शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Wardha news आर्वीच्या वैशाली हिवसे बनल्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 12:47 IST

Wardha news आर्वीतील  वैशाली सुरेशचंद्र  हिवसे  यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या कंपनीने  कमांडिंग ऑफिसर पदी नियुक्ती केली आहे,  पहिल्या महिला अधिकारी म्हणून वर्धा जिल्ह्याचेच नव्हे तर विदर्भाचे नाव मोठ केले आहे.

राजेश सोळंकी

 लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: आर्वीतील  वैशाली सुरेशचंद्र  हिवसे  यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या कंपनीने  कमांडिंग ऑफिसर पदी नियुक्ती केली आहे,  पहिल्या महिला अधिकारी म्हणून वर्धा जिल्ह्याचेच नव्हे तर विदर्भाचे नाव मोठ केले आहे.

रोड कंट्रक्शन कंपनीने (आरसीसी) इंडिया चीन बॉर्डर कनेक्टिव्हिटीची जबाबदारी महिला  सशक्तीकरण म्हणून  आर्वीच्या वैशाली हिवसे यांना दिली असल्याने आर्वीची (वर्धा )कन्या म्हणून विदर्भात गर्वाची आणि अभिमानाची ही  बाब आहे वैशाली यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण येथील मॉडेल हायस्कूलमध्ये झाले होते त्यानंतर येथील नगरपालिका कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर सेवाग्राम बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी घेतली त्यानंतर त्यांनी नागपुरला  रामदेव बाबा कॉलेजमध्ये एम टेक पूर्ण करून  यूपीएससीची परीक्षा दिली. त्यानंतर बॉर्डर ऑर्गनायझेशनमध्ये त्यांचे सिलेक्शन झाले. हे बीआरओ आर्मीसोबत सलग्न आहे डिफेन्सच्या अंडरमध्ये आहे. चीन चायना बॉर्डर सध्याचे बांधकाम चालू आहे त्यांचा पूर्ण कार्यभार व त्यांची देखरेख वैशालीकडे आहे डिफेन्स आणि आर्मीशी निगडीत दहा वर्षापासून त्या कार्यरत आहेत्यांच्या आई या येथील मॉडेल हायस्कुल वाथोडा येथे मुख्याध्यापिका होत्या तर त्यांचे वडील येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात शारीरिक शिक्षक होते.  वैशाली यांचा  मोठा भाऊ डॉ सचिन हिवसे  आर्वीला बाल रोग तज्ञ  आहे त्याची लहान बहीण नागपूरला हायकोर्टात वकील आहे.

वैशाली हिवसे  सिविल कार्यकारी अभियंता आहे  त्यांनी कारगिल येथे दहा वर्ष  आव्हानात्मक परिस्थितीत कार्य केले आहे सोबतच दहा हजार फूट उंच पहाडीवर  वळण रस्ते  बोगदे  आणि  रस्तेचे संलग्निकरणांचे करण्याचे  कार्य करून ते बॉर्डर रोड ऑर्गनिझेशनने  पूर्णत्वास नेले आहे. मागील वर्षी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन च्या वतीने बोगदा आंतरिक मार्ग ची निर्मिती केली.

 covid-19 च्या काळामध्ये महामारी सुरू असताना चायना बॉर्डर च्या रोडचे  काम ब्रो ने केले. ही बॉर्डर भारत चीन लागून लद्दाख सेंटरमध्ये आहे. सध्या लद्दाख जम्मू-काश्मीर उत्तरांखंड हिमालय प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या प्रांतात ब्रोचे  नियोजित मार्गाचे काम सुरू आहे.  तसेच 61 रस्त्याचे सुनियोजित कामाचे चायना बॉर्डरवरील हे कार्य डिसेंबर 2022 मध्ये ब्रो पूर्ण करणार आहे ,त्यासाठी सर्व सोयी सुविधा यंत्रसामग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा कठीण कामात महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी महिलांना पुढाकार देण्याचे कार्य बीआरओ करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे . आधुनिक परिस्थितीत महिला सशक्तीकरणसाठी ब्रो ने पाऊले उचलली असून महिला अधिकारी  चांगल्या तऱ्हेने हे आव्हानात्मक कार्य पूर्ण करू शकतात,  म्हणून महिलांना जबाबदारी देण्यात आल्याचा असा विश्वास व्यक्त केला असून ब्रो ने  ट्विटरवर ही माहिती दिली आहे.

टॅग्स :Governmentसरकार