ...

वर्धा : पावसाच्या आगमनानंतर सुखावलेल्या शेतकऱ्याने पेरण्या आटोपल्या. यात काही ठिकाणी दुबार, तिबार पेरण्या झाल्या. आलेला पाऊस पुन्हा दडी मारणार नाही असे वाटत असताना गत १५ दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. पावसामुळे बळीराजा पुन्हा चिंतेत सापडला आहे. जिल्ह्यात पावसाच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. पाऊस आला नसल्याने अनेकांनी केवळ कपाशीची लागवड केली. जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. ज्यांच्याकडे स्प्रिकलरची सुविधा होती त्यांनी सिंचनाच्या माध्यमातून कपाशी जगविली; मात्र ज्यांच्याकडे ही सोय नव्हती त्यांनी पावसाची प्रतीक्षा करीत पेरण्या आटोपल्या. अशात पावसाने दडी मारल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. पाऊस आल्यावर काहींच्या पेरण्या दडपल्या तर काही शेतकऱ्यांच्या उगविल्या. आता पाऊस दडी मारणार नाही, उगविलेल्या पिकाची वाढ होईल असे वाटत असताना पुन्हा पावसाने दडी मारली. यामुळे उगविलेली पिके धोक्यात आली आहेत. पिकांची वाढच होत नसल्याने उत्पन्नाची चिंता आता बळीराजाच्या चेहऱ्यावर दिसू लागली आहे. (प्रतिनिधी)आर्थिक टंचाईत बँकांनी कर्ज नाकरलेजिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली. गत वर्षी झालेली अतिवृष्टी व यंदा निर्माण झालेली कोरड्या दुष्काळाची स्थिती यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. अशा अडचणीच्या काळात शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत त्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याच्या सूचना केल्या; मात्र बँकांनी शेतकऱ्यांच्या अडचणीचा लाभ घेत त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याऐवजी आम्हाला अशा सूचनाच नसल्याचे सांगितले. यामुळे शेतकरी आणखीच अडचणीत सापडला आहे. कपाशीवर मर रोगाचे सावटपावसाच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यात ज्यांच्याकडे स्प्रिकलरची सोय होती त्यांनी सिंचन करून पीक जगविले. आता पाऊस आल्याने त्यांनी स्प्रिंकलर बंद केले. मात्र सध्या वातावरणात असलेल्या उष्म्यामुळे त्यांच्या कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे स्थिती आहे. यामुळे त्यांची चिंता अधिक वाढली आहे.श्रावण सरी येतात जातातसध्या श्रावण सुरू आहे. श्रावणातला पाऊस एकतर सतत येतो नाही तर त्याच्या सरी कुठे येतात कुठे नाही अशी स्थिती असते. जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी पावसाच्या सरी कोसळतीलच अशी स्थिती नाही. सकाळी उन्ह व दुपारून केवळ आभाळ असे चित्र जिल्ह्यात आहे. ढगावरून पावसाचे अंदाज बांधले जातात; मात्र ते अंदाजच ठरत आहेत. पावसाचा थेंही पडत नाही. उत्पन्नाची आशा मावळलीबळीराजाने पहिली पेरणी मोडली असताना दुबार पेरणी केली. यात आलेल्या पावसाने ती उगविली. पाऊस आल्याने काही शेतकऱ्यांनी तिबार पेरणी केली. पेरणी उगविली, आता पाऊस दगा देणार नाही असे वाटत असताना पाऊस बेपत्ता झाला. अशात सोयाबीनचे पीक मोजक्या कालावधीचे आहे. त्याचा वेळ संपत आहे. यामुळे उत्पन्न होईल अथवा नाही अशी चिंता शेतकऱ्याला पडली आहे.