शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

श्वान दंशापोटी एका दिवसात दहा जणांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST

शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या, पिसाळलेल्या श्वानांची संख्या प्रचंड वाढली आहे. या श्वानांमुळे पहाटे फिरायला जाणारे कमालीचे दहशतीत आहेत. शहरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांसह मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देबेवारस श्वानांचा मुद्दा ऐरणीवर । नगर पालिका प्रशासन सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मागील वर्षभरापासून भटक्या श्वानांनी नागरिकांना वेठीस धरल्याचे चित्र आहे. शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल जणांना श्वानदंश झाला. मात्र, नगरपालिकेसह संबंधित यंत्रणेकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने ही समस्या गंभीर रूप धारण करीत आहे.शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या, पिसाळलेल्या श्वानांची संख्या प्रचंड वाढली आहे. या श्वानांमुळे पहाटे फिरायला जाणारे कमालीचे दहशतीत आहेत. शहरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.विद्यार्थ्यांसह मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागत आहे. मोकाट श्वान, वराह यांचा जन्मदर नियंत्रित करण्याबाबतची बाब स्वच्छता करात अंतर्भूत आहे. मात्र, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडून याला पद्धतशीर बगल दिली जात आहे. मोकाट श्वानांचा जन्मदर नियंत्रित करण्याविषयी पीपल फॉर अ‍ॅनिमल्सचे सचिव आशीष गोस्वामी यांनी मोकाट श्वानांसह स्वत:ला पिंजऱ्यात कोंडून घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन केले. याला महिना लोटला मात्र जिल्हा प्रशासनाकडून कारवाई शून्य आहे. कारवाईची फाईल जिल्हाधिकारी कार्यालयात धूळखात पडून आहे. याचाच परिणाम मोकाट श्वानांचा शहरात हैदोस कायम आहे. शुक्रवारी शहरात तब्बल जणांना मोकाट श्वानांनी चावा घेतला.जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना लसीकरणही करण्यात आली. मात्र, नगरपालिका, जिल्हा प्रशासन सुस्त आहे. स्वच्छतेत श्वानांच्या जन्मदराची बाब अंतर्भूत असताना नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात मिळविलेला क्रमांक बोगसगिरी असल्याच्या संतप्त प्रतिक्रियाही वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहेत. पालिकेने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.मोकाट श्वानांचा मानवी वस्तीतील वावर घातकमोकाट श्वानांना सदैव निरनिराळ्या आजारांची लागण होते. त्यामुळे मानवावरही याचा परिणाम होतो. अनेकांना कोरड्या खोकल्याचा आजार बळावतो. याशिवाय संसर्गजन्य व अन्य जीवघेणे आजार उद्भवतात. मात्र, यंत्रणा या प्रश्नी गंभीर नाही. बेवारस श्वानांची बाब स्वच्छतेत अंतर्भूत असताना दुर्लक्ष करण्यात येते. नागरिकांकडून करवसुली मात्र केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.वराहांच्या वाढत्या जन्मदराकडेही दुर्लक्षशहरातच नव्हे तर लगतच्या ग्रामीण भागात वराहांचीही मागील काही वर्षांत प्रचंड संख्या वाढली आहे. यामुळे घाणीच्या साम्राज्यात भर पडत आहे. वराह अनेकवार थेट घरात शिरतात. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. मात्र, वराहांचादेखील संबंधितांकडून बंदोबस्त को जात नाही.

टॅग्स :dogकुत्रा