शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

वीजचोरीच्या माहितीची पडताळणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 21:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मीटर वाचकाने रिडींग घेतेवेळी ग्राहकांकडे आढळलेल्या वीजचोरीची माहिती देऊनही त्यापैकी अनेक ग्राहकांवर कारवाई टाळून ग्राहक मिळाला नाही, किंवा तेथे चोरी नाही यासारखे अहवाल सादर करण्यात आले आहे, अशा सर्व ग्राहकांची तपासणी भरारी पथकामार्फत करण्याचा इशारा महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सर्व अधिकारी व ...

ठळक मुद्देमहावितरणच्या प्रादेशिक संचालकांकडून अधिकाऱ्यांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मीटर वाचकाने रिडींग घेतेवेळी ग्राहकांकडे आढळलेल्या वीजचोरीची माहिती देऊनही त्यापैकी अनेक ग्राहकांवर कारवाई टाळून ग्राहक मिळाला नाही, किंवा तेथे चोरी नाही यासारखे अहवाल सादर करण्यात आले आहे, अशा सर्व ग्राहकांची तपासणी भरारी पथकामार्फत करण्याचा इशारा महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे.अनेक मीटर वाचकांनी ग्राहकांकडे होत असलेल्या वीजचोरीची माहिती स्वयंस्फूर्तीने महावितरणकडे दिली, त्या माहितीची योग्य शहानिशा करण्याच्या सुचना संबंधित अभियंत्यांना देऊनही संबंधित ग्राहक मिळाला नाही, किंवा तेथे चोरी नाही यासारखे अहवाल मिळाल्याने अश्या वीज ग्राहकांची तपासणी भरारी पथकामार्फ़त करण्यात येऊन चुकीचा अहवाल देणा-या सर्व संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे सप्टेबर अखेरपर्यत अशासर्व ग्राहकांची रितसर तपासणी करून योग्य अहवाल सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत. थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनी पुनर्जोडणी शुल्काचा भरणा करूनही वीज पुरवठा बंद असलेल्या ग्राहकांची त्वरीत पडताळणी करण्याचे आदेशही प्रादेशिक संचालक यांनी दिले आहेत. परिक्षेत्रातील पुनर्जोडणी शुल्काचा भरणा केलेले १६७७६ तर थकबाकीचा भरणा केलेल्या ७३११ ग्राहकांचा वीजपुरवठा अद्याप सुरु झालेला नाही.अशा प्रत्येक ग्राहकांची पडताळणी सप्टेबर अखेरपर्यंत पुर्ण करण्यात यावी, याशिवाय वाढ़ीव वीज वापराच्या प्रमाणात लघुदाब गैरकृषी वीज विक्री वाढही अपेक्षित असल्याने परिक्षेत्रातील सर्व मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंते यांनी यासाठी प्रयत्न करावेत. एप्रिल ते आॅगस्ट या काळात अकोला आणि वर्धा मंडलातील वीजहानी वाढली असून आकोट, वर्धा आणि कॉग्रेसनगर विभागातील लघुदाब गैरकृषी वीज विक्री ही वाढ़ीव वीज वापराच्या तुलनेत अनुरूप नसल्याबाबतही त्यांनी संबंधित अभियंत्यांची कानउघाडणी केली आहे.थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित होणारसार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडील वीज देयकाच्या वसुलीचे प्रमाण सर्वत्र अत्यल्प असल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा त्वरीत खंडित करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत.आॅगस्ट महिनाअखेर एकूण मीटर वाचनापैकी केवळ ३७ टक्के नोंदीचे प्रमाणीकरण झाले होते ते प्रमाण आता ६५ टक्यापर्यंत झाले असून सप्टेंबर अखेरपर्यंत ते १०० टक्के करण्यात यावे, सामान्यपेक्षा ४ पट अधिक आलेल्या वीज बिलांचे १०० टक्के सत्यापन करावे, मंद आणि दोषपूर्ण मीटरच्या बदल्यात लावण्यात आलेल्या मीटरवरील नोंदीनुसार मागील वीज वापराचे योग्य ते मूल्यमापन करणे, त्यांच्या वापराशी सुसंगत देयक संबंधित ग्राहकाला देण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत.वीजहानी थांबविण्याकरिता प्रयत्नसंपुर्ण परिक्षेत्रातील ११३४ ग्राहक मीटरच्या मार्फ़त वीज वापरत असतांनाही त्यांचे बिल तयार होत नाही. माहिती तंत्रज्ञान विभागातही या ग्राहकांची नोंद नाही. अशा ग्राहकांवर कारवाई करण्याच्या सुचनाही खंडाईत यांनी केल्या आहेत. येत्या दोन महिन्यात अधिक हानी असलेल्या शहरांची वीजहानी कमी कराण्यासाठीचे नियोजन तसेच शहरी भागातील पायाभूत सुविधांचे मजबूतीकरण करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करा. सोबतच जिल्हा मुख्यालयांच्या सुशोभीकरणाच्या कामांचे अंदाजपत्रकासोबतच वन क्षेत्रातील दुर्घटना टाळण्यासाठी योग्य अंदाजपत्रक त्वरीत तयार करण्याच्या सुचनाही भालचंद्र खंडाईत यांनी केल्या आहेत.विविध जबाबदाऱ्या निश्चित कराबिल दुरुस्ती किंवा ग्राहकांना दिल्या जाणाºया जमा रकमेच्या एकूण देयकांची रक्कम ही त्या महिन्याच्या एकूण मागणीच्या १ टक्यापेक्षा अधिक नसावी. विविध स्तरांवर सर्व प्रलंबित बिल दुरुस्ती, बिल पुनरावृत्ती आदीचे प्रमाण बंद करण्यात यावेत. बिल दुरुस्ती प्रकरणांची तपासणी करताना चुकीच्या दुरुस्त्या, क्रेडिट बिल्स आदीची जबाबदारी निश्चित करण्याच्या सुचनाही करण्यात आल्या.