शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

जिल्हाधिकारी कार्यालयावर असंघटित कामगारांचा मोर्चा

By admin | Updated: June 25, 2014 00:35 IST

अंगणवाडी कर्मचारी युनियन, आशा वर्कर युनियन, शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन, ग्रामरोजगार सेवक, डाटा एन्ट्री आॅपरेटर, तांत्रिक अधिकारी युनियन, वीज कंपनी कंत्राटी कामगार युनियनने विविध

वर्धा : अंगणवाडी कर्मचारी युनियन, आशा वर्कर युनियन, शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन, ग्रामरोजगार सेवक, डाटा एन्ट्री आॅपरेटर, तांत्रिक अधिकारी युनियन, वीज कंपनी कंत्राटी कामगार युनियनने विविध मागण्यांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चात असंख्य असंघटित कामगार सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.या मोर्चात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संपकाळातील एक महिन्याचे वेतन देण्यात यावे. अंगणवाडी सेविकांना दरमहा दहा हजार रुपये, मदतनिसांना सात हजार पाचशे रुपये व मिनी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविकेचे वेतन देण्यात यावे, पेंशन योजनेचा लाभ मिळावा.आशा वर्करला केंद्र सरकारने १ जानेवारीपासूनचे मानधन व इतर वाढीव भत्ते द्यावे, राज्य सरकारने दरमहा तीन हजार रुपये मानधन द्यावे. शालेय पोषण आहार योजनेत कार्यरत सर्व महिलांना कायम करावे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा व वेतन द्यावे, बचतगटांचा हस्तक्षेप बंद करावा. दरमहा वेतन द्यावे वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अंगणवाडी कर्मचारी व शालेय पोषण आहार देणाऱ्या महिलांचे तीन महिन्यांपासून वेतन थकीत आहे. कष्टकरी महिलांची रक्कम बँकेने तातडीने द्यावी.ग्रामरोजगार सेवकांना दरमहा मानधन द्यावे, डाटा एन्ट्री आॅपरेटरचे तीन महिन्यापासून वेतन थकीत आहे. थकीत वेतन तातडीने द्यावे. संग्राम एजंसीचे काम ग्रामीण विकास मंत्रालयाने पंचायत विभागाकडे द्यावे, किमान वेतनाप्रमाणे दरमहा वेतन द्यावे, तांत्रिक अधिकाऱ्यांना पंचायत विभागाने सेवेत कायम करावे. कंत्राटीकरण बंद करावे. सामाजिक न्याय द्यावा, वीज कंपनीत कार्यरत कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करावे आदी मागण्या करण्यात आल्या. सोबतच महाराष्ट्र सरकारने असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना, महिलांना न्याय द्यावा. रेल्वेची तिकीट दरवाढ रद्द करावी. वाढलेली महागाई कमी करावी. राज्यकर्ते उद्योगपती व कंपन्यांना सवलती देतात. सर्वसामान्य जनतेला न्याय देत नाही, असा आरोप कामगार नेते राजू गोडे यांनी केला. इंदिरा मार्केट वर्धा येथून काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व हसीना गोरडे यांनी केले. यावेळी किशोर चिमूरकर, आशा गळहाट, विजय पावडे, उईके, वंदना कोळणकर, माला भगत, मंजू खंडारे, शोभा तिवारी आदींची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)