शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यातच उखडला सिमेंट रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:11 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पंचवीस पंधरा ग्राम विकास निधीतून उंदीरगाव येथे करण्यात आलेले सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या संदर्भात संबधित विभागाकडे नागरिकांनी लेखी तक्रार देवून अद्यापही दखल घेतली नाही.

ठळक मुद्देउंदीरगावातील प्रकार : निकृष्ट दर्जाचे काम असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पंचवीस पंधरा ग्राम विकास निधीतून उंदीरगाव येथे करण्यात आलेले सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या संदर्भात संबधित विभागाकडे नागरिकांनी लेखी तक्रार देवून अद्यापही दखल घेतली नाही. यामुभे कंत्राटदार व अधिकाऱ्यांत हातमिळवणी असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.उंदीरगाव येथील प्रमोद बोरकुटे यांच्या घरापासून शांताराम बोरकुटे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम गत सहा महिन्यापूर्वी करण्यात आले. यावेळी नागरिकांनी निकृष्ट दजार्चे काम होत असल्याबाबत कंत्राटदाराला सांगितले, मात्र याकडे कंत्राटदाराने दुर्लक्ष करीत काम पूर्ण केले. सदर रस्त्याचे काम पंचवीस पंधरा ग्राम विकास निधीतून तीन लाख रुपये खर्चून करण्यात आले. या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी ठेवण्यात आला होता. तर या कामात दोष आढळल्यास १२ महिन्यांच्या आत दोष निवारण करण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र दोन महिन्यातच या रस्त्यावर भेगा पडलेल्या आहे.रस्त्यावरचे सिमेंट उखडले असल्याने गिट्टी उघडी पडली आहे. शिवाय रस्त्याच्या कडा खचल्याने रस्त्याचे काम दजार्हीन झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. येथील रस्त्यावर कामाच्या संदर्भात लावण्यात आलेल्या फलकावर कंत्राटदाराचे नाव नसल्याने नागरिकात विविध चचेर्ला उथान आले आहे. या सिमेंट रस्त्यावरील सध्या गिट्टी उघडी पडली असून हा रस्ता सिमेंटकरण केला अथवा खडीकरण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या संदर्भात ९ एप्रिल २०१८ रोजी येथील नागरिक प्रभाकर कोवराते यांनी बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी मुख्य अभियंता यांच्याकडे तक्रार केली; मात्र यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. या रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी उंदीरगाव येथील नागरिकांनी केली आहे.