शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 11:04 IST

वर्धा जिल्ह्यात सध्या सोयाबीन पिकाची सहा इंच वाढ झालेली पाने काठाने पिवळी पडत आहेत. शिवाय त्याची पाने गुंडाळत असल्याने हा कुठला रोग आहे याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांत भीतीपान पडताय पिवळी, उत्पादनात घट येण्याची वर्तविली जातेय शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पूर्वीच पावसाच्या दिरंगामुळे परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पेरणी उशीराने केली. वेळोवेळी झालेल्या पावसामुळे पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. परंतु, वर्धा जिल्ह्यात सध्या याच सोयाबीन पिकाची सहा इंच वाढ झालेली पाने काठाने पिवळी पडत आहेत. शिवाय त्याची पाने गुंडाळत असल्याने हा कुठला रोग आहे याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.जून महिना कोरडा गेल्यानंतर झालेल्या पावसादरम्यान या भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची लागवड केली. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे पिकांची वाढही बऱ्यापैकी झाली. परंतु, अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव सायाबीन पिकावर दिसून येत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरातील सोयाबीन पिकावर उंटअळीचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात दिसून येत होता. तर त्यानंतर झालेल्या संततधार पावसादरम्यान या अळीचा प्रादुर्भाव कमी झाला. परंतु, सध्या सोयाबीन पिकाची सहा इंच वाढ झालेली पान काठाने पिवळी पडत आहेत. शिवाय पानेही गुंडाळल्या जात असल्याने याचा परिणाम उत्पादनावर होईल, असा अंदाज शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे. ही स्थिती तळेगाव (टा.), सोनेगाव, ऐकुर्ली शेत शिवारातील सोयाबीन पिकाची असून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.

तळेगाव (टा.) शिवारात सर्वाधिक प्रादुर्भावतळेगाव (टा.) येथील प्रकाश देवढे यांच्या शेतातील सोयाबीनच्या पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. विशेष म्हणजे या परिसरातील तळेगाव (टा.) शिवारातील सोयाबीन पिकांवर सदर अज्ञात रोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकरी देवढे यांनी यंदा तीन एकर कपाशी, एक एकरात भाजीपाला व एक एकरात सोयाबीनची लागवड केली. मात्र, अचानक आलेल्या या अज्ञात रोगामुळे यांच्या अडचणीत भर पडली आहे.

टॅग्स :agricultureशेती