शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णव जन तो ते ने कहीएं...

By admin | Updated: July 20, 2014 00:06 IST

संत कबीर, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मा यांचे चित्रण हुबेहूब गायनाच्या माध्यमातून डॉ. परमानंद आणि मनु यादव यांनी मांडले. त्यामुळे सेवाग्राम आश्रम

परमानंद यांच्या गायनाने सेवाग्राम आश्रमवासी भारावलेवर्धा : संत कबीर, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मा यांचे चित्रण हुबेहूब गायनाच्या माध्यमातून डॉ. परमानंद आणि मनु यादव यांनी मांडले. त्यामुळे सेवाग्राम आश्रम परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या सेवाग्राम या ठिकाणी शनिवारी कोलकाताच्या पूर्व क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने भजन गायनाचा कार्यक्रम पार पडला.संगीत क्षेत्रातील विख्यात, तज्ज्ञ असलेले डॉ. परमानंद यांनी संत कबीर, महात्मा गांधीजींचे विचार आपल्या सुरेल आवाजातून उपस्थितांपर्यंत पोचविले. त्यामध्ये त्यांनी आपल्या गायनाची सुरुवातच ‘वैष्णव जन तो ते ने कहीएं’ या महात्मा गांधीजींच्या आवडत्या भजनाने केली. त्यामुळे परिसरात एकूणच भक्तीमय वातावरणाची निर्मिती झाली होती. एकापाठोपाठ एक अशा सुरेल एकूणच भक्तीमय वातावरणाची वाहवा मिळवत त्यांनी मने जिंकली. गायन करतानाच त्यांनी गीत, भजनांचा अर्थही विषद करून सांगितल्याने भाषेची काठिण्यपातळी रसिकांना सहज व सोपी झाल्याने गीत, भजनातील गोडवा अधिकच रसिकांना चाखायला मिळाला.‘गुरूने बनाया चेला, नइया.... लागी लागी रे....’ आदी गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यासह डॉ. परमानंदांनी कुमार गंधर्व यांची भजनेही उपस्थितांना ऐकवून आपल्या कलेचे प्रदर्शन उत्तमरित्या सादर केले. त्यांच्या आवाजाने रसिकही सुखावले. संत कबीर, महात्मा गांधीने, कुमार गंधर्व यांचे विचार गायनाच्या माध्यमातून ऐकावयास मिळाल्याने तरूण वर्गासह वयोवृद्धांपर्यंत त्यांच्या कलेचे केलेले गुणगान याठिकाणी ऐकावयास मिळाले.डॉ.परमानंद यांच्या गायन कार्यक्रमानंतर उत्तरप्रदेशात वीरतेचे गुणगान गाऊन उत्तरप्रदेशातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना धीर देणारे, केंद्र सरकारच्या बिस्मिला खाँ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असलेले वाराणसीचे मनू यादव यांनीही लोकगीतांच्या माध्यमातून त्यांची कला सादर केली. सन १८५७ चा उठाव आपल्या गायनातून उपस्थितांच्या डोळ्यासमोर हुबेहुब उभा केला. ‘हमरे भैया वतने की सिपाही....’ या त्यांच्या गाण्याने सर्वांच्याच अंगावर शहारे उभे राहिले. लोकगीतातच आत्मा असल्याचे त्यांनी आपल्या गीत सादरीकरणातून दाखवून दिले. तसेच उपस्थितांची वाहवा मिळविली.(जिल्हा प्रतिनिधी)