शिबिर सुरू : वारंवार रद्द होत असलेल्या शिबिरांनी आर्वीकर झाले होते हैराणआर्वी : आरटीओ शिबिर हे महिन्यातून एक दिवस प्रत्येक तालुका स्तरावरील विश्रामगृहात आयोजित केले जाते. परंतु ऐन वेळेवर विश्रामगृहामार्फत शिबिर घेण्याकरिता जागा व सोयीसुविधा देण्यास नकार दिल्या जात असल्यामुळे आरटीओ विभागाला हे शिबिर रद्द करावे लागले. पण आर्वी येथील १८ फेब्रुवारी ला रद्द झालेले शिबिर शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांच्या पुढाकाराने त्याचवेळी सुरू झाले.जिल्ह्यातील आरटीओ विभागामार्फत तालुक्याच्या ठिकाणी मोटार वाहन विषयक शिबिर महिन्यातून एकदा आयोजित केले जाते. आरटीओ विभागामार्फत संपूर्ण वर्षाचे वेळापत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले जात असतानाही ऐनवेळेवर विश्रामगृहात जागा न दिल्यामुळे शिबिर रद्द करावे केले जाते. याचा नाहक त्रास व भुर्दंड सामान्य नागरिकांना सोसावा लागतो. मागील तीन महिन्यांपासून हे शिबिर सतत रद्द होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केल्या जात आहे. याकरिता शिवसेनेमार्फत वारंवार पाठपुरावा करण्यात आला. यासंबंधीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वी यांना देण्यात आले. फेब्रुवारी महिन्याच्या १८ तारखेला आयोजित असलेले शिबिरही असेच विश्रामगृहातील खोली रिकामी नसल्याचे कारण सांगून पुन्हा रद्द करण्यात आले. त्यामुळे तालुक्यातून परवान्याकरिता आलेल्या ३०० ते ४०० नागरिकांना पुन्हा हिरमोड झाला. ही बाब लक्षात येताच शिवसेनचे जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख यांनी कार्यकर्त्यांसोबत शिबिराचे ठिकाण गाठून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली व विश्रामगृहातील खोली खाली करून शिबिर सुरू करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे नागरिकांना होणारा हिरमोड थांबला आहे.आर्वी येथील रद्द झालेल्या शिबिरातील नागरिकांना कारंजा येथे मागील ८ फेब्रुवारीला शिबिरात बोलावले होते. पण कारंजा येथील शिबिरही देखील रद्द झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाला खोली राखीव ठेवण्याकरिता आरटीओ विभागामार्फत पत्र दिले असतानाही खोली रिकामी का ठेवल्या जात नाही.(शहर प्रतिनिधी)
वाहन परवान्यासाठीची भटकंती थांबली
By admin | Updated: February 20, 2016 03:05 IST