शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

दोन मध्यम तर पाच छोटे जलाशय ‘फुल्ल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 22:28 IST

जुलैच्या शेवटच्या तर आॅगस्ट महिन्यात दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सध्यास्थितीत जिल्ह्यातील दोन मध्यम आणि पाच छोटे जलाशय १०० टक्के भरले आहे. विशेष म्हणजे वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांची पिण्याची पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा असलेला महाकाळी येथील धाम प्रकल्प सध्या ६६.७७ टक्के भरला आहे.

ठळक मुद्देमहाकाळीचा धाम प्रकल्प भरला ६६.७७ टक्के : दमदार पावसाची नागरिकांना प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जुलैच्या शेवटच्या तर आॅगस्ट महिन्यात दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सध्यास्थितीत जिल्ह्यातील दोन मध्यम आणि पाच छोटे जलाशय १०० टक्के भरले आहे. विशेष म्हणजे वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांची पिण्याची पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा असलेला महाकाळी येथील धाम प्रकल्प सध्या ६६.७७ टक्के भरला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अनेक प्रकल्प अजूनही आॅक्सिजनवर असल्याने सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील मध्यम जलाशय आलेला पोथरा प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प तर छोटे जलाशय असलेला कवाडी, अंबाझरी, लहादेवी, पांजरा बोथली, उमरी हे प्रकल्प सध्या १०० टक्के भरले आहे. लहादेवी प्रकल्पातून १ से.मी., पांजरा बोथली प्रकल्पातून १५ से.मी. विसर्ग सुरू आहे. तर मध्यम जलाशय असलेल्या पोथरा प्रकल्पाचे दरवाजे १६ से.मी.ने उघडण्यात आले आहेत. तसेच कार नदी प्रकल्प ३ से.मी. ओवर फ्लो आहे.सध्या बोर प्रकल्पात २९.५८ टक्के, निम्न वर्धा प्रकल्पात ३३.७९ टक्के, धाम प्रकल्पात ६६.७७ टक्के, पंचधारा प्रकल्पात ६३.५४ टक्के, डोंगरगाव प्रकल्पात ७८.९२ टक्के, मदन प्रकल्पात २०.६० टक्के, मदन उन्नई प्रकल्पात ३३.४८ टक्के, लाल नाला प्रकल्पात ८५.७२ टक्के तर सुकळी लघु प्रकल्पात ९०.९० टक्के उपयुक्त जलसाठा आहे. शिवाय लघु प्रकल्प असलेल्या सावंगी जलाशयात ५६.४६ टक्के, पारगोठाण जलाशयात ७२.८३ टक्के, टेंभरी जलाशयात १७.२७ टक्के, आंजी बोरखेडी जलाशयात १७.२७ टक्के, दहेगाव (गोंडी) जलाशयात २०.९२ टक्के, कुºहा जलाशयात १५.५६ टक्के, रोठा-१ जलाशयात २३.३७ टक्के, रोठा-२ जलाशयात ४९.९५ टक्के, आष्टी जलाशयात ४३.९५ टक्के, पिलापूर जलाशयात ५५.०० टक्के, कन्नमवारग्राम जलाशयात ८०.७८ टक्के, परसोडी जलाशयात २७.८७ टक्के, मलकापूर जलाशयात ५५.७७ टक्के, हराशी जलाशयात ६६.८५ टक्के, टाकळी बोरखेडी जलाशयात ३२.५२ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तशी नोंदही जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

टॅग्स :Damधरण