शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अधिकाऱ्यांच्या रिक्त पदामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ

By admin | Updated: July 1, 2016 02:09 IST

शहिदांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या तालुक्याच्या विकासाला शासकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांसह मुख्यालयाला दांडी मारणाऱ्या ...

भाजयुमोचे तहसीलदारांना निवेदन : मुख्यालयाला दांडी देणाऱ्यांवर कारवाईची मागणीआष्टी (शहीद) : शहिदांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या तालुक्याच्या विकासाला शासकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांसह मुख्यालयाला दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे खीळ बसली आहे. या संदर्भात कारवाई करावी या मागणीचे निवदेन भारतीय युवा मोर्चाच्यावतीने तहसीलदार सीमा गजभिये यांना देण्यात आले आहे. आष्टीला तालुक्याचा दर्जा प्राप्त असून शासकीय कार्यालयामध्ये बऱ्याच जागा रिक्त आहेत. काही कार्यालयामध्ये मुख्य पदाची निर्मितीच केलेली नाही हे वास्तव्य आहे. येथे तालुका पशुवैद्यकीय दवाखाना असला तरी प्रारंभीपासूनच पशुधन विकास अधिकारी (वि.) पं.स. आष्टी पदाची निर्मितीच नाही. यामुळे तालुक्यातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथे तालुका कृषी कार्यालय असले तरी गत कित्येक दिवसांपासून तालुका कृषी अधिकारी पद हे प्रभारावरच काम करीत आहे. याशिवाय दोन कृषी पर्यवेक्षक, ५० टक्के कृषी सहायक तसेच आत्मा अंतर्गत दोन पदाची नियुक्ती करणे अत्यावश्यक आहे. आष्टी येथे ग्रामीण रुग्णालय नसल्याने सन २००२ साली युवक वर्गाने ३४ दिवस आंदोलन केले होते. याची दखल घेवून शासनाने येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले. याच्या बांधकामात विरोधकांनी अनेक प्रकारचे अडथळे निर्माण केले; परंतु माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रयत्नातून अखेर रुग्णालय बांधकाम एक वर्षापुर्वी पूर्ण झाले. बांधकाम पूर्ण होवून कर्मचारी अधिकारी नसल्याने सध्या या इमारतीतून प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुरू आहे.