शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात अघोषित संचारबंदी

By admin | Updated: January 24, 2016 02:06 IST

डिसेंबर महिन्याच्या शेवटी काहीसा गारठा सोडला तर या वर्षी थंडीचा विशेष कहर जाणवला नाही.

थंडीची लाट : शेतीची कामे प्रभावित, सकाळच्या शाळांना विद्यार्थ्यांची दांडी वर्धा : डिसेंबर महिन्याच्या शेवटी काहीसा गारठा सोडला तर या वर्षी थंडीचा विशेष कहर जाणवला नाही. संक्रांत सरल्याने अता थंडी कमी होईल असा अंदाज असतानाच जानेवारी महिन्याअखेर २२ जानेवारीपासून पारा घसरायला सुरुवात झाली. त्यामुळे दोन दिवसांपासून दिवसभर गारठा कायम आहे. सायंकाळी ६ वाजेपासून शहरासह जिल्हा गारठायला सुरुवात होत. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते अघोषित संचारबंदीसारखे सायंकाळनंतर निर्मनुष्य होत आहेत. वाढत्या गारठ्यामुळे सामान्य माणूस आपली बाजाराची कामे लवकर आटोपून अंधार पडण्याआधीच घराचा रस्ता धरत आहे. रात्री ९ वाजेपर्यंत उघडी राहणारी उपहारगृह, पानठेले, चहाटपरी सायंकाळपासूनच ग्राहकाअभावी ओस पडू लागले असून गारठयाचा व्यापारावरही परिणाम होत आहे. दोन दिवसापासून जिल्ह्याचे रात्रीचे तापमान ८ ते ९ अंशाच्या आसपास आहे. हीच स्थिती राहिल्यास पारा आणखी घसरण्याची शक्यताहे व्यक्त होत आहे. दिवसभराची रोजमजुरी करून सायंकाळी घरी परतल्यानंतर ग्रामस्थ गावातील पारावर शेकोटी लावून गुलाबी थंडीचा आनंद घेत आहे. रात्री होणारी शेतातील जागली गरम घोंगडे, हातात काठी, डोक्याला मुंडासे व मचाणाजवळ शेकोटी अशा स्थितीत होत आहे. शहरी भागातील नागरिक मात्र दिवसभराची कामे आटोपून सायंकाळनंतर गरम स्वेटर्स, शाल, मफलर, ऊनी टोपी घालून घरात राहाणे पसंद करीत आहे. वांग्याचे खमंग भरीत, ज्वारीच्या गरम भाकरी, दाळ-तांदळाची खिचडी सोबतच वांग्याची मसालेदार भाजी आणि पानगे असा बेत करून थंडीचा आनंद घेतला जात आहे. असे वातावरण रबी पिकांसाठी पोषक असल्याने बळीराजा सुखावला आहे. थंडीची लाट असून काही दिवस कायम राहणार असा अंदाज वर्तविला जात आहे.(शहर प्रतिनिधी) रात्रीच्या कार्यक्रमांमध्ये शेकोट्या लावण्याची क्रेझतीन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे सर्वत्र हुडहुडी भरू लागली आहे. शेकोट्या पेटू लागल्या. गारठ्यामुळे रात्रीच्या लग्नाचे, प्रीतिभोजनाचे कार्यक्रम यावर थंडीचा परिणाम होत आहे. रात्री ८ पर्यंत सर्वत्र सामसूम होऊन बाजारपेठही लवकरच बंद होत आहे. दुपारी ४ वाजतापासूनच गारठ्याला सुरुवात होते. रात्री घराबाहेर निघण्याची इच्छा होत नाही. गावखेड्यात शेकोट्या पेटू लागल्या तर रात्रीच्या मंगलकार्यातही भोजनाच्या वेळी शेकोट्या पेटविल्या जात आहे. वातावरणातील गारठा प्रकृती स्वास्थावरही चांगला असला तरी लहान मुलांच्या प्रकृतीवर याचा परिणाम होत आहे. सेलू तालुक्यात सिंचनाचे प्रमाण इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे रात्रीचा गारवा अंगाला जास्त झोंबतो. त्यामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णातही वाढ झाली आहे.गावे गारठली, जागोजागी पेटल्या शेकोट्यासर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण जीवन गारठले असून दिवसासुद्धा जागोजागी शेकोट्या नजरेस पडत आहे. सायंकाळी ७ नंतर अघोषित संचारबंदीसदृष्य स्थिती पहावयास मिळत आहे. थंडी ही रबी पिकांसाठी पोषक असली तरी सकाळची शेतीची कामे प्रभावित झाली आहे. पवनार, सेलू, हिंगणघाट, पुलगाव, खरांगणा आदी गावे ही नद्यांलगत असल्याने या भागात थंडीचा जोर अधिक आहे. संपूर्ण दिवसभर झोंबणारी थंडी, बोचरे वारे यामुळे गारठा आणखी जाणवत आहे. सायंकाळी ७ वाजले की गावांतील रस्त्याने कुणीही फिरकताना दिसत नाही. दारे-खिडक्या बंद करून कोंडून घेण्याची वेळ आली आल्याची भावना म्हातारी मंडळी व्यक्त करीत आहे. कुडकुडणाऱ्या थंडीत शिक्षक वेळेवर येत असले तरी विद्यार्थी शाळेत येण्याचा कंटाळा करीत आहेतगहू, चना या पिकांसाठी थंडी आवश्यक असली तरी सकाळी ओलित करताना शेतकऱ्यांचे व मजुरांचे हात कापू लागले आहे. त्यामुळे शेतातही पहाटे पहाटे शेकोट्या पेटायला सुरूवात झाली आहे.