शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाहकाला १२,७५० रुपयांचा दंड

By admin | Updated: September 19, 2016 00:43 IST

राज्य परिवहन महामंडळात वाहकांकडून तिकिटाच्या रकमेत अपहाराची अनेक प्रकरणे आहेत.

तिकिटांच्या रकमेची अफरातफर : तडजोडीतून निपटारा करण्याचे आदेश वर्धा : राज्य परिवहन महामंडळात वाहकांकडून तिकिटाच्या रकमेत अपहाराची अनेक प्रकरणे आहेत. असे प्रकार वाढत असल्याने अशा वाहकांवर प्रचलीत नियमानुसार कार्यवाही करण्यास विलंब होत असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने तडजोड पद्धत अंमलात आणली आहे. या पद्धतीत वाहकाने केलेल्या अफरातफरीला पाचशे, साडेसातशे व एक हजार पटीने दंड आकारला जात आहे. याच पद्धतीतून वर्धेतील एका वाहकाला तब्बल १२ हजार ७५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तिकिटाच्या अपहार प्रकरणात जिल्ह्यात २७३ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. या प्रकरणाची चौकशी करून त्या निकाली काढण्याच्या सूचना राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. हा निर्णय संपूर्ण राज्याकरिता असून त्यावर अंमलबजावणी सुरू झाली आहे. तडजोड करताना मंडळाच्यावतीने अनेक नियम दिले आहेत. वाहकाची अपहार करण्याची पहिली वेळ असेल तर त्याने अपहार केलेल्या रकमेला ५०० रुपयांनी गुणायचे म्हणजेच पाचशेपट दंडाची रक्कम होईल. ही रक्कम त्या वाहकाकडून वसूल करण्यात येणार आहे. वाहकाने जर हा प्रकार दोन वेळा केला असल्यास अपहाराच्या रकमेला ७५० आणि तीन वेळा केला असेल तर त्याला एक हजार रुपयांनी गुणाकार करून तेवढी रक्कम दंड म्हणून देण्यात येणार आहे. असाच दंड वर्धेतील गंगासागर लांजेवार या वाहकाला ठोठावण्यात आला आहे. लांजेवार यांच्यावर दोन वेळा अपहार केल्याची नोंद विभागात आहे. यामुळे त्यांनी केलेल्या अपहारावर साडेसातशे पट दंड आकारण्यात आला आहे. एवढी रक्कम कशी भरावी असा प्रश्न आता लांजेवार यांच्यासमोर उभा ठाकला आहे. ही पद्धत कर्मचाऱ्यांना आर्थिक भुर्दंड देणारी असून जुनीच पद्धत बरी असल्याचे परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे.(प्रतिनिधी) वाढती प्रकरणे मार्गी काढण्याकरिता वरिष्ठांकडून या सूचना आल्या आहेत. त्या सूचनांनुसार कार्यवाही करण्यात येत आहे. वाहकांनी केलेल्या अपहाराच्या संख्येनुसार दंड देण्यात येणार आहे. वर्धेत अशा प्रकाराची पत्र पाठविण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यात जे होकार दर्शवतील त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. दंड अमान्य करतील त्यांच्यावर प्रचलीत पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल.- राजीव घाटोळे, विभागीय नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, वर्धा.वाहकाने होकार दिल्यास तडजोडतडजोड पद्धत एक मार्गी नसून ती द्विमार्गीय आहे. यात जर अपहार करणाऱ्या वाहकाने तडजोड करण्यास होकार दिला तरच ती होऊ शकते. जर या प्रकाराला त्याने नकार दिला तर कुठलीही तडजोड होणे शक्य नाही. त्याने या पद्धतीला नकार दिला तर त्याच्यावर प्रचलीत पद्धतीने कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे ही पद्धत यशस्वी होण्याकरिता तडजोडीची रक्कम भरण्याकरिता वाहक तयार असणे गरजेचे आहे. जिल्ह्यात २७३ प्रकरणे तिकिटींच्या अपहाराची वर्धेत तब्बल २७३ प्रकरणे चौकशीत आहेत. त्यांची चौकशी करून कारवाई करणे कठीण होणार आहे. हीच अवस्था राज्याची आहे. यामुळे तडजोड पद्धत अंमलात आणण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या पद्धतीतून वर्धेतील वाहकांना पत्र पाठण्यिाचे काम सुरू झाले आहे.