शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

विश्वविद्यालय विश्वस्तरीय ज्ञानाचे केंद्र बनणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:16 IST

ज्ञान व विज्ञानाच्या क्षेत्रात विश्वविद्यालयाने एक नवी उंची गाठली असून हे विश्वविद्यालय आगामी वर्षांत विश्वस्तरावर ज्ञानाचे महत्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू प्रो. गिरीश्वर मिश्र यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देगिरीश्वर मिश्र : कार्यकाळ संपल्याने कुलगुरुंना निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ज्ञान व विज्ञानाच्या क्षेत्रात विश्वविद्यालयाने एक नवी उंची गाठली असून हे विश्वविद्यालय आगामी वर्षांत विश्वस्तरावर ज्ञानाचे महत्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू प्रो. गिरीश्वर मिश्र यांनी व्यक्त केला.कुलगुरु म्हणून कार्यकाळ संपल्याने प्रो. गिरीश्वर मिश्र यांना विश्वविद्यालयाकडून शनिवारी निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनियुक्त कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल होते. गालिब सभागृहात आयोजित समारंभात मंचावर कार्यकारी कुलसचिव प्रो. के. के. सिंह, वित्त अधिकारी कादर नवाज खान, मानविकी व सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. कृपा शंकर चौबे उपस्थित होते. विद्यमान कुलगुरु प्रो. शुक्ल यांनी प्रो. मिश्र यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन हिंदी व तुलनात्मक साहित्य विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ. रामानुज अस्थाना यांनी केले तर आभार वित्त अधिकारी कादर नवाज खान यांनी मानले.प्रो. गिरीश्वर मिश्र यांनी आपल्या भाषणात विश्वविद्यालयातील अध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले. आपल्या ५० वर्षांच्या अकादमिक प्रवासात आलेल्या अनुभवातून मी विश्वविद्यालयाचे सामाजिक, अकादमिक व भौतिक चित्र बदलण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या उपलब्धिवर ते म्हणाले की वर्धा विश्वविद्यालयाचे विद्यार्थी आता पूर्ण भारतभर रोजगार मिळवत आहेत. अनेक विश्वविद्यालयात व संस्थामध्ये येथील विद्यार्थी नोकरी करतात, हे आमच्या सर्वांच्या मेहनतीचे फळ आहे असेही ते म्हणाले.अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल म्हणाले की प्रो. गिरीश्वर मिश्र यांनी प्रेरणादायी नेतृत्वातून विश्वविद्यालय अकादमिक व प्रशासनिक दृष्टिने संपन्न झाले आहे. उत्तराधिकारीच्या रूपात त्यांच्या पदचिन्हांवर चालून विद्यापीठाला नवीन ओळख देण्याचा प्रयत्न करणार. या समारंभात विश्वविद्यालयातील विविध विभागांकडून प्रो. मिश्र यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. अमित राय, गैर शैक्षणिक कर्मचारी संघाकडून सहायक कुलसचिव राजेश अरोड़ा, कर्मचारी पत संस्थेकडून डॉ. अनिल कुमार दुबे, फॅकल्टी अ‍ॅण्ड आॅफिसर्स क्लब कडून डॉ. सुप्रिया पाठक, जनसंचार विभागाचे प्रो. कृपा शंकर चौबे, साहित्य विद्यापीठाचे प्रो. अवधेश कुमार, शिक्षण विद्यापीठाचे ऋषभ मिश्र यांनी स्वागत केले. 

टॅग्स :universityविद्यापीठ