शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

गिरड परिसरात बहरणार देशी कापसाचे वाण

By admin | Updated: June 22, 2016 02:06 IST

केंद्र शासनाच्या ‘मेरा गाव मेरा गौरव’ या उपक्रमाद्वारे समुद्रपूर तालुक्यातील गिरडसह परिसरातील पाच गावात आदिवासी शेतकऱ्यांना देशी कापूस लागवडीस ...

आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा : भारतीय कापूस अनुसंधान संस्थेचा उपक्रमगिरड : केंद्र शासनाच्या ‘मेरा गाव मेरा गौरव’ या उपक्रमाद्वारे समुद्रपूर तालुक्यातील गिरडसह परिसरातील पाच गावात आदिवासी शेतकऱ्यांना देशी कापूस लागवडीस भारतीय कापूस संशोधन संस्थेच्यावतीने प्रात्याक्षिक देण्यात आले. या पाच गावातील चाळीस शेतकऱ्यांचा एका एकरावरील होणारा बियाणे, खत व औषधावरील खर्च वाचला आहे. या गावांमध्ये देशी कापसाचे वाण बहरणार आहे. पहिल्यादांच बिटी कापूस आणि देशी कापूस यातील तुलनात्मक अभ्यास या शेतकऱ्यांच्या शेतात होणार आहे. यामुळे पुढील वर्षात शेतकऱ्यांना घरचे कापूस बियाणे राखणे आणि लागवड करणे सोईचे होणार आहे. केंद्र सरकारच्या ‘मेरा गाव मेरा गौरव’ या कार्यक्रमांतर्गत आईसीएआर केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथील चार शास्त्रज्ञाची गिरड समुहातील मोहगाव, आर्वी, फरीदपूर, जोगीनगुंफा व शिवनफळ या गावांची निवड केली आहे. यामध्ये डॉ. नंदिनी गोगटे, डॉ. सर्वानन, डॉ. शैलेश गावंडे, डॉ. जोय दास या चार प्रमुख शास्त्रज्ञांचा समावेश आहे. यांतर्गत ही चमू वेळोवेळी या पाच गावांना भेट देवून शेतकऱ्यांच्या कृषी विषयक तसेच कपाशी पिकासंदर्भात तांत्रिक अडचणींचे निवारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यांतर्गत गिरड येथील मगन संग्रहालय समिती कार्यालय येथे आईसीएआर केंद्रीय कापूस संशोधन संस्था आदिवासी उपायोजनेच्या माध्यमातून गिरड समुहातील शिवनफळे, आर्वी, मोहगाव व फरीदपूर या चार गावातील ४० आदिवासी शेतकऱ्यांना देशी कपाशीच्या बियाणांचे मोफत वितरण व मार्गदर्शन कार्यशाळेत करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या ४० आदिवासी शेतकऱ्यांना २ किलो देशी कपाशी (अर्धा एकर ६० बाय ३० अंतराने), १ किलो गवार, (३ मीटरच्या ४५ बाय १० च्या अतराने दोन ओळी) तसेच बीटी कपाशीची १ थैली (४५० ग्राम, अर्धा एकर ९० बाय ३० अंतराने) या प्रमाणे प्रत्येकी एक एकर प्रात्याक्षिकासाठी बियाण्याचे वितरण करण्यात आले. कपाशीवरील खर्च खूप वाढला आहे. तो शाश्वत आणि शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करून कसा कमी करता येईल या उद्देशाने कपाशीचे देशी वाण देण्यात आले आहे. यामध्ये रोग आणि कीट प्रतिकारशक्ती असून कोरडवाहू शेतीसाठी ती उपयुक्त आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेद्वारे देशी विरूद्ध बीटी असा तुलनात्मक अभ्यास करून व तो शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या आधाराने पटवून देण्याच्या उद्देशाने प्रत्येकी एका एकर प्रात्यक्षिकाद्वारे पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.(वार्ताहर)