शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

मास्क वापरा अन् कोरोना विषाणू पळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 05:00 IST

सध्या अनेकजण बेफिकीर झाल्याचे दिसते आहे. मास्कचा वापरच केला जात नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय मास्क घातला तरी तो हनुवटीवरच असलेला दिसून येतो. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी व्यवस्थित मास्क घालणे गरजेचे आहे. महसूल विभाग, पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर मास्कचा वापर केला जातो. ते अयोग्य आहे. आपला जीव वाचविण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हे उपाय वापरले पाहिजेत. मास्कच्या वापरासह वारंवार हात धुणे हाही प्रभावी उपाय आहे.

ठळक मुद्देसंसर्ग टाळण्यासाठी वापर अनिवार्यच; मात्र वर्धेकर अद्याप गंभीर नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळत असल्याची चिन्हे असली तरी नागरिकांनी लगेच निर्धास्त होणे धोक्याचे आहे. कारण कोरोना संसर्गाचे संकट अजून कायम आहे. काळजी घेतली नाही तर ते पुन्हा वाढण्याचाही धोका आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर अनिवार्यच आहे. मास्क वापरा अन् कोरोना पळवा अशी मोहीमच आता वर्धेकरांनी सुरू करण्याची आवश्यकता आहे. मे मध्ये कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाला. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात उच्चांकी रुग्णसंख्या होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून वर्धेकरांनी थोडा दिलासा मिळतो आहे. जिल्हा प्रशासनाने मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. त्यातच पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही सुरू ठेवली आहे. त्यामुळे नागरिक मास्कचा वापर करीत आहेत. त्याचाही चांगला परिणाम दिसून येत आहे.सध्या अनेकजण बेफिकीर झाल्याचे दिसते आहे. मास्कचा वापरच केला जात नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय मास्क घातला तरी तो हनुवटीवरच असलेला दिसून येतो. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी व्यवस्थित मास्क घालणे गरजेचे आहे. महसूल विभाग, पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर मास्कचा वापर केला जातो. ते अयोग्य आहे. आपला जीव वाचविण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हे उपाय वापरले पाहिजेत. मास्कच्या वापरासह वारंवार हात धुणे हाही प्रभावी उपाय आहे. बाहेरून आल्यानंतर, खरेदी केल्यानंतर, जेवणापूर्वी साबणाने हात धुणे अत्यावश्यक आहे.वारंवार हात धुण्यानेही कोरोनाचा धोका टाळता येतो. रुग्णसंख्या कमी झाल्याचा दिलासा असला तरी अद्याप धोका आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वत:सह कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. मास्क न वापरणारे इतरांसाठीही धोकादायक ठरू शकतात. घरातील मुले, वृद्ध यांनाही मास्क न वापरणाऱ्यांकडून संसर्गाचा धोका अधिक आहे. निष्काळजीपणामुळे संसर्ग झाल्यास त्याचे दुरगामी दुष्पपरिणाम बाधित व्यक्तीला भोगावे लागणार आहेत.कोरोना संसर्गाचे दुरगामी परिणाममास्क न वापरणे, वारंवार हात न धुणे यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यास रुग्णाला यातना सहन कराव्या लागतात. त्यातून बरे झाल्यानंतर त्या संसर्गाचे शरीरावर तसेच अवयवांवर दुरगामी दुष्परिणाम होतात. त्यामुळे मास्क वापरल्यास कोरोना विषाणू संक्रमणाचे संकट आपल्यापासून दूर ठेवण्यास मदत होणार, आहे हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. मात्र, नागरिक गंभीर नसून त्यांना विसर पडल्याचे दिसून येते.बोलताना मास्क अत्यावश्यकअनेकजण केवळ गर्दीच्या ठिकाणीच मास्क वापरताना दिसतात. मात्र वैद्यकीय तज्ञांच्या मते घरातही मास्क वापरणे आवश्यक आहे. विशेषत: बोलताना तर मास्क अत्यावश्यक आहे, असेही मत त्यांचे आहे. जिल्ह्यात आता बऱ्यापैकी आस्थापना सुरू झाल्या आहेत. त्यातच सण तोंडावर असल्याने बाजारात गर्दीही होत आहे. त्त्यामुळे त्या काळात कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आताच व्यक्त केली जात आहे. त्त्यामुळे मोठ्या प्रमाणातील संसर्ग रोखण्यासाठी सदैव मास्क वापरणे हाच केवळ एक उपाय नागरिकांसमोर शिल्लक आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या