शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पारपत्र सेवा केंद्राची वर्धेला अनोखी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 11:27 IST

माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचे सदस्य म्हणून टपाल विभाग आणि विदेश मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने परदेशवारीसाठी आवश्यक पारपत्र सेवा केंद्राची अनोखी भेट आज वर्धेकरांना देता आली, याचा मनस्वी आनंद आहे.

ठळक मुद्देविदर्भातील पहिले केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचे सदस्य म्हणून टपाल विभाग आणि विदेश मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने परदेशवारीसाठी आवश्यक पारपत्र सेवा केंद्राची अनोखी भेट आज वर्धेकरांना देता आली, याचा मनस्वी आनंद आहे. या केंद्राचा लाभ जिल्ह्यातील परदेशी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसोबतच हज यात्रेस जाणाऱ्या मुस्लीम बांधवांना होणार आहे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.मुख्य डाकघर येथे आयोजित पोस्ट आॅफिस पारपत्र सेवा केंद्राचे उद्घाटन बुधवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला हिंदी विद्यापीठाचे प्रकुलगुरू आनंदवर्धन शर्मा, नागपूर विभागाचे महापोस्टमास्टर मरिअम्मा थॉमस, क्षेत्रीय पारपत्र अधिकारी सी. एल. गौतम, नगराध्यक्ष अतुल तराळे उपस्थित होते.खा. तडस पुढे म्हणाले की, ऐतिहासिक दृष्ट्या सबळ असताना वर्धा जिल्हा विकासात मागे राहतो; पण यावेळी पारपत्र सेवा केंद्र मिळविण्यात वर्धा जिल्ह्याने बाजी मारली आहे. यामुळे पारपत्र मिळविण्यासाठी नागपूरला ये-जा करण्याचा लोकांचा त्रास कमी होईल. याचबरोबर आता प्रत्येक गावात ग्रा.पं. कार्यालयात टपाल कार्यालय सुरू करण्यात येईल.थॉमस यांनी टपाल कार्यालय हे केवळ पत्र पोहोचविण्याचे कार्यालय राहिले नसून ते आता जनसेवा केंद्र झाले आहे. लवकरच अटल पेन्शन योजना, आधार अपडेशन आणि इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर योजना पोस्ट आॅफीसमध्ये सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

देशात केवळ ८० पारपत्र सेवा केंद्र सुरूदेशात आतापर्यंत केवळ ८० पारपत्र सेवा केंद्र सुरू होते. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत होता. २४ जून २०१७ रोजी विदेशी मंत्र्यांनी टपाल कार्यालयाला जोडून पारपत्र सेवा केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून आज देशात टपाल कार्यालयाच्या समन्वयाने २५१ केंद्र सुरू होत आहेत. यात राज्यातील वर्धा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. अर्जदाराने पारपत्र काढण्यासाठी आॅनलाईन अर्ज पासपोर्ट इंडियाच्या संकेतस्थळावर सादर करावा. यानंतर अर्जदाराला त्याच्या मोबाईलवर अपॉइन्टमेंटसाठी वेळ कळविला जाईल. सादर केलेली कागदपत्रे व पोलीस चारित्र्य पडताळणीसह फाईल नागपूर कार्यालयाला पाठविली जाईल. नागपूर कार्यालयातून पारपत्र बनून पोस्ट आॅफिसला मिळेल व नंतर ते अर्जदाराला पोस्टाने पाठविले जाईल. यासाठी पारपत्र विभागाच्या चार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.असे क्षेत्रीय पारपत्र अधिकारी गौतम यांनी सांगितले.

टॅग्स :passportपासपोर्ट