शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

उंबरकर कुटुंबीयांना आला ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय

By admin | Updated: March 2, 2016 02:29 IST

शेतातून घरी परत येत असताना अचानक आलेल्या पावसापासून बचावाकरिता येथील अंबरकर कुटुंबातील तीन सदस्य शेतातील गाईचा आश्रय घेऊन होते.

तीन शेतकरी थोडक्यात बचावले : १० फूट अंतरावर कोसळली वीज साहुर : शेतातून घरी परत येत असताना अचानक आलेल्या पावसापासून बचावाकरिता येथील अंबरकर कुटुंबातील तीन सदस्य शेतातील गाईचा आश्रय घेऊन होते. अशातच एकाएकी जोराच्या कडकडाटासह अवघ्या १० फुटांवर असलेल्या झाडावर वीज कोसळली. यात झाडाचे सात तुकडे झाले; मात्र या नैसर्गिकप्रकोपापासून हे शेतकरी कुटुंब सुखरुप बचावले. यातून आपण बचावलो, यावर त्यांचा क्षणभर विश्वासच बसला नाही. हा प्रसंग या कुटुंबासाठी ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय देणारा ठरला. जिल्ह्यात गत चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. सोमवारी साहुर परीसरात सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास विजांसह मुसळधार पाऊस आला. गावापासून ३०० मिटर अंतरावरील उंबरकर कुटुंबीयाचे शेत आहे. शेतातून निघताना अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. शेतातील झोपडीपासून १० फुट अंतरावरील बाभळीच्या झाडावर जोरदार वीज कोसळली. या विजेमुळे सुमारे ४० फूट उंच झाडाचे सात तुकडे झाले. दैव बलबत्तर म्हणून हे तीनही शेतकरी बचावले.शेतकऱ्यांना वर्षभर निसर्गाला तोंड द्यावे लागते. कधी अति पाऊस, तर कधी कोरडा दुष्काळ. कधी अत्यल्प उत्पन्न, तर कधी भावात चढउतार. पिकवलेल्या मालाला चांगला भावही मिळत नाही. अवकाळी पावसात वीज कोसळून शेकडोच्या संख्येने शेतकरी मरतात. असाच कडकडाट सोमवारी साहुरवासीयांनी अनुभवला. शेतकरी घराच्या दिशेने निघाले. गावापासून काही अंतरावर नदी पलीकडे उंबरकर कुटुुबीयांचे संयुक्त शेत आहे. एक शेत बोरखेडी मौजामध्ये आहे. प्रशांत उंबरकर, हरिभाऊ नामदेव उंबरकर व कृष्णकुमार नामदेव उंबरकर हे तिनही शेतकरी साहुर मौज्यातील शेतात आले. शेतातील गार्इंना चारा टाकल्यावर पाऊस सुरू झाला. पावसामुळे तिघेही गार्इंच्या गोठ्यात थांबले. मात्र कृष्णकुमार उंबरकर बंडीला टांगलेला सदरा घेण्यासाठी बंडीजवळ गेले. अचानक त्यांच्यापासून १० फुट अंतरावरील बाभळीच्या झांडावर वीज कोसळली. तिघेही जमिनीवर कोसळले. काय घडले कळेनासे झाले. क्षणात स्वत:ला सावरत एकच आक्रोश सुरू झाला. मात्र तिघांनाही सुखरुप बघताच ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला.(वार्ताहर)४० फूट झाडाचे सात तुकडे वीज कोसळली ते बाभळीचे झाड सुमारे ४० फुट उंच होते. ही वीज कोसळताच त्याचे सात तुकडे झाले. हे बघून त्यांना आपण यातून बचावलो, यावर विश्वासच बसत नव्हता. ही आपबिती कथन करतानाही त्यांच्या अंगाचा थरकाप उडत होता.