शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

मोदी शासनाच्या दोन वर्षांच्या काळात शेतकऱ्यांवर अन्यायच

By admin | Updated: June 18, 2016 01:35 IST

या कार्यक्रमात पुढे बोलताना खा. पटेल म्हणाले, अच्छे दिनचे स्वप्न दाखवित सत्ता मिळविलेल्या मोदी शासनाच्या दोन वर्षांच्या काळात कृषक समाजावर प्रचंड अन्याय होत आहे.

हिंगणघाट : या कार्यक्रमात पुढे बोलताना खा. पटेल म्हणाले, अच्छे दिनचे स्वप्न दाखवित सत्ता मिळविलेल्या मोदी शासनाच्या दोन वर्षांच्या काळात कृषक समाजावर प्रचंड अन्याय होत आहे. सद्यस्थितीत व्यापारी, उद्योजक, शेतकऱ्यांपासून सर्वच दुखी असून हेच काय ते अच्छे दिन म्हणून जनता पश्चाताप करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दोन वर्षांत केंद्र व राज्य शासनाने केवळ आश्वासनाशिवाय काहीच दिले नाही. जुन्या महत्त्वपूर्ण योजना बंद करणे व काहीचे नावात फेरबदल करून पुन्हा त्याच राबविणे या शिवाय दुसरे काहीच केले नसल्याचे ते म्हणाले. शेती संबंधी कवडीचे ही ज्ञान नसल्याकडून शेती संबंधी निर्णय घेण्यात येत असल्याने शेतकरी संकटात सापडल्याचा आरोप पटेल यांनी केला. तालुका स्तरावरील ही बाजार समिती शासन योजनांपलीकडे जावून शेतकऱ्यांसाठी विविध योजना यशस्वीपणे राबविते ही बाब भुषणावह असल्याचे सांगून सभापती अ‍ॅड कोठारी व संचालक मंडळाचे त्यांनी अभिनंदन केले.प्रास्ताविक करताना बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी २००० साली ७० कोटीची उलाढाल असलेल्या या बाजार समितीची उलाढाल १४०० कोटीवर पोहचल्याचे सांगितले. यंदाच्या १२ कोटीच्या उत्पनातून खर्च वजा जाता शुद्ध नफा ६ कोटी असल्याचे ते म्हणाले. गत १५ वर्षांत शेतकऱ्यांना विकासाचा केंद्र बिंदु मानत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या एक रुपयात भरपोट जेवण, एक रुपयात निवास व चहापाण्याची सोय, स्मशानभूमी तेथे विहीर, बसस्थानका पर्यंत मोफत बस सेवा, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर लॅपटाप, व्यावसायिक शिक्षणासाठी ५० टक्के अनुदान, पांदण व सिंचन योजनेसाठी अनुदान , शौचालयासाठी आर्थिक मदत शाळा व आंगणवाडींना पख्यांचे वाटप, कृषीवर आधारित चर्चासत्र आदी संबंधी कार्याची त्यांनी विस्तृत माहिती दिली. यावेळी मंचावर उपस्थितीत अतिथींनी अ‍ॅड. कोठारी यांच्या कार्याची प्रशंसा केली. या कार्यक्रमात नैसर्गिक आपत्तीत बैल मृत्यूमुखी तसेच घर जळालेल्या शेतकऱ्यांना मान्यवरांचे हस्ते आर्थिक मदत तसेच अंगणवाडीला विजेचे पंखे वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश डालीया यांनी केले तर आभार उपसभापती वडतकर यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)