शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

श्वान दंशापोटी एका दिवसात दहा जणांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST

शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या, पिसाळलेल्या श्वानांची संख्या प्रचंड वाढली आहे. या श्वानांमुळे पहाटे फिरायला जाणारे कमालीचे दहशतीत आहेत. शहरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांसह मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देबेवारस श्वानांचा मुद्दा ऐरणीवर । नगर पालिका प्रशासन सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मागील वर्षभरापासून भटक्या श्वानांनी नागरिकांना वेठीस धरल्याचे चित्र आहे. शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल जणांना श्वानदंश झाला. मात्र, नगरपालिकेसह संबंधित यंत्रणेकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने ही समस्या गंभीर रूप धारण करीत आहे.शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या, पिसाळलेल्या श्वानांची संख्या प्रचंड वाढली आहे. या श्वानांमुळे पहाटे फिरायला जाणारे कमालीचे दहशतीत आहेत. शहरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.विद्यार्थ्यांसह मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागत आहे. मोकाट श्वान, वराह यांचा जन्मदर नियंत्रित करण्याबाबतची बाब स्वच्छता करात अंतर्भूत आहे. मात्र, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडून याला पद्धतशीर बगल दिली जात आहे. मोकाट श्वानांचा जन्मदर नियंत्रित करण्याविषयी पीपल फॉर अ‍ॅनिमल्सचे सचिव आशीष गोस्वामी यांनी मोकाट श्वानांसह स्वत:ला पिंजऱ्यात कोंडून घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन केले. याला महिना लोटला मात्र जिल्हा प्रशासनाकडून कारवाई शून्य आहे. कारवाईची फाईल जिल्हाधिकारी कार्यालयात धूळखात पडून आहे. याचाच परिणाम मोकाट श्वानांचा शहरात हैदोस कायम आहे. शुक्रवारी शहरात तब्बल जणांना मोकाट श्वानांनी चावा घेतला.जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना लसीकरणही करण्यात आली. मात्र, नगरपालिका, जिल्हा प्रशासन सुस्त आहे. स्वच्छतेत श्वानांच्या जन्मदराची बाब अंतर्भूत असताना नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात मिळविलेला क्रमांक बोगसगिरी असल्याच्या संतप्त प्रतिक्रियाही वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहेत. पालिकेने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.मोकाट श्वानांचा मानवी वस्तीतील वावर घातकमोकाट श्वानांना सदैव निरनिराळ्या आजारांची लागण होते. त्यामुळे मानवावरही याचा परिणाम होतो. अनेकांना कोरड्या खोकल्याचा आजार बळावतो. याशिवाय संसर्गजन्य व अन्य जीवघेणे आजार उद्भवतात. मात्र, यंत्रणा या प्रश्नी गंभीर नाही. बेवारस श्वानांची बाब स्वच्छतेत अंतर्भूत असताना दुर्लक्ष करण्यात येते. नागरिकांकडून करवसुली मात्र केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.वराहांच्या वाढत्या जन्मदराकडेही दुर्लक्षशहरातच नव्हे तर लगतच्या ग्रामीण भागात वराहांचीही मागील काही वर्षांत प्रचंड संख्या वाढली आहे. यामुळे घाणीच्या साम्राज्यात भर पडत आहे. वराह अनेकवार थेट घरात शिरतात. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. मात्र, वराहांचादेखील संबंधितांकडून बंदोबस्त को जात नाही.

टॅग्स :dogकुत्रा