शहरं
Join us  
Trending Stories
1
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
2
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
3
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
4
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
5
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
6
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
7
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
8
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
9
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
10
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
11
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
12
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
13
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
14
मतमोजणीपूर्वी १ जूनला INDIA आघाडीची बैठक बोलावण्यामागे खर्गे आणि काँग्रेसची अशी आहे रणनीती
15
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
16
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
17
४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

दोन महिन्यातच खचली विहीर, सुमार दर्जाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 11:29 PM

खचलेल्या व बुजलेल्या विहीर योनजेतून जैतापूर येथील शेतकरी मधूकर धुर्वे यांना विहीर मंजूर झाली होती.

ठळक मुद्देअनुदानात गौडबंगाल : पं.स. गटविकास अधिकाºयांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद): खचलेल्या व बुजलेल्या विहीर योनजेतून जैतापूर येथील शेतकरी मधूकर धुर्वे यांना विहीर मंजूर झाली होती. पंचायत समितीमधून सदर विहिरीचे बांधकाम परस्पर ठेकेदाराला देत ते पूर्ण करण्यात आले. अडीच लाखांचा खर्चही पूर्ण दाखवला; मात्र या विहिरीचे बांधकाम सुमार दर्जाचे झाल्याने अवघ्या दोन महिन्यातच विहीर खचायला सुरू झाली आहे. सिमेंट काँक्रीटची विहीर खचणे ही बाब शेतकºयांच्या फारच जिव्हारी लागल्याने जिल्हाधिकाºयांकडे याप्रकरणी लेखी तक्रार करण्यात आली आहे.जैतापूर येथील अल्पभूधारक शेतकरी मधूकर धुर्वे यांच्याकडे मौजा इठलापूर शिवारात साडेतीन एकर शेती आहे. मजूर मिळत नसल्याने पती, पत्नी व दोन मुलींकडून शेतीची मशागत व लागवड ते करतात. शेतात सिंचनाची सोय व्हावी म्हणून त्यांनी अनुदानातून विहीर घेतली. याकरिता अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळाले. करारनामा झाल्यावर संंबंधित ठेकेदाराने शेतकºयाचे पासबुक, चेकबुक ताब्यात घेतले. कोºया धनादेशावर शेतकºयाची स्वाक्षरीही घेतली. त्यानंतर बांधकाम केले. हे काम करताना अंदाजपत्रक बाजूला ठेवत मनात येईल तसे काम त्यांच्याकडून करण्यात आले.यावेळी मधुकर यांनी बांधकामाचा दर्जा योग्य नाही, असे मजुरांना सांगतच कंत्राटदारांना सांगा अन्यथा काम ठप्प करून टाकू, अशी धमकी त्यांना मिळाली. आहे. एप्रिल २०१७ मध्ये बांधकाम करण्यात आले. मुख्य गाला (गाभारा) बांधल्यावर त्याच्या सभोतला गोटे, माती, मुरूम टाकून बुजविणे बंधनकारक होते; परंतु ठेकेदाराने काम सोडून दिले. जून महिन्यात पाऊस येताच विहिरीच्या सभोवताल ते साचले आणि मोठे भगदाड पडले. याची माहिती पंचायत समिती गटविकास अधिकाºयांना देण्यात आली. त्यांनी विहीर पहायला येतो, असे सांगितले. धुर्वे यांनी बरीच प्रतीक्षा केली; मात्र बिडीओ आलेच नाही.शेतकºयाचे बँकेचे सर्व व्यवहार ठेकेदार करून चुकला. पैसे ही काढले आता विहीर दुरूस्ती करण्याची वेळ आली. गाळ उपसावा लागणार आहे. त्यासाठी ठेकेदाराने जबाबदारी झटकली. आदिवासी शेतकºयाच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत कंत्राटदाराने स्वार्थ पूर्ण केला. आता जबाबदार कोण? याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. आष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी विहिरीचे बोगस व निकृष्ट बांधकाम झाल्याची प्रकरणे उजेडात आली आहेत. जैतापूर याप्रकरणी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करण्यात आली असून काय कारवाई होते याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.