शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

विश्वविद्यालय विश्वस्तरीय ज्ञानाचे केंद्र बनणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:16 IST

ज्ञान व विज्ञानाच्या क्षेत्रात विश्वविद्यालयाने एक नवी उंची गाठली असून हे विश्वविद्यालय आगामी वर्षांत विश्वस्तरावर ज्ञानाचे महत्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू प्रो. गिरीश्वर मिश्र यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देगिरीश्वर मिश्र : कार्यकाळ संपल्याने कुलगुरुंना निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ज्ञान व विज्ञानाच्या क्षेत्रात विश्वविद्यालयाने एक नवी उंची गाठली असून हे विश्वविद्यालय आगामी वर्षांत विश्वस्तरावर ज्ञानाचे महत्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू प्रो. गिरीश्वर मिश्र यांनी व्यक्त केला.कुलगुरु म्हणून कार्यकाळ संपल्याने प्रो. गिरीश्वर मिश्र यांना विश्वविद्यालयाकडून शनिवारी निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनियुक्त कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल होते. गालिब सभागृहात आयोजित समारंभात मंचावर कार्यकारी कुलसचिव प्रो. के. के. सिंह, वित्त अधिकारी कादर नवाज खान, मानविकी व सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. कृपा शंकर चौबे उपस्थित होते. विद्यमान कुलगुरु प्रो. शुक्ल यांनी प्रो. मिश्र यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन हिंदी व तुलनात्मक साहित्य विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ. रामानुज अस्थाना यांनी केले तर आभार वित्त अधिकारी कादर नवाज खान यांनी मानले.प्रो. गिरीश्वर मिश्र यांनी आपल्या भाषणात विश्वविद्यालयातील अध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले. आपल्या ५० वर्षांच्या अकादमिक प्रवासात आलेल्या अनुभवातून मी विश्वविद्यालयाचे सामाजिक, अकादमिक व भौतिक चित्र बदलण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या उपलब्धिवर ते म्हणाले की वर्धा विश्वविद्यालयाचे विद्यार्थी आता पूर्ण भारतभर रोजगार मिळवत आहेत. अनेक विश्वविद्यालयात व संस्थामध्ये येथील विद्यार्थी नोकरी करतात, हे आमच्या सर्वांच्या मेहनतीचे फळ आहे असेही ते म्हणाले.अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल म्हणाले की प्रो. गिरीश्वर मिश्र यांनी प्रेरणादायी नेतृत्वातून विश्वविद्यालय अकादमिक व प्रशासनिक दृष्टिने संपन्न झाले आहे. उत्तराधिकारीच्या रूपात त्यांच्या पदचिन्हांवर चालून विद्यापीठाला नवीन ओळख देण्याचा प्रयत्न करणार. या समारंभात विश्वविद्यालयातील विविध विभागांकडून प्रो. मिश्र यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. अमित राय, गैर शैक्षणिक कर्मचारी संघाकडून सहायक कुलसचिव राजेश अरोड़ा, कर्मचारी पत संस्थेकडून डॉ. अनिल कुमार दुबे, फॅकल्टी अ‍ॅण्ड आॅफिसर्स क्लब कडून डॉ. सुप्रिया पाठक, जनसंचार विभागाचे प्रो. कृपा शंकर चौबे, साहित्य विद्यापीठाचे प्रो. अवधेश कुमार, शिक्षण विद्यापीठाचे ऋषभ मिश्र यांनी स्वागत केले. 

टॅग्स :universityविद्यापीठ