शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी शासनाच्या दोन वर्षांच्या काळात शेतकऱ्यांवर अन्यायच

By admin | Updated: June 18, 2016 01:35 IST

या कार्यक्रमात पुढे बोलताना खा. पटेल म्हणाले, अच्छे दिनचे स्वप्न दाखवित सत्ता मिळविलेल्या मोदी शासनाच्या दोन वर्षांच्या काळात कृषक समाजावर प्रचंड अन्याय होत आहे.

हिंगणघाट : या कार्यक्रमात पुढे बोलताना खा. पटेल म्हणाले, अच्छे दिनचे स्वप्न दाखवित सत्ता मिळविलेल्या मोदी शासनाच्या दोन वर्षांच्या काळात कृषक समाजावर प्रचंड अन्याय होत आहे. सद्यस्थितीत व्यापारी, उद्योजक, शेतकऱ्यांपासून सर्वच दुखी असून हेच काय ते अच्छे दिन म्हणून जनता पश्चाताप करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दोन वर्षांत केंद्र व राज्य शासनाने केवळ आश्वासनाशिवाय काहीच दिले नाही. जुन्या महत्त्वपूर्ण योजना बंद करणे व काहीचे नावात फेरबदल करून पुन्हा त्याच राबविणे या शिवाय दुसरे काहीच केले नसल्याचे ते म्हणाले. शेती संबंधी कवडीचे ही ज्ञान नसल्याकडून शेती संबंधी निर्णय घेण्यात येत असल्याने शेतकरी संकटात सापडल्याचा आरोप पटेल यांनी केला. तालुका स्तरावरील ही बाजार समिती शासन योजनांपलीकडे जावून शेतकऱ्यांसाठी विविध योजना यशस्वीपणे राबविते ही बाब भुषणावह असल्याचे सांगून सभापती अ‍ॅड कोठारी व संचालक मंडळाचे त्यांनी अभिनंदन केले.प्रास्ताविक करताना बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी २००० साली ७० कोटीची उलाढाल असलेल्या या बाजार समितीची उलाढाल १४०० कोटीवर पोहचल्याचे सांगितले. यंदाच्या १२ कोटीच्या उत्पनातून खर्च वजा जाता शुद्ध नफा ६ कोटी असल्याचे ते म्हणाले. गत १५ वर्षांत शेतकऱ्यांना विकासाचा केंद्र बिंदु मानत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या एक रुपयात भरपोट जेवण, एक रुपयात निवास व चहापाण्याची सोय, स्मशानभूमी तेथे विहीर, बसस्थानका पर्यंत मोफत बस सेवा, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर लॅपटाप, व्यावसायिक शिक्षणासाठी ५० टक्के अनुदान, पांदण व सिंचन योजनेसाठी अनुदान , शौचालयासाठी आर्थिक मदत शाळा व आंगणवाडींना पख्यांचे वाटप, कृषीवर आधारित चर्चासत्र आदी संबंधी कार्याची त्यांनी विस्तृत माहिती दिली. यावेळी मंचावर उपस्थितीत अतिथींनी अ‍ॅड. कोठारी यांच्या कार्याची प्रशंसा केली. या कार्यक्रमात नैसर्गिक आपत्तीत बैल मृत्यूमुखी तसेच घर जळालेल्या शेतकऱ्यांना मान्यवरांचे हस्ते आर्थिक मदत तसेच अंगणवाडीला विजेचे पंखे वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश डालीया यांनी केले तर आभार उपसभापती वडतकर यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)