शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
2
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
3
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
4
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
5
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
6
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
7
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
8
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
9
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
10
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
11
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
12
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
13
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
14
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
15
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
16
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
17
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
18
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
19
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
20
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या

१५ दिवसात बायोमेट्रिक प्रणालीचा अल्टीमेटम

By admin | Updated: April 12, 2016 04:34 IST

नागरिकांना मिळणारी आरोग्य सुविधा लोकाभिमुख व्हावी, ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवेत अडचणी

पुलगाव : नागरिकांना मिळणारी आरोग्य सुविधा लोकाभिमुख व्हावी, ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवेत अडचणी निर्माण होवू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये आणि कार्यालयामध्ये काम करणारे जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांसह सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी बायोमेट्रीकवर नोंदवून आधार कार्डशी संलग्न करूनच त्यांचे वेतन काढले जाणार आहे. तसे आदेश राज्यशासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे देण्यात आले आहे. त्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांवर चांगलाच चाप ओढला जाणार आहे. सदर निर्णय शासनाद्वारे निर्गमित झाल्यापासून १५ दिवसाच्या आत बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्यात या प्रणालीचे संनियंत्रण करून १५ तारखेपर्यंत कार्यवाहीचा अहवाल प्रादेशिक प्रमुखाकडे सादर करण्याच्या सूचना आहेत. राज्यातील आरोग्य सेवा क्षेत्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयी उपस्थितीबाबत तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. ही बाब आणि आरोग्य संस्थांबाबत निर्माण होणारा जनतेचा रोष लक्षात घेता, या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांना बरेचदा तश्या सूचनाही केल्या. पण त्या पाळल्या जात ंबसल्याने सदर निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर रात्री वैद्यकीय अधिकारी बरेचदा उपस्थित राहत नसल्याची ओरड आहे. पण या शासन निर्णयानुसार शासकीय आरोग्य संस्थांमधील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, फॉर्मासिस्ट, वॉर्ड बॉय व इतर कर्मचारी यांनी प्रभावी व कार्यक्षेत्र व्यवस्थापन करून गुणक्तापूर्ण आरोग्य सेवा, सुविधा सर्व सामान्यांना मिळवून देण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली राबवावी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेतन देयके सादर करताना बायोमेट्रिक उपस्थितीची खात्री करून घ्यावी अशा सूचना आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाचा हा राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व इतर आरोग्य संस्थातून काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी बंधनकारक राहणार आहे. यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांनाचा चांअग्लाच चाप बसणार असल्याचे दिसत आहे.(तालुका प्रतिनिधी)वाढत्या तक्रारींची दखल४राज्यातील आरोग्य सेवा क्षेत्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयी उपस्थितीबाबत तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. ही बाब आणि आरोग्य संस्थांबाबत निर्माण होणारा जनतेचा रोष लक्षात घेता, या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांना बरेचदा तश्या सूचनाही केल्या. पण परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.