शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर वर्धा धरणाच्या भिंतीला तडे

By admin | Updated: November 6, 2014 23:00 IST

वर्धा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात गौणखनिज टेकड्यांना ब्लास्टिंग करून उद्ध्वस्त करण्याचा घाट चोरट्यांनी घातल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले़

अमोल सोटे - आष्टी (श़)वर्धा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात गौणखनिज टेकड्यांना ब्लास्टिंग करून उद्ध्वस्त करण्याचा घाट चोरट्यांनी घातल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले़ यामुळे अप्पर वर्धा धरण असुरक्षित झाले असून भिंतीला काही ठिकाणी तडे गेल्याचे दिसले़ भविष्यात डागडुजी व दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्यास चांगलाच धोका होण्याची शक्यता आहे़ यास महसूल व वनविभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करताहेत़वर्धा जिल्ह्याचे शेवटचे टोक आष्टी तालुका आहे. आष्टीच्या अवघ्या १० किमी अंतरापासून अप्पर वर्धा धरणाचे शेवटचे टोक सुरू होते. शासनाच्या नियमानुसार किमान २५ किमी परिसरात ब्लास्टिंग व अवैध उत्खनन करण्यावर बंदी आहे. सदर बंदी झुगारून माफियांनी प्रशासनाला हाताशी धरून खुलेआम मुरूम, गिट्टी उत्खनन व वाहतूक सुरू केली आहे. जंगल परिसरातील वन्यप्राणी ब्लास्टिंगच्या हादऱ्याने धास्तावले आहेत़ मौजा येनाडा, पिलापूर गावाच्या १ किमी अंतरावर गिट्टी व मुरूमसाठी रस्त्यालगत एक टेकडी चांगलीच पोखरून काढली आहे़ पाणी साचल्याने वन्यप्राणी व बाजूला शेती असणारे शेतकरी, गुरांना ये-जा करताना धोका निर्माण झाला आहे. त्याच्या ३ किमी पूढे जोलवाडी गावाजवळ मुरूमाच्या टेकड्याही खोदण्यात आल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले़अप्पर वर्धा धरणाचे प्रतिबंधीत क्षेत्र असुरक्षित आहे. उत्खननासोबतच गावठी दारू तयार करण्यासाठी काठावर हातभट्ट्या लावण्यात आल्या आहेत़ धरण विभागाच्या बांधलेल्या इमारती क्षतिग्रस्त झाल्या असून कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचे भेटीप्रसंगी सांगण्यात आले़ यामुळे सदर इमारती अनैतिक व्यवसायांचे केंद्र बनल्याचे तेथील साहित्यावरून दिसून आले़ याठिकाणी दारूच्या पार्ट्या दिवसाढवळ्या होतात़ धरणाजवळील सुरक्षेची भिंतीला डागडुजी न झाल्याने ब्लास्टिंगच्या हादऱ्याने पूर्णत: तडा गेल्या आहेत़ धरणात १०० टक्के जलसाठा आहे. अशावेळी तात्काळ दुरूस्ती करणे आवश्यक आहे. धरणाचा मार्ग दारूविक्रेत्यांनी ठिकठिकाणी फोडून टाकला आहे. अधिकारी अर्थपूर्ण व्यवहारात व्यस्त आहेत़ सध्या रबी हंगाम सुरू झाला आहे़ शेतकरी पाण्यासाठी संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवत असून त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचेही दिसून आले़